शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

गोवंश संवर्धनासाठी झटणारे रायपूरचे ‘फैज खान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 9:47 AM

गोवंशाचा मुद्दा समोर करून हा आपलाच ‘कॉपीराईट’ असल्याचा आविर्भाव आणणाऱ्या संघटनांना रायपूर येथील फैज खान यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे.

ठळक मुद्देवर्षभरापासून सुरू आहे पदयात्रागोसेवा सद्भावना यात्रेतून सामाजिक समरसतेचा संदेश

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या गोवंशाचे राजकीय महत्त्व गेल्या काही काळापासून जास्त वाढले आहे. गोवंश संरक्षणाच्या नावाखाली सामाजिक वातावरणदेखील गढूळ करण्याचा प्रयत्न झाला. मात्र गोवंश संवर्धन हा धर्माशी जुळलेला मुद्दा नसल्याचे एका मुस्लीम धर्मीयाने दाखवून दिले आहे.गोवंशाचा मुद्दा समोर करून हा आपलाच ‘कॉपीराईट’ असल्याचा आविर्भाव आणणाऱ्या संघटनांना रायपूर येथील फैज खान यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे. गोवंश संवर्धनासाठी झटणारे फैज हे गेल्या वर्षभरापासून देशभरात भ्रमण करत आहेत. पदयात्रेच्या माध्यमातून गोसेवेचा संदेश देणाऱ्या फैज यांनी सामाजिक समरसतेचे उदाहरणच उभे केले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून गोसेवेचे कार्य करणारे फैज खान हे रायपूर येथे प्राध्यापक होते. मात्र गोसंवर्धनासाठी वाहून घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला व तेथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. काही वर्ष त्यांनी देशातील विविध भागात गोकथा ऐकविण्यासाठी भ्रमंती केली. नमाजने दिवसाची सुरुवात करणारे फैज खान दुपारी गोकथा ऐकवायचे. गोवंशाच्या मुद्यावरून देशातील बिघडते वातावरण लक्षात घेऊन त्यांनी गोवंशाचे महत्त्व व सामाजिक समरसतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी देशात पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला व २४ जून २०१७ रोजी लेह येथून यात्रेला सुरुवात केली. लेह ते कन्याकुमारी व त्यानंतर कन्याकुमारी ते अमृतसर अशी त्यांची ही यात्रा राहणार आहे. वर्षभरात फैज खान यांनी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड या राज्यांना भेटी दिल्या. सध्या ते महाराष्ट्रात असून नागपुरातदेखील त्यांनी लोकांची भेट घेतली. फैज खान हे आपल्या एकूण यात्रेदरम्यान १२ हजार किलोमीटरची पदयात्रा करणार आहेत. आतापर्यंत सुमारे ६ हजार किलोमीटर ते चालले असून पुढील वर्षी जूनपर्यंत त्यांची ही यात्रा चालणार आहे.

अशी मिळाली प्रेरणाप्राध्यापक म्हणून सरळसोपे आयुष्य जगण्याचा त्यांच्याकडे पर्याय होता. मात्र गिरीश पंकज यांनी लिहिलेले ‘गाय की आत्मकथा’ हे पुस्तक वाचून ते अस्वस्थ झाले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला गोसेवेला वाहून घेण्याचा निर्णय घेतला व याच संकल्पातून गोसेवा सद्भावना यात्रेला सुरुवात झाली. आपल्या यात्रेदरम्यान ते विविध ठिकाणी चौपाल लावतात व नागरिकांशी संवाद साधतात. सोबतच मोठ्या नद्यांचे पाणीदेखील ते आपल्या सोबत घेत आहेत. हे सर्व पाणी एकत्रित करून कन्याकुमारी येथे विसर्जित करणार आहेत.

गाय हा धर्माच्या पलीकडचा विषयगाय ही जगाची माता आहे. केवळ हिंदू किंवा मुस्लीम या धर्माचा हा विषय नाहीच. धर्माच्या पलीकडचा हा मुद्दा आहे. भारतीय देशी गोवंशाचे प्रमाण कमी होत आहे. त्याचे संवर्धन व्हावे हा माझा उद्देश आहे. यासाठी जनतेपर्यंत आरोग्य, पर्यावरण, समाज व संस्कृतीच्या दृष्टीने गोवंशाचे महत्त्व पोहोचले पाहिजे. माझ्या यात्रेचा हाच उद्देश आहे, असे फैज खान यांनी सांगितले. गाईच्या नावावर समाजात विद्वेष वाढविणे अयोग्य आहे, असे फैज खान यांनी सांगितले. गोहत्येवर देशभरात बंदी लावण्यासाठी केंद्रीय कायदा तयार करण्यासाठी ते आपल्या यात्रेदरम्यान लोकप्रतिनिधींच्या भेटीदेखील घेत आहेत.

टॅग्स :cowगाय