शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

अधिग्रहित जमिनीच्या थकित मोबदल्यासाठी शेतकरी थेट रेल्वे राज्य मंत्र्यांच्या दालनात

By नरेश डोंगरे | Published: February 13, 2024 1:05 AM

प्रशासनाकडून परवड होत असल्याने शेतकरी रडकुंडीला

नागपूर : सरकारी यंत्रणांचे वारंवार उंबरठे झिजवूनही अधिग्रहित जमिनीचा थकित मोबदला मिळत नसल्याने रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्यांनी थेट दिल्ली गाठली. आपल्या मतदार संघाच्या खासदाराच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांची भेट घेतली आणि आपले गाऱ्हाणे त्यांना ऐकवले. शेतकऱ्यांची परवड होत असल्याचे लक्षात येताच रेल्वे राज्य मंत्र्यांनीही तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा करून शक्य तेवढ्या लवकर आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

प्रकरण आहे देवळी (जि. वर्धा) पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे. वर्धा - यवतमाळ - नांदेड या बहुचर्चित रेल्वे मार्गासाठी शासनाने देवळी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची सुमारे १०० एकर पेक्षा जास्त शेती १० वर्षांपूर्वी अधिग्रहित केली. त्यावेळी केवळ ९.६० लाख रुपये हेक्टर या भावाने शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला. तो अत्यंत कमी असल्याच्या भावनेमुळे शेतकऱ्यांनी अधिग्रहित जमिनीचा भाव वाढवून मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली. २०१९ मध्ये न्यायालयाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल देऊन अधिग्रहित जमिनीच्या मोबदल्यातील रकमेची (भावाची) जवळपास चार पट वाढ करून रक्कम देण्याचे आदेश दिले. तेव्हापासून वाढीव मोबदल्याची रक्कम पदरात पडावी म्हणून बिचारे शेतकरी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. मात्र, वारंवार मागणी, अर्ज, विनंत्या करूनही जिल्हा प्रशासनाकडून थकित वाढीव मोबदल्याची रक्कम त्यांना मिळालेली नाही. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा मार सोसणारे शेतकरी त्यामुळे रडकुंडीला आले आहे.

या पार्श्वभूमीवर, देवळी भागातील शेतकरी विलास जोशी, जब्बारभाई तंवर, शैलेष पाळेकर, मोहन ठाकरे, अनिल क्षिरसागर, धनराज घुबडे आदींनी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांच्या माध्यमातून शुक्रवारी थेट दिल्लीला धडक दिली. त्यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांंच्या दालनात जाऊन त्यांना आपली व्यथा ऐकवली. वेळोवेळी संकटाचा मार सोसणाऱ्या आम्हा शेतकऱ्यांच्या पदरात आमच्याच जमिनीचा मोबदला घालण्यासाठी सरकारी यंत्रणा का मागे-पुढे बघते, असा सवाल या शेतकऱ्यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना केला. चार वर्षांपासून शेतकऱ्यांची ससेहोलपट होत असल्याचे बघून दानवे यांनी तात्काळ वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना फोन लावून या प्रकरणाबाबत विचारणा केली. त्यानंतर वाढीव मोबदला देण्यासंबंधाने तत्परतेने प्रक्रिया राबविण्याचेही निर्देश दिले.काय अडचण ते तपासू : जिल्हाधिकारीया संबंधाने जिल्हाधिकारी कर्डिले यांच्याकडे प्रस्तूत प्रतिनिधीने विचारणा केली असता त्यांनी रेल्वे राज्य मंत्र्यांकडून या प्रकरणाच्या संबंधाने सूचना आल्याचे मान्य केले. लवकरच आपण हे प्रकरण समजून घेऊ आणि काय अडचण आहे, ते तपासून पुढची आवश्यक प्रक्रिया राबवू, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेrailwayरेल्वेFarmerशेतकरी