शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे बजेट ‘गड’बडले!

By admin | Updated: March 1, 2016 02:34 IST

वित्तमंत्री अरुण जेटली यांचा अर्थसंकल्प ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा असला तरी दोन दिवसांपासून सुरु असलेल्या गारांच्या मारामुळे शेतकऱ्यांचे बजेट यंदा निश्चितच गडबडणार आहे.

गारपिटीचा तडाखा रबी पिके जमीनदोस्त गहू काळवंडणार नागपूर : वित्तमंत्री अरुण जेटली यांचा अर्थसंकल्प ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा असला तरी दोन दिवसांपासून सुरु असलेल्या गारांच्या मारामुळे शेतकऱ्यांचे बजेट यंदा निश्चितच गडबडणार आहे. जिल्ह्यातील काटोल, भिवापूर, उमरेड, नरखेड, कळमेश्वर, सावनेर, पारशिवनी, हिंगणा तालुक्यातील बहुतांश भागाला रविवारी मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसाचा तडाखा बसला. बहुतांश गावांमध्ये गारपीट झाल्याने रबी पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले. सोमवारी दुपारच्या सुमारास पुन्हा जिल्ह्यात सर्वत्र गारपिटीचा तडाखा बसला. सोसाट्याचा वारा आणि लिंबू व आवळ्याच्या आकारातील गारपिटीमुळे रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे कपाशी, हरभरा व गव्हाला सर्वाधिक फटका बसला असून गहू काळवंडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातही वादळामुळे होर्डिंग्जची पडझड झाली. काटोल, भिवापूर, नरखेड, कुही, उमरेड, हिंगणा शहरासह परिसरात सोमवारी पहाटेच्या वादळासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारपर्यंत सर्वत्र ढगाळी वातावरण होते. दरम्यान, दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गाराही पडायला सुरुवात झाली. हा पाऊस अंदाजे अर्धा ते पाऊण तास सुरू होता. त्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. काटोल तालुक्यातील रिधोरा, येनवा, डोंगरगाव, खानगाव, कारला, वाढोणा, गोन्ही, खुटांबा, लाडगाव, खंडाळा आदी गावांमध्ये गारपिटीचा प्रचंड फटका बसला. लिंबू व आवळ्याच्या आकाराच्या गारांमुळे गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कुही शहरासह तालुक्यातील साळवा, चापेगडी, मांढळ व इतर भागात जोरदार वादळासह अवकाळी पाऊस पडला. कळमेश्वर, सावनेर परिसरात दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास जोरदार वादळी पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार एक तास सुरू होता. गुमगाव, धामणा, टाकळी भन्साळी, नांदागोमुख, रिधोरा परिसरात पावसासह गारपीट झाली. तसेच भिवापूर तालुक्यातील नांद, भगवानपूर, महालगाव, बेसूर परिसरात वादळी पावसासह गारा बरसल्या. कोंढाळी परिसरात सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे प्रवाशांसह इतर नागरिकांची तारांबळ उडाली होती. अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, वातावरणात अचानक गारवा निर्माण झाला आहे.(प्रतिनिधी)