शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

नागपूर जिल्ह्यातील बडेगावनजीक अवैध रेती वाहतुकीने घेतला शेतकऱ्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 20:59 IST

अवैध रेतीवाहतूक करणाऱ्या  भरधाव ट्रकने सायकलस्वार शेतकऱ्यास जोरदार धडक दिली. त्यात ‘त्या’ शेतकऱ्या चा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकच्या काचा फोडून रोडवर टायर पेटविले होते.

ठळक मुद्देसंतप्त नागरिकांचा रस्तारोको, ट्रक जाळण्याचा प्रयत्नट्रकच्या काचा फोडून रोडवर टायर पेटविले

आॅनलाईन लोकमत

नागपूर : अवैध रेतीवाहतूक करणाऱ्या  भरधाव ट्रकने सायकलस्वार शेतकऱ्यास जोरदार धडक दिली. त्यात ‘त्या’ शेतकऱ्या चा घटनास्थळी मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकच्या काचा फोडून रोडवर टायर पेटविले होते. मात्र, पोलीस व महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी वेळीच घटनास्थळ गाठून नागरिकांना शांत केले. ही घटना खापा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडेगाव येथे शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.दामोदर साधू बेंदरे (५५, रा. बडेगाव, ता. सावनेर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. दामोदर बेंदरे हे सायकलने शेतातून घरी परत येत होते. दरम्यान, गावाजवळ रेती घेऊन जात असलेल्या एमएच-४०/वाय-३९०० क्रमांकाच्या भरधाव ट्रकने त्यांच्या सायकलला मागून धडक दिली. ट्रकचे समोरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले तर सायकल काही दूरवर फरफटत गेली. अपघाताच्या आवाजाचे गावातील चौकात बसलेल्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तोपर्यंत ट्रकचालकाने ट्रक सोडून पळ काढला. नागरिकांनी बेंदरे यांनी लगेच नजीकच्या रुग्णालयात हलविले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.रेतीवाहतुकीला आधीच विरोध असल्यामुळे या अपघाताने नागरिक संतप्त झाले. काहींनी ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला तर काहींनी ट्रकच्या काचा फोडून संताप व्यक्त केला. त्यातच काहींनी रोडवर टायर पेटविले होते. या प्रकारामुळे बडेगाव येथे तणाव निर्माण झाला होता. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून नागरिकांना शांत केले. या अपघातामुळे बडेगाव - टेंभूरडोह मार्ग दुपारी ३ वाजेपर्यंत बंद होता. या प्रकरणी खापा पोलिसांनी भादंवि ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून ट्रकचालक सावन राजू वासनिक (२८, रा. कोराडी, ता. कामठी) यास नंतर अटक केली.रेतीवाहतूक बंद करण्याची मागणीघटनेची माहिती मिळताच खाप्याच्या ठाणेदार अनामिका मिर्झापुरे, तहसीलदार राजू रणवीर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश भोयर यांनी घटनास्थळ गाठले. शिवाय, दंगा नियंत्रण पथकालाही बोलावण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी तहसीलदार रणवीर यांच्याकडे बडेगाव मार्गे होणारी रेतीची संपूर्ण वाहतूक कायमची बंद करा, अपघातास कारणीभूत असलेल्या ट्रकचालक व मालकाविरुद्ध कठोर कारवाई करा तसेच या भागात चौकी सुरू करण्याची मागणी रेटून धरली होती. तहसीलदारांनी तिन्ही मागण्या मान्य करीत मृताच्या कुटुंबीयांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याने नागरिक शांत झाले.रेती वाहतुकीचा मार्ग बदलविलाटेंभूरडोह शिवारातील कालव्याच्या पुलावरून रेतीची ओव्हरलोड वाहतूक करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. तरीही हा ट्रक रेती घेऊन खेकरानाला पुलावरून बडेगाव मार्गे जात होता. विशेष म्हणजे, या मार्गे सतत रेतीची वाहतूक केली जाते. बडेगाव येथे अपघातामुळे तणाव असल्याची माहिती मिळताच चालकांनी रेतीच्या सर्व ट्रकचा मार्ग ऐनवेळी बदलला. बडेगाव मार्गे येणारे सर्व ट्रक परत मालेगाव (ता. सौंसर, जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश) रेतीघाटात गेले आणि तिथून सावनेर मार्गे नियोजित ठिकाणी गेले.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघनटेंभूरडोह शिवारातील खेकरानाला प्रकल्पाच्या कालव्यावरील पुलावरून रेतीची वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले होते. या मार्गाने मध्य प्रदेशातील रेती सावनेर तालुक्यात आणली जाते. ओव्हरलोड रेतीवाहतुकीमुळे कालव्यावरील पूल कोसळण्याची शक्यता बळावली आहे. मात्र, महसूल व पाटबंधारे विभागाचे ही वाहतूक बंद करण्यासाठी फलक लावण्याशिवाय काहीही केले नाही. वाहतूक रोखण्यासाठी पुलावर सिमेंट खांब रोवले होते. मात्र, रेतीमाफियांनी तेही काही तासांतच पाडले. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर