शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जमीन हडपण्यासाठी लाखनीतून निघाले बनावट मुखत्यारपत्र

By admin | Updated: July 17, 2014 00:59 IST

येथील अकोली वळण मार्गालगतची जमीन हडपण्यासाठी चक्क बहिणीनेच भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथून बनावट मुखत्यारपत्र तयार केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी बडनेरा

बहिणीचा कारनामा : बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रारअमरावती : येथील अकोली वळण मार्गालगतची जमीन हडपण्यासाठी चक्क बहिणीनेच भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथून बनावट मुखत्यारपत्र तयार केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यात बहिणीविरुद्ध दोन भावांनी तक्रार नोंदविली आहे. बडनेरा येथील रहिवासी रामदास व गणेश कातोरे या दोन भावांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या नावाची बनावट कागदपत्रे सादर करुन त्यांची बहीण शकुंतला रंगराव सपाटे यांनी १२ आॅक्टोबर २०१२ रोजी मुखत्यारपत्र तयार केले. कातोरे बंधू बडनेरा येथील रहिवासी असताना त्यांना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मौजा लाखोरी येथील रहिवासी दाखविण्यात आले आहे. भूमापन क्र.२८२/२, भोगवटदार वर्ग-१, आकारणी १९.३३ पैकी गणेश कातोरे व रामदास कातोरे यांच्या नावे प्रत्येकी ०.८१ हे.आर.जमीन आहे. दोन्ही भाऊ उद्योग-व्यवसायात व्यस्त राहात असल्याने शेतीविषयक कामकाज सांभाळू शकत नसल्याचे कारण पुढे करुन त्यांची सख्खी बहीण शकुंतला सपाटे(कातोरे) यांना खास मुखत्यार नेमत असल्याची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली.या जमिनीच्या कोणत्याही भागाच्या विक्रीचे, करारावर देण्याचे, सर्वाधिकार मुखत्यारपत्राव्दारे शकुंतला सपाटे यांना बहाल करण्यात आले होते. मात्र मुखत्यारपत्र तयार करताना गणेश व रामदास कातोरे यांच्या नावाची बनावट व्यक्ती उभी करून बनावट कागदपत्रेही सादर करण्यात आली. लाखनी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून बनावट मुखत्यारपत्र तयार केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. हे बनावट मुखत्यारपत्र तयार करताना बनावट निवडणूक ओळखपत्र, व बनावट प्रतिज्ञापत्रदेखील जोडल्याचे कातोरे बंधुंनी तक्रारीत म्हटले आहे. साक्षीदार म्हणून भरत उरकुडे, पे्रमसागर उरकुडे यांची नावे आहेत. एकाच नावाच्या व्यक्ती बडनेरा आणि लाखनी येथे वास्तव्यास कशा असूू शकतात, हा प्रश्नही तक्रारीतून उपस्थित करण्यात आला आहे. एकीकडे शासकीय दस्तावेजांचे सर्व व्यवहार संगणक प्रणालीने होत असताना बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी सुध्दा सक्रिय झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आहे. शेती हडपण्यासाठी बहिणीने हा प्रकार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी बनावट कागदपत्रे तयार करणे व खोटी व्यक्ती उपस्थित करुन फसवणूक केल्याप्रकरणी सखोल चौकशी करुन संबंधितांवर फौजदारी दाखल करावी, अशी मागणी कातोरे बंधुंनी केली आहे. (प्रतिनिधी)