शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दिल्लीतील हायकमांडकडून फडणवीस यांचे पंख छाटण्याचे काम

By कमलेश वानखेडे | Updated: September 12, 2024 16:05 IST

विजय वडेट्टीवार यांची टीका : १२५ जागांवर अडचण नाही

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिल्लीतून अनेक नेते पाठविलेले आहेत. त्यांच्यावर वॉच ठेवायसाठी की अधिकार कमी करायला, यावरून हे दिसतेय की त्यांचे पंख छाटण्याचे काम पद्धतशीरपणे हायकमांड करत आहे. दिल्लीचे दोन्ही नेते मोदी- शहा यांची जर माणूस उपयुक्त नसेल तर बाजूला सारण्याची पद्धत आहे, अशी टीका विधान सभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करून राज्यभर फिरले. लोकसभेतही त्यांनी बाळासाहेबांचा फोटो वापरला. जर ते शिंदे हे नाव लिहून शिवसेनेची ओळख शिंदे गट अशी करत असतील तर शिंदे गटाला त्यांची ताकद काय आहे, या नावाला वजन किती आहे हे जनता याला दाखवून देईल, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. महाविकास आघाडीत जागा वाटपात अनेक जागांवर एकमत आहे. १२५ जागांवर कुठेही अडचण नाही. गणपती विसर्जनानंतर बैठक होत आहे. शिवसेना जर मुस्लिम उमेदवार देत असेल तर त्यात काही वावगे नाही, ते लोकशाहीला मानतात, संविधानाला म्हणतात असा त्याचा अर्थ होतो, असेही वडेट्टीवार म्हणाले.

अजित पवारांवर मीठ चोळण्याचे काम

अजित पवार यांना जेवढे दुखवता येईल, तेवढे जखमेवर मीठ चोळण्याचा काम भाजपकडून सुरू आहे. जखम एवढी मोठी झाली पाहिजे की आपोआप माणसे दूर करता येतात. बारामतीत काल त्यांचे संयुक्त पत्रकार परिषद झाली. अजित पवारांनी एकदाही मुख्यमंत्र्याकडे बघितले नाही. सर्वांचे चेहरे पडले होते. परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सत्तेच्या लढाईमध्ये कमजोर दुवा असतो त्याला बाजूला करण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. त्यामध्ये पहिला नंबर कदाचित हा अजित पवारांचा असेल आणि दुसरा नंबर एकनाथ शिंदेंचाही असू शकतो, असा दावा वडेट्टीवार यांनी केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारnagpurनागपूरBJPभाजपा