शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
3
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
4
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
5
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
6
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
7
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
8
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
9
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
10
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
11
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
12
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
13
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
14
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
15
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
16
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
17
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
18
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
19
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
20
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल

विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 10:35 IST

महायुतीत असलेले पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक प्रा. जोगेंद्र कवाडे यांची विशेष मुलाखत.

चारशे जागा आल्यावर आरक्षण बदलवू असे वक्तव्य भाजपच्या काही नेत्यांनी केल्यानंतर आम्हीच सर्वप्रथम विरोध केला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही दिली. लोकसभेला मविआने फेक नरेटीव्ह दिला, बदलले का संविधान? सत्तापक्षासोबत आम्ही असलो तरी संविधानाचे रक्षक म्हणून आहोत आणि राहू, अशी भावना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी लोकमतचे प्रतिनिधी योगेश पांडे यांना दिलेल्या मुलाखातीत व्यक्त केली. 

प्रश्न : भाजप सत्तेवर आल्यावर संविधान बदलेल असा नॅरेटिव्ह पसरविण्यात येतो. आपले मत काय ?उत्तर : संविधान हे १४० कोटींहून अधिक जनतेच्या जगण्याचा आधार आहे.  कुणीही सत्तेवर आल्यावर संविधान बदलविणे अशक्य आहे. भाजप संविधानाशी छेडछाड करेल हा केवळ अपप्रचार होता हे लोकांनाही कळले आहे. 

प्रश्न :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेली धर्मनिरपेक्षता आणि काँग्रेसची धर्मनिरपेक्षता यात आपल्याला काही फरक जाणवतो का?उत्तर : जमीन-आस्मानाचा फरक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाचा विचार करत धर्मनिरपेक्षतेचे सूत्र मांडले होते. मात्र काँग्रेसची धर्मनिरपेक्षता ही मतांसाठीच आहे. निवडणुकीतच काँग्रेसला धर्मनिरपेक्षता आठवते.  काँग्रेसला खरोखरच मागासवर्गीयांच्या भावनांची काळजी होती तर मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी त्यांनी १६ वर्षे संघर्ष का होऊ दिला? शेकडो भीमसैनिकांच्या रक्ताचे दान घेतल्यावरदेखील तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी पुढाकार का घेतला नव्हता? खैरलांजीच्या घटनेत काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका काय होती, जरा आठवा!

प्रश्न :  काँग्रेसची धर्मनिरपेक्षता व पुरोगामित्व विशिष्ट समाजाचे लांगुलचालन अशी टीका आपण करता, त्याचा आधार?उत्तर : निश्चितच यात तथ्य आहे. राहुल गांधी यांनी त्यांची ‘मोहब्बत’ नेमकी कुणाच्या प्रति आहे ते स्पष्ट करावे. इतकी वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. मात्र बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली नाही. संसदीय समितीनेही अहवालात हे मांडले होते. काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेमध्ये इतकी वर्ष बाबासाहेबांचे विचार, मागासवर्गीयांचा सन्मान का आला नाही, हा सवाल आहे. काँग्रेस, शरद पवारांकडून सोयीनुसार पुरोगामित्वाचा वापर होतो.    

प्रश्न : हिंदू कोड बिलाचा बाबासाहेबांनी नेहमीच आग्रह धरला होता काँग्रेसने त्याला विरोध केला, असा आरोप होतो, त्या बद्दल?उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू महिलांच्या हक्कांच्या रक्षणासाठी व समानतेसाठी हिंदू कोड बिल तयार केले होते.  तत्कालिन पंतप्रधान पं.नेहरूंच्या आश्वासनावरून ते संसदेत सादर केले. मात्र त्यांच्या काही मंत्र्यांनी विरोध केला व नेहरू झुकले. त्यांनी हिंदू कोड बिल मागे घेतले व ही बाब बाबासाहेबांच्या मनाला धक्का देणारी ठरली. त्यांनी नाराजीतून मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.  

प्रश्न : काँग्रेसने भंडारा व दक्षिण मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीत पराभूत करण्याचे काम केले, असा आरोप नेहमीच होतो. आपण या चळवळीत इतकी वर्षे आहात आपले मत काय?उत्तर : बाबासाहेबांचा महात्मा गांधींसोबत वैचारिक संघर्ष होता. गांधींना राजकीय स्वातंत्र्य महत्त्वाचे वाटत होते. सामाजिक मुक्तीकडे काँग्रेसचे दुर्लक्ष होत होते. बाबासाहेबांनी गांधीजींना विरोध केला म्हणून काँग्रेसने मनात राग ठेवला. घटनेच्या शिल्पकाराला निवडणुकीत पाडण्यासाठी षडयंत्र केले. अद्यापही काँग्रेसच्या मानसिकतेत फारसा बदल झालेला नाही हे कटूसत्य आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीJogendra kawadeजोगेंद्र कवाडे