शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
8
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
9
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

निकाल लागून ६२ दिवस होऊनही अकरावी प्रवेशाची बोंबच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 20:22 IST

केंद्रीय पद्धतीच्या ऑनलाइन प्रक्रियेने प्रवेशाचा खोळंबा : पालकांची वाढली धाकधूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहावी बोर्डाचा निकाल दि. १३ मे रोजी लागला. पण, निकाल लागून दोन महिने लोटल्यानंतरही हजारो विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेतच आहेत. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या असंख्य विद्यार्थ्यांचे प्रवेशही झालेले नाहीत. त्यामुळे अर्ज चुकला असेल का, प्रवेश मिळणार की नाही, या चिंतेने विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही धाकधूक वाढली आहे.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानुसार अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया १९ मेपासून सुरू करण्यात आली होती. सराव नोंदणीनंतर दि. २१ मेपासून प्रत्यक्ष नोंदणी सुरू होणार होती. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचे संकेतस्थळ ठप्प पडले आणि प्रक्रिया खोळंबली. 

पुढे दि. २६ मेपासून पुन्हा नोंदणी सुरू करण्यात आली. दि. ३ जूनपर्यंत असलेली मुदत पुढे ५ जून व नंतर ८ जूनपर्यंत वाढविण्यात आली. दि. ११ व दि. १२ जूनला महाविद्यालयीन कोटा प्रवेश घेण्यात आले. १४ जूनपासून सामान्य प्रवेश सुरू होणार होते. मात्र, शिक्षण विभागाने प्रवेशप्रक्रिया तब्बल १०-१२ दिवस पुढे ढकलली. २६ जूनला यादी जाहीर होणार होती व २७ पासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार होती. त्यानुसार २६ तारखेला दिवसभर ऑनलाइन पडताळणी करणाऱ्या विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रवेशप्रक्रिया पुन्हा रेंगाळली. तांत्रिक बिघाडामुळे सहाव्यांदा वेळापत्रक बदलण्यात आले. त्यानंतर दि. २८ जूनला यादी जाहीर करून दि. ३० जूनपासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. 

कॉलेज सुरू होण्याच्या काळात प्रवेश नाहीऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला संस्थाचालकांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांचा विरोध असताना राज्य सरकारच्या माध्यमिक शिक्षण विभागाने कुणाच्याही विरोधाची दखल घेतली नाही. उलट पूर्वी महापालिका हद्दीतील कॉलेजमध्ये सुरू असलेले ऑनलाइन प्रवेश यावर्षी राज्यभरात लागू केले. तांत्रिक व्यवस्था सांभाळणारी सर्व यंत्रणा आहे की नाही, हे तपासण्याची तसदीही सरकारने घेतली नाही. या बेजबाबदारपणाचा फटका आता विद्यार्थी व पालकांनाच भोगावा लागतो आहे. जुलै महिन्यात महाविद्यालये सुरू होणार होती. मात्र, यावर्षी प्रवेशच झाले नाहीत.

तर विद्यार्थी राहणार बार्टीच्या शिष्यवृत्तीपासून वंचितमागासवर्गीय व आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना बार्टीची शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. दि. १ जुलैपासून ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. बार्टीला अर्ज करण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्याचे बोनाफाइड प्रमाणपत्र जोडावे लागते. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेशच झाले नसल्याने त्यांना बोनाफाइड मिळाले नाही, ज्यामुळे बार्टीचे अर्जही करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना बार्टीच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती आहे.

जेमतेम पहिली फेरी पूर्ण, २२ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेशदि. ३० जून ७ जुलैपर्यंत प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली. यादरम्यान नोंदणी केलेल्या २२,५७४ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. जिल्ह्यात एकूण ९७,४३५ जागा आहेत, त्यासाठी ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र खरी चिंता विज्ञान शाखेत प्रवेशाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या ४९ हजार जागा आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत १३ हजार प्रवेश झाले आहेत. मात्र ८५ ते २० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचेही प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे पुढे काय होईल, ही चिंता पालकांना आहे.

टॅग्स :Admissionप्रवेश प्रक्रियाEducationशिक्षणnagpurनागपूर