शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
2
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
3
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
4
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
5
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
6
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
7
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
8
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
9
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
10
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
11
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
12
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
13
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
14
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
15
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
16
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
17
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
18
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
19
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...
20
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण

निकाल लागून ६२ दिवस होऊनही अकरावी प्रवेशाची बोंबच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 20:22 IST

केंद्रीय पद्धतीच्या ऑनलाइन प्रक्रियेने प्रवेशाचा खोळंबा : पालकांची वाढली धाकधूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दहावी बोर्डाचा निकाल दि. १३ मे रोजी लागला. पण, निकाल लागून दोन महिने लोटल्यानंतरही हजारो विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेतच आहेत. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या असंख्य विद्यार्थ्यांचे प्रवेशही झालेले नाहीत. त्यामुळे अर्ज चुकला असेल का, प्रवेश मिळणार की नाही, या चिंतेने विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही धाकधूक वाढली आहे.

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानुसार अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया १९ मेपासून सुरू करण्यात आली होती. सराव नोंदणीनंतर दि. २१ मेपासून प्रत्यक्ष नोंदणी सुरू होणार होती. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचे संकेतस्थळ ठप्प पडले आणि प्रक्रिया खोळंबली. 

पुढे दि. २६ मेपासून पुन्हा नोंदणी सुरू करण्यात आली. दि. ३ जूनपर्यंत असलेली मुदत पुढे ५ जून व नंतर ८ जूनपर्यंत वाढविण्यात आली. दि. ११ व दि. १२ जूनला महाविद्यालयीन कोटा प्रवेश घेण्यात आले. १४ जूनपासून सामान्य प्रवेश सुरू होणार होते. मात्र, शिक्षण विभागाने प्रवेशप्रक्रिया तब्बल १०-१२ दिवस पुढे ढकलली. २६ जूनला यादी जाहीर होणार होती व २७ पासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात होणार होती. त्यानुसार २६ तारखेला दिवसभर ऑनलाइन पडताळणी करणाऱ्या विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रवेशप्रक्रिया पुन्हा रेंगाळली. तांत्रिक बिघाडामुळे सहाव्यांदा वेळापत्रक बदलण्यात आले. त्यानंतर दि. २८ जूनला यादी जाहीर करून दि. ३० जूनपासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. 

कॉलेज सुरू होण्याच्या काळात प्रवेश नाहीऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला संस्थाचालकांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांचा विरोध असताना राज्य सरकारच्या माध्यमिक शिक्षण विभागाने कुणाच्याही विरोधाची दखल घेतली नाही. उलट पूर्वी महापालिका हद्दीतील कॉलेजमध्ये सुरू असलेले ऑनलाइन प्रवेश यावर्षी राज्यभरात लागू केले. तांत्रिक व्यवस्था सांभाळणारी सर्व यंत्रणा आहे की नाही, हे तपासण्याची तसदीही सरकारने घेतली नाही. या बेजबाबदारपणाचा फटका आता विद्यार्थी व पालकांनाच भोगावा लागतो आहे. जुलै महिन्यात महाविद्यालये सुरू होणार होती. मात्र, यावर्षी प्रवेशच झाले नाहीत.

तर विद्यार्थी राहणार बार्टीच्या शिष्यवृत्तीपासून वंचितमागासवर्गीय व आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना बार्टीची शिष्यवृत्ती मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. दि. १ जुलैपासून ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. बार्टीला अर्ज करण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्याचे बोनाफाइड प्रमाणपत्र जोडावे लागते. मात्र अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेशच झाले नसल्याने त्यांना बोनाफाइड मिळाले नाही, ज्यामुळे बार्टीचे अर्जही करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना बार्टीच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती आहे.

जेमतेम पहिली फेरी पूर्ण, २२ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेशदि. ३० जून ७ जुलैपर्यंत प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली. यादरम्यान नोंदणी केलेल्या २२,५७४ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले. जिल्ह्यात एकूण ९७,४३५ जागा आहेत, त्यासाठी ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र खरी चिंता विज्ञान शाखेत प्रवेशाच्या प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांना आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या ४९ हजार जागा आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत १३ हजार प्रवेश झाले आहेत. मात्र ८५ ते २० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचेही प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे पुढे काय होईल, ही चिंता पालकांना आहे.

टॅग्स :Admissionप्रवेश प्रक्रियाEducationशिक्षणnagpurनागपूर