शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकसमोरील खुनाच्या कटात अभियांत्रिकी विद्यार्थी

By admin | Updated: July 23, 2014 00:52 IST

गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक आणि शेतकरी भवनदरम्यान ९ जून रोजी दिवसाढवळ्या दुपारी १२.३० च्या सुमारास झालेल्या सूरज केसरीलाल जयस्वाल याच्या खुनाच्या कटात अभियांत्रिकी विद्यार्थी

नागपूर : गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक आणि शेतकरी भवनदरम्यान ९ जून रोजी दिवसाढवळ्या दुपारी १२.३० च्या सुमारास झालेल्या सूरज केसरीलाल जयस्वाल याच्या खुनाच्या कटात अभियांत्रिकी विद्यार्थी असल्याची पोलिसांची माहिती असून या विद्यार्थ्याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेखर मुळे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. पवन चौधरी, असे या आरोपीचे नाव असून तो म्हाळगीनगरच्या गजानन अपार्टमेंट येथील रहिवासी आहे. तो अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. प्राप्त माहितीनुसार अनुराग ऊर्फ अन्या विजय वाघमारे रा. ज्ञानेश्वरनगर, शुभम ऊर्फ पेठ्या सुरेश गजघाटे , आकाश ऊर्फ टिंग्या किसन चव्हाण , स्वप्नील ऊर्फ बाबा बापूराव भोयर सर्व रा. सावित्रीबाई फुलेनगर, शेख सलमान शेख मेहबूब , शेख शाहरुख ऊर्फ भुऱ्या शेख मेहबूब दोन्ही रा. ताजनगर, शुभम शरद चौधरी रा. न्यू बाभुळखेडा, मिर मिश्रा, चिंटू ऊर्फ चिंट्या वाघमारे आणि रुषभ सावंत यांनी तलवारी , दंड्याने हल्ला करून तसेच फुटपाथच्या सिमेंटच्या दगडाने डोके ठेचून सूरजचा खून केला होता. २३ वर्षीय सूरज जयस्वाल हा हिंगण्याचा रहिवासी होता आणि क्रिकेट सट्ट्याची वसुली करायचा. तो पवन चौधरी याला वारंवार भेटून २७ हजाराची मागणी करीत होता. एक-दोन वेळा तो पैशासाठी पवनच्या घरीही गेला होता. ही बाब पवनच्या वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी पवनला हटकलेही होते. सूरज हा आपणाला वारंवार पैसे मागतो, परंतु कशासाठी मागतो हे आपणाला माहीत नाही, असेही त्याने वडिलांना सांगितले होते. पुढे पवन याने सूरजला पैशाबाबत समझोता करण्यासाठी ८ जून रोजी रेशीमबाग येथे बोलावले होते. परंतु त्या दिवशी खुद्द पवन आणि सूरज हे रेशीमबाग येथे गेलेच नव्हते. त्यामुळे त्याने ९ जून रोजी सकाळी ११ वाजता शेतकरीभवनस्थित शर्मा यांच्या दुकानात पैशाबद्दल बातचित करण्यासाठी बोलावले होते. शर्मा हे पवनच्या वडिलाचे मित्र आहेत. सूरज आपणास विशिष्ट वेळी शर्मा यांच्या दुकानात भेटणार असल्याचे पवन याने रुषभ सावंत याला सांगितले होते. दरम्यान, सूरज जयस्वाल याने आपलाच एक मित्र या प्रकरणातील फिर्यादी अक्षय हरिभाऊ दुपारे याची मोटरसायकल आणि मोबाईल गहाण ठेवला होता. त्यामुळे अक्षय हा त्याला आपल्या वस्तू परत मागत होता. घटनेच्या दिवशी त्याने पवनकडून पैसे मिळणार असून मोटरसायकल व मोबाईल परत करतो, असे सांगून त्याला आपल्यासोबत नेले होते. दरम्यान, सूरज हा शर्मा यांच्या दुकानात येणार असल्याची खबर रुषभ याने आपल्या अन्य साथीदारांना दिली होती. त्यामुळे या सर्व आरोपींनी शर्मा यांच्या दुकानासमोर दबा दिला होता. सूरज हा पवनसोबत पैशाची बोलणी करण्यास येताच आरोपींनी त्याला गराडा घातला आणि सशस्त्र हल्ला करून त्याचा खून केला. या खुनाचा कट पवनने रचल्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्याला आरोपी बनवले. अटकेच्या भीतीने त्याने ३० जूनला सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता तो फेटाळण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेंद्र मेंढे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)