शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शौचालयाच्या खड्ड्यात पडल्याने चिमुकल्याचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 9:49 PM

शौचालयाच्या निर्मितीसाठी खोदण्यात आलेल्या सेफ्टी टँकमध्ये पडल्याने पाच वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आर्यन नवदीप राऊत असे या मृत बालकाचे नाव आहे. दवलामेटी ग्रामपंचायततर्फे स्थानिक समाजभवनाजवळ शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. सेफ्टी टॅन्ककरिता खोदलेल्या खड्ड्यात आर्यनचा मृतदेह पाण्यात तरंगत आढळल्याने मंगळवारी सकाळी या परिसरात खळबळ उडाली.

ठळक मुद्देनागपूरनजीकच्या दवलामेटीतील घटना: ग्रामपंचायत प्रशासनाचा निष्काळजीपणा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (वाडी) : शौचालयाच्या निर्मितीसाठी खोदण्यात आलेल्या सेफ्टी टँकमध्ये पडल्याने पाच वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आर्यन नवदीप राऊत असे या मृत बालकाचे नाव आहे. दवलामेटी ग्रामपंचायततर्फे स्थानिक समाजभवनाजवळ शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. सेफ्टी टॅन्ककरिता खोदलेल्या खड्ड्यात आर्यनचा मृतदेह पाण्यात तरंगत आढळल्याने मंगळवारी सकाळी या परिसरात खळबळ उडाली.पोलीस सूत्राच्या माहितीनुसार समाजभवनाच्या काही अंतरावरच नवदीप राऊत यांचे घर आहे. नवदीप राऊत ऑटो चालक आहेत. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आर्यन या परिसरात खेळत होता. आई सारिका घरच्या दैनंदिन कामात व्यस्त होती. घरी आजी-आजोबा आराम करीत होते. आर्यन घरासमोरील पटांगणात खेळत होता, म्हणून घरची मंडळी निश्चिंत होती. भरपूर वेळ होऊन अंधार पडला असतानाही आर्यन घरी न आल्याने राऊत कुटुंबीयांची तारांबळ उडाली. परिवाराने दोन तास इतरत्र शोध घेतला. परंतू आर्यन न मिळाल्याने वडिलांनी वाडी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनीदेखील आर्यनचा मध्यरात्रीपर्यंत शोध घेतला, मात्र तो मिळाला नाही. मंगळवारी पहाटे ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी असलेल्या समाजभवनाच्या नजीक बांधण्यात येत असलेल्या शौचालयाच्या सेफ्टी टँकच्या खड्ड्यात एका मुलाचा मृतदेह तरंगताना दिसला. स्थानिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. मृतदेह बाहेर काढला असता तो आर्यनचाच होता. समाजभवन परिसरात ताराची जाळी लावली असली तरी मुले नेहमी जाळी ओलांडून खेळण्याकरिता जात असतात. हे माहीत असताना खबरदारीची कोणतीही उपाययोजना न केल्याने आणि ऐन पावसाळ्यात शौचालयाचे बांधकाम का सुरू केले, असे प्रश्न निर्माण होत आहेत. स्थानिक प्रशासनाला कंत्राटदाराचे नाव विचारले असता ग्रामपंचायतच हे काम करीत असल्याची माहिती देण्यात आली. परंतु खेमका नावाचा कंत्राटदार हे काम करीत असल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र ग्रा.पं. प्रशासन कंत्राटदाराचे नाव लपवीत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे. तसेच स्थानिक नेते हे प्रकरण दाबत असल्याचीही चर्चा सर्वत्र आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणाने चिमुकल्याचा जीव गेला. आर्यनला नऊ वर्षाचा मोठा भाऊ व दोन वर्षाची लहान बहीण आहे.

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर