शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

राज्यात पुन्हा लोडशेडिंग सुरु; सणासुदीच्या काळात विजेचे भीषण संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 11:57 IST

महावितरणची कसरत : पाऊस कमी झाल्याचा परिणाम

नागपूर : राज्यात पुन्हा लोडशेडिंग सुरू झाले आहे. अपुरा पाऊस झाल्याने विजेची मागणी वाढली आहे. ती पूर्ण करण्यास महावितरण अपयशी ठरत आहे. अशा परिस्थितीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक फिडरवर अर्धा ते एक तास भारनियमन (लोडशेडिंग) सुरू झाले आहे.

महावितरणचे म्हणणे आहे की, ऑगस्ट महिन्यात राज्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. दुसरीकडे मान्सूनच्या पार्श्वभूमीवर महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्रातील अनेक युनिट देखभालीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मागणी आणि पुरवठा यातील अंतर दोन ते तीन हजार मेगावॅटपर्यंत वाढले आहे. महावितरणने ही समस्या सोडविण्यासाठी जी समूहाच्या फिडरवर आकस्मिकपणे लोडशेडिंग सुरू केले आहे.

महावितरणमधील सूत्रांचे म्हणणे आहे की, सध्या विजेची मागणी २६ हजार मेगावॅटपेक्षा अधिक झाली आहे. सर्वसामान्यपणे ऑगस्ट महिन्यात पावसामुळे विजेची मागणी खूप कमी झालेली असते. ही मागणी २२ ते २३ हजार मेगावॅटपर्यंत असते. परंतु यंदा पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी कृषी पंपाचा वापर करावा लागत आहे. एसी, कुलर सुरू असल्याने घरगुती विजेची मागणीसुद्धा कमी झालेली नाही. अशा परिस्थितीत मागणी व पुरवठ्याचे अंतर वाढले आहे.

लोडशेडिंग तात्पुरते

महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी सांगितले की, पुरेसा पाऊस न झाल्याने विजेचे संकट ओढवले आहे. परंतु हे लोडशेडिंग तात्पुरती आहे. शुक्रवारी बंद असलेले वीज युनिट पुन्हा सुरू होतील आणि लोडशेडिंग थांबेल.

अनेक वीज युनिट बंद

महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्रातील अनेक युनिट बंद आहेत. यात चंद्रपूर येथील दोन, नाशिक व पारस येथील प्रत्येकी एक युनिटचा समावेश आहे. दुसरीकडे गॅसच्या कमतरतेमुळे उरण गॅस प्रकल्पही ठप्प पडले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे जलविद्युत प्रकल्पातूनही केवळ १४८९ मेगावॅट वीज मिळत आहे. सोलर प्रकल्पातून रात्री वीज मिळत नसल्याने रात्रीच्या वेळी लोडशेडिंगची समस्या अधिक भीषण होत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमनelectricityवीज