शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

...तर सरकार चालविण्याचे कंत्राट उद्योजकांना देऊन टाका - शिक्षण बचाव समन्वय समिती

By निशांत वानखेडे | Updated: September 30, 2023 17:55 IST

शाळा संकुल, कंत्राटीकरण योजना रद्द करण्याची मागणी

नागपूर : २० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून शाळा संकुलात परिवर्तित करण्यासह दत्तक शाळा योजना व नोकर भरतीचे कंत्राटीकरण करण्याचे जनविरोधी निर्णय महाराष्ट्र सरकारने केले आहेत. हे निर्णय ताबडतोब रद्द करण्यात यावे, अशी मागणी शिक्षण बचाव समन्वय समितीने केली आहे.

निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा समितीचे निमंत्रक रमेश बिजेकर यांनी दिला आहे. शासनाच्या आदेशाने सरकारी शाळा उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव सरकारने केला आहे, असा आरोप त्यांनी केला. शाळांची सार्वजनिक संपत्ती कार्पोरेट्सच्या हातात दिली जात आहे. सरकार सार्वजनिक शिक्षणाचे खासगीकरण करीत आहे. सरकारला शाळा चालविणे जमत नसेल तर पायउतार व्हावे व सरकार चालवायचेही कंत्राट देऊन टाकावे, असे आव्हान त्यांनी दिले.

याशिवाय शाळा संकुलाची संकल्पना म्हणजे गरीब, दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकण्याचा प्रकार आहे. शाळांकडे संसाधने नसल्याचे कारण दिले जाते पण संसाधनाची पूर्तता करण्याऐवजी शाळाच बंद करण्यात येत आहे. त्यामुळे हजारो शिक्षक रिक्त होतील, त्यांचे काय करणार? नदी, नाले ओलांडणारे, दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय होईल, याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही. हा शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करण्याचा प्रकार आहे. शाळा संकुलाच्या मायाजालात महाराष्ट्र सरकार फसले आहे, असा आरोप बिजेकर यांनी केला.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाGovernmentसरकार