शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

हिंदीतून मिळावे रोजगार उपलब्ध करणारे शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:45 PM

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धाचे नवनियुक्त कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ला यांनी हिंदीतून रोजगार उपलब्ध करणारे शिक्षण मिळावे, असे मनोगत व्यक्त केले. हिंदी नेहमी अत्याचाराशी लढणारी भाषा राहिली आहे. या भाषेने परिवर्तन घडविले आहे. आज हीच बाजाराचीही भाषा आहे. मात्र तिला जनाजनाची स्वीकारार्हता मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदी भाषेतून रोजगार देणारे शिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी विविध विषयावर आपले मत मांडले.

ठळक मुद्देमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू रजनीशकुमार शुक्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धाचे नवनियुक्त कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ला यांनी हिंदीतून रोजगार उपलब्ध करणारे शिक्षण मिळावे, असे मनोगत व्यक्त केले. हिंदी नेहमी अत्याचाराशी लढणारी भाषा राहिली आहे. या भाषेने परिवर्तन घडविले आहे. आज हीच बाजाराचीही भाषा आहे. मात्र तिला जनाजनाची स्वीकारार्हता मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदी भाषेतून रोजगार देणारे शिक्षण मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी विविध विषयावर आपले मत मांडले.शब्दांचे आदानप्रदान आवश्यकप्रा. शुक्ला म्हणाले, हिंदी काळानुरुप चालणारी भाषा आहे. हा स्वभाव जतन करून ठेवण्यासाठी वेळेशी जोडून ठेवणे गरजेचे आहे. आजच्या संचार माध्यमात हिंदी भाषेचा वापर वेगाने वाढत असून ही बाब आनंददायक आहे. या विद्यापीठाचा कुलगुरू या नात्याने हिंदीची सेवा करणाऱ्या विविध संस्थांना एकत्रित करून या भाषेचा विस्तार करणे ही माझी जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हिंदीत इतर भारतीय भाषांचे शब्द स्वीकारणे आणि आपले शब्द इतर भाषांना देत राहणे आवश्यक आहे. पूर्वीप्रमाणे हिंदी भाषेत नवीन शब्दांचा अंतर्भाव होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधी, विनोबा, गोळवलकर, लोहिया आदींनी सामान्य नागरिकांच्या अनेक शब्दांचा वापर हिंदीत वाढविला व त्यामुळे नवीन शब्दांचे सृजन होत गेले. आता मात्र तसे होताना दिसत नसल्याची चिंता त्यांनी मांडली.भाषा विकासात शिस्त जरूरीहिंदी भाषिक क्षेत्रातही आज शिकणे व शिकविण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. याचे थेट परिणात हिंदी भाषेवर झाले आहेत. व्याकरण हे जसे भाषेचा कारखाना आहे तशी व्याकरणातून शिस्तही येते. शिस्त नसेल तर तुम्ही शब्दांशी खेळू शकत नाही आणि असे झाले तर ती भाषा अडचणीची आणि कंटाळवाणी वाटते. हिंदी भाषेची अडचण हीच आहे की यामध्ये शब्दांचा जन्म झाला, ते वाढले, दीर्घ काळ वापरले गेले आणि एक दिवस मृतप्रायही झाले. त्यामुळे जेव्हा हिंदीला शब्दांची गरज पडली तेव्हा इंग्रजी भाषेकडून उधार घेण्याची पाळी आली, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. परिस्थिती बदलण्यासाठी हिंदीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने परिवर्तन घडविण्याच्या दिशेने विचार करणे व काम करणे आवश्यक आहे. वर्ध्याचे हिंदी विश्वविद्यालय या दिशेने पुढाकार घेणार असल्याचे प्रा. शुक्ला यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या क्षेत्रातही विस्ताराची भावना त्यांनी व्यक्त केली.प्रा. शुक्ला यांचा परिचयप्रा. रजनीश कुमार शुक्ला हे सध्या भारतीय दार्शनिक संशोधन परिषद, नवी दिल्लीचे सदस्य सचिवपदावर कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ, वाराणसीमध्ये तुलनात्मक दर्शन आणि धर्म या विषयाचे प्राध्यापक तसेच बनारस हिंदू विद्यापीठात न्यायालयाद्वारे मनोनित सदस्य म्हणून कार्य सांभाळले आहे. शिवाय ते दिल्लीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे वाराणसी क्षेत्राच्या सल्लागार समितीचे सदस्य राहिले आहेत. त्यांनी महात्मा गांधी काशी विद्यापीठ, वाराणसी येथे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला व बीएचयूमधून दर्शनशास्त्र विषयात पीएचडी प्राप्त केली. त्यांनी सात पुस्तकांचे लेखन केले असून, त्यांच्या १०० पेक्षा जास्त शोधपत्र, आलेख देश-विदेशातील शोधपत्रिकांमध्ये प्रकाशितही झाले आहेत. त्यांनी कुलसचिव, कार्यकारी परिषदेचे सदस्य, कॉलेज विकास परिषदेचे संचालक आणि इतर अनेक पदांवर राहून विश्वविद्यालयात आपली सेवा दिली आहे.

टॅग्स :hindiहिंदीEducationशिक्षणjobनोकरी