शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

प्लास्टिक प्रदूषणावर 'इकोब्रिक्स'चा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 12:10 IST

Eco Bricks Nagpur News इकोब्रिक्स ही सहज करता येण्याजोगा उपाय आहे. त्याचा उपयोग झाल्यास एकदा उपयोगात येणारे प्लास्टिक किंवा रिसायकल होऊ न शकणाऱ्या प्लास्टिकमुळे जमीन किंवा सागराचे प्रदूषण टाळता येईल, हा यामागचा उद्देश आहे.

ठळक मुद्दे'पर्यावरण संरक्षण गतिविधी'चा उपक्रम ट्रीगार्ड, उद्यानात होईल उपयोग

अंकिता देशकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक संस्था वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत. अशाच प्रकारचा उपाय राष्ट्रीयस्तरावर काम करणाऱ्या 'पर्यारवण संरक्षण गतिविधी'द्वारे 'इकोब्रिक्स'च्या माध्यमातून नागपुरात सुरू केला आहे. घरातील प्लास्टिक कचरा प्लास्टिक बॉटलमध्ये भरून गार्डनच्या लहानसहान कामात त्यांचा विटांप्रमाणे उपयोग करण्याचा हा उपाय आहे.या उपक्रमासाठी काम करणाऱ्या आयाम वेस्ट मॅनेजमेंट संस्थेच्या नॅशनल हेड जुई पांढरीपांडे यांनी इकोब्रिक्सच्या निर्मितीबाबत माहिती दिली. इकोब्रिक्स बनविणे सहज शक्य आहे. प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटलमध्ये घरातील सर्व प्लास्टिकचा कचरा दाबून भरायचा. पूर्णपणे कोंबून घेतल्यावर त्याचे झाकण लावले की इकोब्रिक्स तयार. खरंतर या प्रक्रियेमुळे एक गोष्ट साध्य होते, ती म्हणजे प्लास्टिकचा कचरा घरातील कचऱ्यासोबत सरसकट डम्पिंग यार्डमध्ये पाठविण्याऐवजी प्लास्टिकचे घरातच विलगीकरण होईल. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा मनस्ताप वाचेल. तयार झालेल्या इकोब्रिक्स उद्यानातील ओटे बनविणे, ट्रीगार्ड बनविण्यासोबत टेबल आणि स्टूल बनविण्याच्या कामातही येऊ शकतात. विशेष म्हणजे हरियाणात शौचालयाची भिंत बनविण्यासाठी आणि डेहराडूनमध्ये उद्यानातही त्यांचा यशस्वीपणे वापर करण्याचे आल्याचे जुई यांनी सांगितले.नागपूरमध्ये व्हॉलेन्टियर्सकडून पहिल्या प्रयत्नात अशाप्रकारच्या ५८ विटा तयार करण्यात आल्या. त्यासाठी २५ किलो पॉलिथीन व प्लास्टिकचा वापर करण्यात आला. यामुळे २५ किलो प्लास्टिक कचरा पर्यावरणात जाण्यापासून वाचला आणि ४०० चौरस मीटर जमीन व जलस्रोताचे संरक्षण झाले. सध्या दीक्षाभूमी चौकातील ब्लाईंड रिलिफ असोसिएशन येथे इकोब्रिक्स कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आले आहे. तुम्ही इकोब्रिक्सप्रमाणे उपयोग जरी केला नाही तरी या प्रक्रियेमुळे घरातच प्लास्टिकचे विलगीकरण होईल आणि डम्पिंग यार्डमध्ये प्लास्टिक वेगळे करण्याची डोकेदुखी राहणार नाही, अशी भावना जुई यांनी व्यक्त केली.इकोब्रिक्स ही सहज करता येण्याजोगा उपाय आहे. त्याचा उपयोग झाल्यास एकदा उपयोगात येणारे प्लास्टिक किंवा रिसायकल होऊ न शकणाऱ्या प्लास्टिकमुळे जमीन किंवा सागराचे प्रदूषण टाळता येईल, हा यामागचा उद्देश आहे.- जुई पांढरीपांडे

टॅग्स :environmentपर्यावरण