शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

नागपूरला सकाळीच बसले भुकंपाचे हादरे; तेलंगणा भूकंपाचा केंद्रबिंदू

By निशांत वानखेडे | Updated: December 4, 2024 17:19 IST

केंद्र ३०० किमी दूर तेलंगनात : यावर्षी १० पेक्षा अधिक वेळा बसले धक्के

निशांत वानखडे 

नागपूर : बुधवारी सकाळी दरम्यान नागपूरकरांनाभूकंप झाल्यासारखे जाेरदार हादरे बसले. विशेषत: उत्तर नागपूरच्या नागरिकांना हा भीतीदायक अनुभव आला. विशेष म्हणजे भुकंपाचे केंद्र शहरापासून ३०० किमी दूर तेलंगनाच्या मुलुगु येथे हाेते, पण त्या धक्क्याने नागपूरकरांनाही हलवून साेडले.

सकाळी ७.२७ वाजताच्या सुमारास शहरात सिव्हील लाईन्ससह जरीपटका, जाफरनगर, मानकापूर या भागात नागरिकांना हादरे बसले. कामठी शहरातही असेच धक्के जाणवले. या भागातील इमारतीत काहीतरी थरथरल्यासारखे झाल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे अनेक भागात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरातही जाेरदार हालचाल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते. हे हादरे काही सेकंदापुरते असले तरी नागरिकांना धडकी भरण्यास पुरेसे हाेते. त्यामुळे लाेकांचे या हादऱ्याचे अनुभव साेशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. शेजारच्या राज्यात भुकंप आल्याने शहरातील वेगवेगळ्या कोपऱ्यांतील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यांच्या परिसरातील वस्तू आणि संरचना हादरल्याचे दिसले. भूकंपाचे धक्के लक्षात आल्यानंतर जवळपासच्या ग्रामीण भागातील घाबरलेले ग्रामस्थ घराबाहेर पडले. भूकंपाच्या वृत्ताने सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि त्यामुळे प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार भुकंपाचे केंद्र येथून सुमारे ३०० किमी दूर तेलंगणातील मुलुगु येथे हाेते व येथे ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नाेंद करण्यात आली. एवढ्या तीव्रतेमुळे दूरवर हादरे बसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नागपूर हे सिस्मिक झोन-२ अंतर्गत सुरक्षित क्षेत्र म्हणून वर्गीकृत असल्याने शहरात भुकंपाचा कुठलाही धाेका नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी नागरिकांना जिल्ह्यात काहीही माेठे घडले नसून घाबरण्याची गरज नाही, असा दिलासा देत आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.

यावर्षी जानेवारीपासूनच भूकंपाच्या नाेंदी

विशेष म्हणजे यावर्षी जानेवारीपासूनच नागपूरकरांना भूकंपाचे साैम्य हादरे बसले. आतापर्यंत किमान १२ वेळा नागपूरच्या आसपास भुकंपाच्या नाेंदी झाल्या आहेत. मात्र भुकंपाची तीव्रता २.६ ते २.८ च्या रेंजमध्ये हाेती. ऑक्टाेबर महिन्यात १२० किमी दूर सिवनी येथे धक्के जाणवले, तर ३० सप्टेंबरला अमरावतीच्या मेळघाट भागात ४.२ तीव्रतेचा भुकंपाची नाेंद आहे. या भागात भुकंपाच्या घटना का वाढत आहेत, यावर भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागातर्फे अभ्यास केला जात आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपnagpurनागपूरTelanganaतेलंगणा