शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

नागपूरला सकाळीच बसले भुकंपाचे हादरे; तेलंगणा भूकंपाचा केंद्रबिंदू

By निशांत वानखेडे | Updated: December 4, 2024 17:19 IST

केंद्र ३०० किमी दूर तेलंगनात : यावर्षी १० पेक्षा अधिक वेळा बसले धक्के

निशांत वानखडे 

नागपूर : बुधवारी सकाळी दरम्यान नागपूरकरांनाभूकंप झाल्यासारखे जाेरदार हादरे बसले. विशेषत: उत्तर नागपूरच्या नागरिकांना हा भीतीदायक अनुभव आला. विशेष म्हणजे भुकंपाचे केंद्र शहरापासून ३०० किमी दूर तेलंगनाच्या मुलुगु येथे हाेते, पण त्या धक्क्याने नागपूरकरांनाही हलवून साेडले.

सकाळी ७.२७ वाजताच्या सुमारास शहरात सिव्हील लाईन्ससह जरीपटका, जाफरनगर, मानकापूर या भागात नागरिकांना हादरे बसले. कामठी शहरातही असेच धक्के जाणवले. या भागातील इमारतीत काहीतरी थरथरल्यासारखे झाल्याचे नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे अनेक भागात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरातही जाेरदार हालचाल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते. हे हादरे काही सेकंदापुरते असले तरी नागरिकांना धडकी भरण्यास पुरेसे हाेते. त्यामुळे लाेकांचे या हादऱ्याचे अनुभव साेशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. शेजारच्या राज्यात भुकंप आल्याने शहरातील वेगवेगळ्या कोपऱ्यांतील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्यांच्या परिसरातील वस्तू आणि संरचना हादरल्याचे दिसले. भूकंपाचे धक्के लक्षात आल्यानंतर जवळपासच्या ग्रामीण भागातील घाबरलेले ग्रामस्थ घराबाहेर पडले. भूकंपाच्या वृत्ताने सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि त्यामुळे प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार भुकंपाचे केंद्र येथून सुमारे ३०० किमी दूर तेलंगणातील मुलुगु येथे हाेते व येथे ५.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नाेंद करण्यात आली. एवढ्या तीव्रतेमुळे दूरवर हादरे बसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नागपूर हे सिस्मिक झोन-२ अंतर्गत सुरक्षित क्षेत्र म्हणून वर्गीकृत असल्याने शहरात भुकंपाचा कुठलाही धाेका नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी नागरिकांना जिल्ह्यात काहीही माेठे घडले नसून घाबरण्याची गरज नाही, असा दिलासा देत आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.

यावर्षी जानेवारीपासूनच भूकंपाच्या नाेंदी

विशेष म्हणजे यावर्षी जानेवारीपासूनच नागपूरकरांना भूकंपाचे साैम्य हादरे बसले. आतापर्यंत किमान १२ वेळा नागपूरच्या आसपास भुकंपाच्या नाेंदी झाल्या आहेत. मात्र भुकंपाची तीव्रता २.६ ते २.८ च्या रेंजमध्ये हाेती. ऑक्टाेबर महिन्यात १२० किमी दूर सिवनी येथे धक्के जाणवले, तर ३० सप्टेंबरला अमरावतीच्या मेळघाट भागात ४.२ तीव्रतेचा भुकंपाची नाेंद आहे. या भागात भुकंपाच्या घटना का वाढत आहेत, यावर भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागातर्फे अभ्यास केला जात आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपnagpurनागपूरTelanganaतेलंगणा