शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

प्रत्येक कॉलेजला लावावी लागणार ५०० झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:55 AM

२०१९ या वर्षभरात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम वनविभागातर्फे हाती घेण्यात आला आहे. यालाच हातभार लागावा यासाठी ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन) पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देवृक्षारोपणासाठी खोदलेल्या खड्ड्यांचीही माहिती मागितलीडीटीईचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ या वर्षभरात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम वनविभागातर्फे हाती घेण्यात आला आहे. यालाच हातभार लागावा यासाठी ‘डीटीई’ने (डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन) पुढाकार घेतला आहे. ‘डीटीई’च्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी प्रत्येकी ५०० वृक्षांची लागवड करावी, असे निर्देश नुकतेच देण्यात आले आहेत. नागपूर विभागातील सर्व अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट, एमबीए व एमसीए संस्थांच्या प्राचार्यांना यासंदर्भातील पत्रदेखील पाठविण्यात आले आहेत.३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयांमधील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांची वनविभागातर्फे तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर ‘ग्रीन आर्मी’ म्हणून नोंदणी करायची आहे. याशिवाय वृक्षारोपणासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांबाबतचा अहवालदेखील सादर करायचा आहे. यासंदर्भात ‘डीटीई’ने २४ एप्रिल रोजीच सर्व महाविद्यालयांना पत्र लिहिले होते. मात्र बहुतांश जणांनी हे पत्र गंभीरतेने घेतले नाही. त्यामुळे विभागीय प्रभारी सहसंचालक डॉ.चंद्रशेखर थोरात यांनी सर्व महाविद्यालयांची पत्र लिहून यासंदर्भात विचारणा केली आहे. शासन तसेच महसूल विभागाकडून अहवालासंदर्भात वारंवार विचारणा होत आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी खड्ड्यांची माहिती संकेतस्थळावर ‘अपलोड’ करावी तसेच ‘डीटीई’ला सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.३३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत विभागाला २६ हजार ६०० झाडे लावायची आहेत. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयाने ५०० झाडे लावावी, अशी सूचनादेखील डॉ.थोरात यांनी दिली आहे. केवळ लेखी माहिती न देता संबंधित वृक्षारोपणाची छायाचित्रेदेखील सादर करावीत तसेच सर्व संस्थांनी निर्देशांचे पालन करावे व पर्यावरण संवर्धनास मदत करावी, असे निर्देशदेखील देण्यात आले आहेत.अगोदरच्या मोहिमांचे काय झाले ?२०१३ सालीदेखील राज्य शासनाच्या पुढाकारानंतर ‘डीटीई’ने सर्व महाविद्यालयांना प्रत्येक १०० वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्याचा अहवालदेखील महाविद्यालयांकडून मागविला होता. मात्र अनेक महाविद्यालयांनी याकडे दुर्लक्षच केले. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तसेच महाविद्यालयांनी लावलेल्यापैकी नेमके किती वृक्ष जगले याची माहितीदेखील उपलब्ध नाही.

टॅग्स :collegeमहाविद्यालय