शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

कळमना बाजार समितीत ई-लिलावाकडे कानाडोळा

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 8, 2023 18:56 IST

Nagpur News सरकारने राज्यातील बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन लिलाव पद्धत सुरू केली. ही पद्धत शेतकरी, व्यापारी आणि आडतियांना समजत नाही, असे ग्राह्य धरून या पद्धतीकडे कळमना बाजार समितीने कानाडोळा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. 

मोरेश्वर मानापुरे 

नागपूर : शेतकाऱ्यांच्या शेतीमालाला चांगला दर मिळावा, शेतीमालाच्या आवकेपासून ते दरापर्यंतची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, या हेतूने सरकारने राज्यातील बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन लिलाव पद्धत सुरू केली. ही पद्धत शेतकरी, व्यापारी आणि आडतियांना समजत नाही, असे ग्राह्य धरून या पद्धतीकडे कळमना बाजार समितीने कानाडोळा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप काही व्यापाऱ्यांनी केला आहे. 

समितीच्या आवारात ई-लिलाव पद्धतीची चौकशी केली असता ही पद्धत आम्हाला माहीत नसल्याचे काही शेतकरी म्हणाले. शेतीमाल प्रत्यक्ष पाहल्यानंतर आणि सात ते आठ खरेदीदार जागेवर असल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने मिळालेल्या दरावर शेतकरी समाधानी असतात, असे काही व्यापाऱ्यांचे मत आहे. शिवाय कळमन्यातील प्रत्येक बाजारातील आडतिया ई-लिलाव पद्धतीला अनुकूल नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पुढील काही वर्षे कळमन्यात ई-लिलाव पद्धत सुरू होण्याची काहीच शक्यता नाही. ऑनलाईन पद्धतीने शेतीमालाचा लिलाव करण्यासाठी केंद्र सरकारने ३० लाख रुपयांची यंत्रणा समितीत बसविली आहे. पण ती धुळखात आहे.

एका क्लिकवर कळतात विविध वस्तूंचे दरराज्यात ३०५ बाजार समित्या कार्यरत आहेत. कांद्यापासून पालेभाज्यापर्यंत जवळपास ३५० वस्तूंचे दर एका क्लिकवर ऑनलाइन लिलाव पद्धतीमुळे समजू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळून त्यांना फायदाच होतो आणि व्यवहारात पारदर्शकता आल्यामुळे शेतकऱ्यांच्या फसवणुकीला आळा बसतो. ऑनलाईन लिलाव पद्धतीने शेतीमालाला नेमक्या कोणत्या बाजार समितीमध्ये चांगला दर मिळाला, याची माहिती एकाच ठिकाणी शेतकरी पाहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि चांगला दर मिळेल, तेथेच शेतीमालाची विक्री करणे शेतकऱ्यांना शक्य होते. त्यानंतरही ऑनलाईन लिलाव पद्धतीचा स्वीकार कळमना समितीने अद्याप केलेला नाही.

ऑनलाइन लिलाव शेतकरी व व्यापाऱ्यांना कळलाच नाहीऑनलाइन लिलाव पद्धतीने बाजार समितीच्या गेटवर कोणत्या शेतीमालाची किती आवक झाली, कोणत्या शेतकऱ्याचा किती शेतीमाल आहे, त्याचा खरेदीदार, एजंट अथवा व्यापारी कोण आहे, तसेच लिलावात काय दर मिळाला आहे, कोणत्या व्यापाऱ्याने बोली लावली आदी माहिती ऑनलाइन उपलब्ध होते. सरकारने या संदर्भात कार्यशाळा घेतलेली नाही. त्यामुळे व्यापारी, आडतिया आणि शेतकऱ्यांना ही पद्धतच अजूनही कळलेली नाही.अतुल सेनाड, अध्यक्ष, कळमना धान्य बाजार आडतिया असोसिएशन.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड