शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बांधकामांमुळे जिकडेतिकडे धूळ, प्रदूषण उपाययोजनेकडेच दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 17:31 IST

संबंधित विभाग म्हणतात, पाहू, बघू, करू : निव्वळ चालढकल सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकाच भागात वारंवार मोठमोठे बांधकाम होत असल्यास त्या भागात वायू प्रदूषणात प्रचंड वाढ होते. ही परिस्थिती सध्या धंतोली आणि रामदासपेठेतील नागरिक अनुभवत आहेत. धुळीचे लोट रस्त्यावर पसरले आहेत. परिसरात पार्क केलेल्या वाहनांवर साचलेल्या मातीच्या थरावरून लक्षात येते की, किती मोठ्या प्रमाणात वातावरणात धुळीचे कण पसरले आहेत. प्रदूषण नियंत्रणात आणण्याची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनात स्थानिक प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे. पण या यंत्रणांना प्रदूषणाची फारशी गंभीरता नसल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारचे पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय असून, बांधकाम तसेच पाडकामातून निर्माण होणारा कचरा तसेच घनकचरा यांच्या पर्यावरणदृष्ट्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये काही तरतुदी सांगितलेल्या आहेत. या तरतुदीनुसार बांधकामामुळे होत असलेल्या प्रदूषणावर उपाययोजना करणे व करवून घेण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनात स्थानिक स्वराज्य संस्थांना उपाययोजना करायच्या आहेत. नागपूर शहरामध्ये मोठ्या इमारतींच्या बांधकामाला महापालिकेच्या नगररचना विभागाकडून मंजुरी मिळत असल्याने आणि महापालिकेत पर्यावरण विभाग असल्याने नवीन बांधकामामुळे होत असलेल्या प्रदूषणावर उपाययोजना नगररचना व पर्यावरण विभागाकडून करायच्या आहेत. 

प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी करायच्या उपाययोजना धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धुके विरोधी गनचा वापर, हिरवे आच्छादन, बांधकाम साईटच्या भोवताली उच्च-उंचीचे अडथळे आणि नियमितपणे पाणी शिंपडणे. पाण्याचे फवारे आणि विंडब्रेक वापरणे यासारखे अनेक उपाय आवश्यक आहेत. बांधकाम साईटवर त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे, साईट व्यवस्थापक किंवा कंत्राटदाराचे कर्तव्य आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणते, महापालिकेची जबाबदारी 'लोकमत'ने रामदासपेठ, धंतोलीचा धुळीमुळे गुदमरतो श्वास या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. हे प्रदूषण कोण नियंत्रणात आणणार यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की, ही जबाबदारी महापालिकेच्या नगररचना व पर्यावरण विभागाची आहे. नगररचना विभागाकडे काय उपाययोजना करणार, अशी विचारणा केली असता, त्यांच्याकडून सांगण्यात आले की, साईटवर जाऊन काय उपाययोजना करता येईल ते पाहू

"महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने २७ ऑक्टोबर २०२३ रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे बांधकाम तसेच पाडकामामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी अधिकाऱ्यांसाठी 'वायू प्रदूषण उपशमनासाठीची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बांधकाम आणि पाडकाम उपक्रमांमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व संस्था, प्राधिकरणाने पर्यावरण कायद्याच्या अनुषंगाने उपाययोजना करून घेणे गरजेचे आहे. पण तसे होत नाही." -नफीस शेख, पर्यावरण रिसर्च अँड ॲनालेसिस फाउंडेशन

टॅग्स :nagpurनागपूरpollutionप्रदूषण