शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

कर्जदार शेतकऱ्यांमुळे तरतेय ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 6:23 PM

पीक विम्याचा लाभच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविण्याकडे पाठ फिरविली आहे. नागपूर विभागात केवळ ४९०८ हजार शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष विमा काढला आहे. पण कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीने विमा काढावा लागत असल्याने, पीक विम्याचा आकडा फुगलेला दिसतो आहे. खऱ्या अर्थाने कर्जदार शेतकऱ्यांमुळे ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ राबविणाऱ्या खासगी विमा कंपन्या तरल्या आहेत.

ठळक मुद्देविभागात केवळ ४९०० शेतकऱ्यांनी काढला प्रत्यक्ष पीक विमा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पीक विम्याचा लाभच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविण्याकडे पाठ फिरविली आहे. नागपूर विभागात केवळ ४९०८ हजार शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष विमा काढला आहे. पण कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीने विमा काढावा लागत असल्याने, पीक विम्याचा आकडा फुगलेला दिसतो आहे. खऱ्या अर्थाने कर्जदार शेतकऱ्यांमुळे ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ राबविणाऱ्या खासगी विमा कंपन्या तरल्या आहेत.गेल्यावर्षी पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांची थट्टाच झाली होती. १०० ते ५०० रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला होता. नागपूर जिल्ह्यातील एका तालुक्यात केवळ एकाच शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळाला होता. गेल्यावर्षी नागपूर विभागात अडीच लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ५४ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. त्यामुळे पीक विमा योजना फसवी असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत होती. पीक विम्यावर विश्वासच नसल्याने नागपूर विभागात यावर्षी केवळ ४९०० शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष विमा उतरविला. परंतु शेतीसाठी बँकेचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा काढणे सक्तीचे केले आहे. त्याचा फायदा पीक विमा कंपन्यांना झाला आहे. नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात कर्ज घेतलेल्या २,२२,७६२ शेतकऱ्यांना सक्तीने पीक विमा काढावा लागला आहे.

नागपूर विभागात कर्जदार शेतकऱ्यांनी काढलेला विमा

जिल्हा                  शेतकरी संख्यावर्धा                      ३६८१७नागपूर                 ४६,६१३भंडारा                 ६४,२११गोंदिया                ४१,६४७चंद्रपूर                 ४६,७४८गडचिरोली          २१,७६२ 

नागपूर विभागात बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी काढला विमा

जिल्हा               शेतकरी संख्यावर्धा                    ५०९नागपूर                १८६भंडारा                २१३गोंदिया               ९४चंद्रपूर                 ३२५२गडचिरोली          ६५४

शेतकरी वैयक्तिक विमा काढत नसेल तर, सहाजिकच आहे पीक विमा योजना ही फसवी आहे. तरी सरकार ही पॉलिसी राबवित आहे. कारण कंपन्यांना त्याच्यापासून फायदा मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना टार्गेट केले जात आहे. राम नेवले, शेतकरी नेते शेतकऱ्यांसाठी विमा खरोखरच लाईफलाईन आहे. परंतु त्यावर सरकारने नियंत्रण असायला हवे. सरकारने विम्याची जबाबदारी खाजगी कंपन्यांच्या हाती दिली आहे आणि कंपन्यांकडे झालेले नुकसान मोजण्याची कुठलीही यंत्रणा नाही. शिवाय नुकसानीनंतर अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या अहवालाकडेही दूर्लक्ष केले जात असल्याने नुकसान होऊनही हजारो शेतकरी विम्यापासून वंचित राहत आहे. आज शेतकऱ्यांचा पीक विम्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे वैयक्तिक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. कंपन्यांना टिकविण्यासाठी सरकार कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याची सक्ती करीत आहे.  श्रीधर ठाकरे, शेतीतज्ञ

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी