शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे का ? नाना पटोले यांचा थेट सवाल

By कमलेश वानखेडे | Updated: July 29, 2023 15:56 IST

भिडेंना तातडीने अटक करा, नाही तर पुन्हा विधिमंडळात हा प्रश्न उचलू

नागपूर : संभाजी भिडे हे सातत्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक विधान करीत आहेत. भीमा कोरेगाव घटना घडली त्यासाठी भिडे जबाबदार होते. भिडे यांना तातडीने अटक करा, अशी मागणी आधीच विधिमंडळात केली आहे. दोन तीन दिवसात अटक केली नाही तर पुन्हा विधिमंडळात हा प्रश्न उचलू, असा इशारा देत भाजपला भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे का, असा थेट सवाल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी शनिवारी नागपुरात केला.

पटोले म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक लिहिणाऱ्या जाहीर फाशी देण्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले. आता फडणवीस भिडे यांना जाहीर फाशी देतील का? महाराष्ट्रातील लोकं संयम ठेवून आहे. त्यांची परीक्षा घेऊ नका. संयम सुटला तर लोकं यांना पळता भुई थोडे करतील, असा इशाराही पटोले यांनी दिला. काँग्रेस पक्ष भाजप विरोधात लढा देत आहे. इतर पक्षांनी (शरद पवार) काय करावे हे त्यांनी ठरवावे. आमचे धोरण स्पष्ट आहे की भाजप विरोधात लढताना जे आमच्या सोबत येतील त्यांनी यावे, असेही त्यांनी सांगितले.

तेंलगणातील धरणामुळे महाराष्ट्रात पूर

 चंद्रपूर येथे गेल्या दोन वर्षात पूररेषा ओलांडून घरे बांधण्यात आलेली नाहीत. तेलंगणा मध्ये बांधलेल्या धरणामुळे सर्व समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीला फुग येते. भाजप सत्तेत असताना नियम डावलून तेलंगणाने धरण बांधले चायाच फटका आता महाराष्ट्राला बसत असल्याचेही पटोले म्हणाले.

गुजरातमधील लोकांनी नानारमध्ये जमिनी घेतल्या

- भाजपशी संबंधित असलेल्या गुजरातमधील लोकांनी नानार येथे जमिनी घेतल्या आहेत. जेव्हा यादी समोर येईल तेव्हा धक्का बसेल. हे सर्व जमिनीच्या मोबदल्यासाठी होत आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे हे प्रकार आहेत. नाणार मध्ये जमीन घेणाऱ्यांची नावे सरकारने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

ठाणे, नागपुरात लोक सुरक्षित नाही

- महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था योग्य नाही. फक्त मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात नाही तर उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातही लोक सुरक्षित नाहीत. नागपुरात तर एका दिवसात चार लोकांची हत्या होत आहे. हे चित्र भयावह असल्याची टीका पटोले यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाcongressकाँग्रेस