शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाजपला भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे का ? नाना पटोले यांचा थेट सवाल

By कमलेश वानखेडे | Updated: July 29, 2023 15:56 IST

भिडेंना तातडीने अटक करा, नाही तर पुन्हा विधिमंडळात हा प्रश्न उचलू

नागपूर : संभाजी भिडे हे सातत्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक विधान करीत आहेत. भीमा कोरेगाव घटना घडली त्यासाठी भिडे जबाबदार होते. भिडे यांना तातडीने अटक करा, अशी मागणी आधीच विधिमंडळात केली आहे. दोन तीन दिवसात अटक केली नाही तर पुन्हा विधिमंडळात हा प्रश्न उचलू, असा इशारा देत भाजपला भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे का, असा थेट सवाल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी शनिवारी नागपुरात केला.

पटोले म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक लिहिणाऱ्या जाहीर फाशी देण्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले. आता फडणवीस भिडे यांना जाहीर फाशी देतील का? महाराष्ट्रातील लोकं संयम ठेवून आहे. त्यांची परीक्षा घेऊ नका. संयम सुटला तर लोकं यांना पळता भुई थोडे करतील, असा इशाराही पटोले यांनी दिला. काँग्रेस पक्ष भाजप विरोधात लढा देत आहे. इतर पक्षांनी (शरद पवार) काय करावे हे त्यांनी ठरवावे. आमचे धोरण स्पष्ट आहे की भाजप विरोधात लढताना जे आमच्या सोबत येतील त्यांनी यावे, असेही त्यांनी सांगितले.

तेंलगणातील धरणामुळे महाराष्ट्रात पूर

 चंद्रपूर येथे गेल्या दोन वर्षात पूररेषा ओलांडून घरे बांधण्यात आलेली नाहीत. तेलंगणा मध्ये बांधलेल्या धरणामुळे सर्व समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीला फुग येते. भाजप सत्तेत असताना नियम डावलून तेलंगणाने धरण बांधले चायाच फटका आता महाराष्ट्राला बसत असल्याचेही पटोले म्हणाले.

गुजरातमधील लोकांनी नानारमध्ये जमिनी घेतल्या

- भाजपशी संबंधित असलेल्या गुजरातमधील लोकांनी नानार येथे जमिनी घेतल्या आहेत. जेव्हा यादी समोर येईल तेव्हा धक्का बसेल. हे सर्व जमिनीच्या मोबदल्यासाठी होत आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे हे प्रकार आहेत. नाणार मध्ये जमीन घेणाऱ्यांची नावे सरकारने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

ठाणे, नागपुरात लोक सुरक्षित नाही

- महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था योग्य नाही. फक्त मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात नाही तर उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातही लोक सुरक्षित नाहीत. नागपुरात तर एका दिवसात चार लोकांची हत्या होत आहे. हे चित्र भयावह असल्याची टीका पटोले यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाcongressकाँग्रेस