शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

भाजपला भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे का ? नाना पटोले यांचा थेट सवाल

By कमलेश वानखेडे | Updated: July 29, 2023 15:56 IST

भिडेंना तातडीने अटक करा, नाही तर पुन्हा विधिमंडळात हा प्रश्न उचलू

नागपूर : संभाजी भिडे हे सातत्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक विधान करीत आहेत. भीमा कोरेगाव घटना घडली त्यासाठी भिडे जबाबदार होते. भिडे यांना तातडीने अटक करा, अशी मागणी आधीच विधिमंडळात केली आहे. दोन तीन दिवसात अटक केली नाही तर पुन्हा विधिमंडळात हा प्रश्न उचलू, असा इशारा देत भाजपला भिडेंचा वापर करुन महाराष्ट्राचे मणिपूर करायचे आहे का, असा थेट सवाल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी शनिवारी नागपुरात केला.

पटोले म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अवमानकारक लिहिणाऱ्या जाहीर फाशी देण्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले. आता फडणवीस भिडे यांना जाहीर फाशी देतील का? महाराष्ट्रातील लोकं संयम ठेवून आहे. त्यांची परीक्षा घेऊ नका. संयम सुटला तर लोकं यांना पळता भुई थोडे करतील, असा इशाराही पटोले यांनी दिला. काँग्रेस पक्ष भाजप विरोधात लढा देत आहे. इतर पक्षांनी (शरद पवार) काय करावे हे त्यांनी ठरवावे. आमचे धोरण स्पष्ट आहे की भाजप विरोधात लढताना जे आमच्या सोबत येतील त्यांनी यावे, असेही त्यांनी सांगितले.

तेंलगणातील धरणामुळे महाराष्ट्रात पूर

 चंद्रपूर येथे गेल्या दोन वर्षात पूररेषा ओलांडून घरे बांधण्यात आलेली नाहीत. तेलंगणा मध्ये बांधलेल्या धरणामुळे सर्व समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीला फुग येते. भाजप सत्तेत असताना नियम डावलून तेलंगणाने धरण बांधले चायाच फटका आता महाराष्ट्राला बसत असल्याचेही पटोले म्हणाले.

गुजरातमधील लोकांनी नानारमध्ये जमिनी घेतल्या

- भाजपशी संबंधित असलेल्या गुजरातमधील लोकांनी नानार येथे जमिनी घेतल्या आहेत. जेव्हा यादी समोर येईल तेव्हा धक्का बसेल. हे सर्व जमिनीच्या मोबदल्यासाठी होत आहे. मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे हे प्रकार आहेत. नाणार मध्ये जमीन घेणाऱ्यांची नावे सरकारने जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

ठाणे, नागपुरात लोक सुरक्षित नाही

- महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था योग्य नाही. फक्त मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात नाही तर उपमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातही लोक सुरक्षित नाहीत. नागपुरात तर एका दिवसात चार लोकांची हत्या होत आहे. हे चित्र भयावह असल्याची टीका पटोले यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाcongressकाँग्रेस