शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

‘युव्ही’द्वारे करा मोबाईल, भाज्यांचे निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:29 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन वापरातील गोष्टींच्या स्वच्छतेकडे विशेष भर दिला जात आहे. आवश्यक गरज बनलेला मोबाईलला द्रव पदार्थांनी स्वच्छ करणे जिकीरीचे काम आहे. हीच बाब लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राध्यापकाने संशोधन केले व अल्ट्राव्हायोलेट तंत्रज्ञानाच्या आधारावर चालणाऱ्या दोन उपकरणांची निर्मिती करण्यात त्यांना यश आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन वापरातील गोष्टींच्या स्वच्छतेकडे विशेष भर दिला जात आहे. आवश्यक गरज बनलेला मोबाईलला द्रव पदार्थांनी स्वच्छ करणे जिकीरीचे काम आहे. हीच बाब लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राध्यापकाने संशोधन केले व अल्ट्राव्हायोलेट तंत्रज्ञानाच्या आधारावर चालणाऱ्या दोन उपकरणांची निर्मिती करण्यात त्यांना यश आले. या उपकरणांच्या उपयोगाने मोबाईल फोनसह भाज्यांचेदेखील सहज निर्जंतुकीकरण करणे शक्य होणार आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे. नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ. संजय ढोबळे व अमृतसर येथील डीएव्ही महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक विभा चोप्रा यांनी हे संशोधन केले आहे.कोरोनावर अद्याप लस किंवा औषध मिळालेले नाही. यामुळे वापरातील वस्तूंचे निर्जंतुकीकरण आवश्यक झाले आहे. सर्वसामान्यपणे मोबाईल फोन लोक बहुतांश जागी घेऊनच जातात. मोबाईल फोनवर कोरोनाचा विषाणू ९६ तासांपर्यंत राहू शकतो असा दावा जगातील संशोधकांनी केला आहे. तर भाज्यांना शेत ते बाजार या प्रवासात विविध लोकांचे हात लागलेले असतात. त्यातून विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे दोन्ही प्राध्यापकांनी यासंदर्भात संशोधनावर भर दिला. त्यांनी युव्ही तंत्रज्ञानावर चालणाऱ्या दोन उपकरणांची निर्मिती केली. दोन्हीचे पेटंट दाखल केले आहे. दवाखाने, कार्यालये, पोलीस स्थानक, शाळा, महाविद्यालये येथे त्यांचा उपयोग होऊ शकतो, अशी माहिती डॉ.संजय ढोबळे यांनी दिली.

असे चालते उपकरणअल्ट्राव्हायोलेट लाईटचा उपयोग करुन निर्जंतुकीकरण करण्यात येते. यात कुठलेही रसायन वगैरे राहत नाही. शिवाय निर्जंतुकीकरणामुळे स्मार्ट फोन, ताजी फळे, भाजीपाला, खाद्य पदार्थ, कपडे इत्यादी खराब होत नाहीत. हे उपकरण रेडिएशन तत्त्वावर तयार केले आहे. त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट लॅम्प बंद केल्यानंतर हे उपकरण कुठेलच डिसइन्फेक्टंट मागे सोडत नाही. हे उपकरण सर्व बाजूंनी बंद असून त्यामुळे निर्जंतुकीकरणाचे नेमके प्रमाण मोजणे देखील शक्य आहे, असे डॉ.संजय ढोबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtechnologyतंत्रज्ञान