शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

‘महाज्योती’ला जे जमले ते ‘बार्टी’ला का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 12:28 IST

दर्जेदार शैक्षणिक प्रशिक्षणासह रोजगार निर्मितीसाठी जे महाज्योतीने करून दाखविले ते अनेक वर्षांपासून बार्टीला का जमले नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना नि:शुल्क टॅब, सीए, सीएससह कमर्शिअल पायलटचेही प्रशिक्षण

आनंद डेकाटे

नागपूर : ‘बार्टी’ ही संस्था मागील कित्येक वर्षांपासून संशोधन व प्रशिक्षणाचे कार्य करीत आहे; परंतु भटके विमुक्त व ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘महाज्योती’ने अवघ्या सव्वावर्षात जे करून दाखविले, त्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. दर्जेदार शैक्षणिक प्रशिक्षणासह रोजगार निर्मितीसाठी जे महाज्योतीने करून दाखविले ते अनेक वर्षांपासून बार्टीला का जमले नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

यूपीएससी, एमपीएससी विद्यार्थ्यांना परीक्षापूर्व प्रशिक्षण देण्याचे कार्य बार्टी अनेक वर्षांपासून करीत आहे. महाज्योतीने यापुढे जात यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीतील नामवंत प्रशिक्षण संस्थेमार्फत ८३० उमेदवारांना मुख्य परीक्षेपर्यंत ऑनलाइन प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. परीक्षेच्या नोंदणीकृत उमेदवारांना मोफत टॅब व दररोज ६ जीबी डेटा दिला. यूपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी एकरकमी प्रत्येकी २५ हजार रुपयापर्यंत अर्थसाहाय्याची तरतूदही आहे.

संशोधन शिष्यवृत्तीअंतर्गत पीएच.डी.साठी ६३१ उमेदवारांची, तर एमफिलच्या ७३ उमेदवारांची निवड करण्यात आली. बार्टी मात्र एका वर्षी केवळ २०० विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती प्रदान करते. महाज्योतीने सीए, सीएस व बँकिंगच्या प्रशिक्षणासह कमर्शिअल पायलटचेही प्रशिक्षण सुरू केले आहे. औरंगाबाद येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक प्रोसेसिंग (सिपेट) या नामवंत प्रशिक्षण संस्थेमार्फत मशीन ऑपरेटर टूल रूम, टेक्निशियन, टेक्निकल सपोर्ट, जनरल ड्युटी असिस्टंट आदी कोर्सेसचे ४५०० उमेदवारांना प्रशिक्षण दिले जात आहे. जेईई, नीट, एसएच-सीईटी परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी महाज्योतीने नागपूर कार्यालयात ४ अद्ययावत स्टुडिओ उभारले असून, अनुभवी लोकांकडून प्रशिक्षण दिले जात आहे.

बार्टीने ‘सी-डॅक’चे प्रशिक्षण केले बंद

बार्टीतर्फे ‘सी-डॅक’चे प्रशिक्षण दिले जात हाेते. यात आयटी क्षेत्रातील मुलांना हमखास रोजगार मिळत होता. २०१५, २०१६ व २०१७ साली अनेक मुलांना रोजगार मिळाला; परंतु बार्टीने याचे प्रशिक्षण बंद केले. विदेशात शिकण्यासाठी जाणाऱ्या मुलांनासुद्धा प्रशिक्षण दिले जात होते तेही बंद केले.

सारथी व महाज्योतीतर्फे विदेशी शिष्यवृत्तीसाठी प्रत्येकी हजारापर्यंत विद्यार्थ्यांची निवड केली जाते. महाज्योती नवनवीन प्रशिक्षण देत आहे. रोजगार निर्मितीचा प्रयोग करीत आहे. बार्टी केवळ वर्षाला २०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. त्यातही विविध अडथळे आणले जातात. परीक्षा घेतली जाते.

- अतुल खोब्रागडे, डॉ. आंबेडकर स्टुडंट असोसिएशन.

टॅग्स :Educationशिक्षणGovernmentसरकारEducation Sectorशिक्षण क्षेत्र