शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सरकार कधी कोसळणार, हे राऊतांना आधीच माहीत होते का? 'त्या' पत्राची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2022 10:49 IST

२० जून रोजीच्या पत्रात लिहिली होती कार्यकाळ समाप्त होण्याची तारीख

कमल शर्मा

नागपूर : २१ जून रोजी एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह सुरतवरून गुवाहाटीला पोहोचले होते. तेव्हापर्यंत महाविकास आघाडी सरकारचे भविष्य अधांतरीच होते; परंतु तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कदाचीत अगोदरच सर्व काही कळले होते. सरकार नेमके कधी कोसळणार याची तारीखसुद्धा त्यांना माहिती होती. त्यामुळेच कदाचित त्यांनी २० जून रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांचा कार्यकाळ २९ जूनपर्यंतच राहील, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे सरकार कधी कोसळणार, हे नितीन राऊत यांना आधीच माहिती होते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तोपर्यंत सरकारबाबत अनिश्चिततेचे वातावरण होते. यादरम्यान नितीन राऊत यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या कामांवर ‘कॉफी टेबल बुक’ प्रकाशित करण्यासाठी २० जून रोजी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी सांगितले की, ६ जानेवारी २०२० रोजी त्यांनी ऊर्जामंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला, तर २९ जून २०२२ रोजी मंत्रिपद समाप्त होत आहे. यादरम्यान ९०६ दिवस ते ऊर्जामंत्री राहिले.

त्यांच्या कार्यकाळात महाजेनको, महावितरण, महापारेषण, महाऊर्जा आणि मुख्य विद्युत निरीक्षक आदी कंपन्यांमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्यात आली. यावर सर्व कंपन्यांनी एकत्रित माहिती तयार करायला हवी. वीज दर कमी करण्याचा दावाही त्यांनी या पत्रात केला आहे. यासंदर्भात कॉफी टेबल बुक प्रकाशित करायला हवी, असे राऊत यांनी या पत्रात स्पष्ट म्हटले आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे राऊत यांनी ही सर्व माहिती २० जून रोजी लिहिली आहे. जेव्हा एकनाथ शिंदे हे २१ जून रोजी समर्थक आमदारांसह सुरतवरून गुवाहाटीला पोहोचले होते. सरकार संकटात होते; परंतु महाविकास आघाडीचे दिग्गज नेते तेव्हा सरकारला काहीही होणार नाही, असा दावा करीत होते. आता राऊत यांना सरकार २९ जूनपर्यंतच राहील, याचे ज्ञान कुठून मिळाले, हे सांगणे कठीण आहे.

राऊत यांच्या विश्वासू अधिकाऱ्याचा राजीनामा

दरम्यान नितीन राऊत यांचे विश्वासू व जवळचे मानले जाणारे महाजेनकोचे संचालक (मानव संसाधन) डॉ. मानवेंद्र रामटेके यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या नियुक्तीत झालेली गडबड ‘लोकमत’ने उघडकीस आणली होती. या पदासाठी मानव संसाधनमध्ये एमबीए असणे आवश्यक होते; परंतु रामटेके यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये एमबीए केले आहे. मानव संसाधन क्षेत्राचे त्यांना कुठलेही अनुभव नव्हते. तरीही राऊत यांच्या कार्यकाळात त्यांना महाजेनकोचे निदेशक बनवण्यात आले. ही नियुक्ती नेहमीच वादात राहिली. आता रामटेके यांना राजीनामा द्यावा लागला.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Rautनितीन राऊत