शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

लांगूल चालनाची नीती काँग्रेसनं भारतात आणली, देवेंद्र फडणवीसांचा घाणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 4:21 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला एक दिशा मिळत आहे, त्यामुळे मोदींच्या प्रति खूप मोठ्या प्रमाणात लोकं आकृष्ट होत असून त्यामुळे त्यांची ही मळमळ बाहेर येत असल्याचे फडणवीस म्हणाले.

नागपूर : भारतात पूर्ण शांतता आहे. गेली अनेक वर्ष जी लांगूल चालनीची नीती काँग्रेस पक्षाने भारतात आणली त्यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

पुढे बोलताना, ही दुफळी दूर करून आपण सगळे एका भारतमातेचे पूत्र आहोत अशाप्रकारची भावना देशात तयार करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. तसेच, देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्व देत आहेत. त्यामुळे मोदींच्या प्रति खूप मोठ्या प्रमाणात लोकं आकृष्ट होत असून त्यांची ही मळमळ बाहेर येत आहे, असे म्हणत फडणवीसांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

...तर ओबीसी आरक्षण गेलं नसतं

कोर्टाने दाखल केलेल्या आरोपपत्रांमध्ये नवाब मलिक यांचा 'डी गँग'शी संबंध असल्याचे म्हटले आहे, या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ही अतिशय गंभीर बाब आहे. पण या सरकारचं बघा, इम्पेरिकल डेटा तयार करण्याकरता कुठलीच धडपड करत नाही. ओबीसी आरक्षणासाठी कुठलीच धडपड करत नाही. मात्र, त्याचवेळी जेलमध्ये असलेले आणि डी गँगशी संबंध असलेले नवाब मलिक हे मंत्रीमंडळात राहायला पाहिजे याकरता या सरकारची धडपड आपण पाहतोय. यापेक्षा अर्धी धडपड जर ओबीसी आरक्षणाचा इम्पेरिकल डेटा जमा करण्याकरता या सरकारने केली असती तर ओबीसी आरक्षण गेलं नसतं, अशी टीका त्यांनी केली.

डी गँगशी नवाब मलिकांचे असलेले संबंध या आरोपपत्राच्या माध्यमातून समोर येत आहेत. मात्र त्यानंतरही सरकार त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. अजूनही ते मंत्रीमंडळात असून मुख्यमंत्र्यांना 'डी गँग'शी संबंधित मंत्र्यांबरोबर काम करायचे असल्याचे दिसून येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीnawab malikनवाब मलिकOBC Reservationओबीसी आरक्षण