शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
3
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
4
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
5
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
6
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
7
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
8
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
9
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
10
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
11
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
12
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
13
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
14
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
15
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
16
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
17
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
18
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
19
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
20
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

थंडी वाढली असतानाच विजेची मागणी घटली ; राज्यात 'सरप्लस' वीज, १३ युनिट बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:36 IST

Nagpur : परळी केंद्र ठप्प, कमी उत्पादन खर्चाच्या ऊर्जास्रोतांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या राज्यात 'सरप्लस' वीज उपलब्ध आहे. यातच काही दिवसांपासून थंडी वाढल्याने राज्यातील विजेची मागणी कमी झाली आहे. परिणामी औष्णिक वीज केंद्रांपैकी ११ युनिट बंद ठेवण्यात आली आहेत, तर दोन युनिट इतर कारणांमुळे बंद आहेत. अशा प्रकारे राज्यातील एकूण १३ युनिट बंद आहेत. परळी येथील औष्णिक वीज केंद्र पूर्णपणे ठप्प झाले आहे. कमी उत्पादन खर्च असलेल्या ऊर्जास्रोतांना प्राधान्य देत जास्त खर्चिक युनिट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या 'महाजेनको' या वीज उत्पादन कंपनीकडे एकूण सात औष्णिक वीज केंद्रे आहेत. चंद्रपूर, कोराडी, खापरखेड़ा, परळी, पारस, भुसावळ आणि नाशिक या केंद्रांची एकत्रित उत्पादन क्षमता १०,८४२ मेगावॅट आहे. मात्र, मागणी घटल्याने केवळ ५,१८७ मेगावॉट उत्पादन घेतले जात आहे.

महावितरण क्षेत्रात बुधवारी विजेची मागणी २१,३८४ मेगावॉट इतकी नोंदली गेली, तर राज्यात उपलब्धता ३३,२८१ मेगावॉट आहे. या पार्श्वभूमीवर 'झिरो शेड्यूल' आणि 'आर.एस.डी. या योजनेंतर्गत अनेक युनिट बंद करण्यात आली आहेत. परळी औष्णिक वीज केंद्रातील सर्व तीन युनिट बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. चंद्रपूर येथील पाच आणि भुसावळ येथील तीन युनिट बंद आहेत. कोराडी आणि नाशिक येथील प्रत्येकी एक युनिट इतर कारणांमुळे बंद ठेवण्यात आली आहे.

बंद केलेल्या सर्व युनिटची उत्पादन खर्च प्रतियुनिट ५ रुपयांहून अधिक आहे. परळी केंद्राचा उत्पादन खर्च अनुक्रमे ६.९२८ आणि ७.५१५ रुपये प्रतियुनिट इतका आहे. त्यामुळे ज्या युनिटचा उत्पादन खर्च कमी आहे, त्यांना प्राधान्य दिले जात आहे.

खासगी क्षेत्रातून ५,२३२ मेगावॉट, केंद्र सरकारच्या एन.टी.पी.सी. कंपनीकडून ४,८६३ मेगावॉट आणि जलविद्युत प्रकल्पांमधून १,५०३ मेगावॉट वीज घेतली जात आहे.

खासगी क्षेत्राची क्षमता ५,७८५ मेगावॉट, उत्पादन ५,२३२ मेगावॉट

महागडी वीज असल्याने सरकारी वीज केंद्रे बंद ठेवली जात असताना, खासगी क्षेत्रातील केंद्रे मात्र मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहेत. राज्यातील खासगी औष्णिक वीज केंद्रांची एकूण उत्पादन क्षमता ५,७८५ मेगावॉट असून बुधवारी सायंकाळपर्यंत त्यांच्याकडून ५,२३२ मेगावॉट वीज घेतली जात आहे. महावितरणच्या मते, या केंद्रांतील उत्पादन खर्च प्रतियुनिट ५ रुपयांपेक्षा कमी असल्याने त्यांच्याकडून वीज घेणे फायदेशीर ठरत आहे.

वीज मागणी का घटली?

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विजेची मागणी २,००० मेगावॉटने कमी झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वाढलेली थंडी. तसेच अतिवृष्टी व पुरामुळे त्रस्त शेतकरी सिंचनासाठी विजेचा वापर कमी करत आहेत. दिवाळीनंतर औद्योगिक वीजवापरातही घट नोंदली गेली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra sees power surplus as cold reduces electricity demand.

Web Summary : With reduced demand due to colder weather, Maharashtra has a power surplus. Thirteen units are shut down, including the entire Parli plant, prioritizing cost-effective energy sources. Demand fell by 2,000 MW, due to cold weather, reduced irrigation, and less industrial usage.
टॅग्स :electricityवीजnagpurनागपूरmahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र