शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

थंडी वाढली असतानाच विजेची मागणी घटली ; राज्यात 'सरप्लस' वीज, १३ युनिट बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 15:36 IST

Nagpur : परळी केंद्र ठप्प, कमी उत्पादन खर्चाच्या ऊर्जास्रोतांना प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या राज्यात 'सरप्लस' वीज उपलब्ध आहे. यातच काही दिवसांपासून थंडी वाढल्याने राज्यातील विजेची मागणी कमी झाली आहे. परिणामी औष्णिक वीज केंद्रांपैकी ११ युनिट बंद ठेवण्यात आली आहेत, तर दोन युनिट इतर कारणांमुळे बंद आहेत. अशा प्रकारे राज्यातील एकूण १३ युनिट बंद आहेत. परळी येथील औष्णिक वीज केंद्र पूर्णपणे ठप्प झाले आहे. कमी उत्पादन खर्च असलेल्या ऊर्जास्रोतांना प्राधान्य देत जास्त खर्चिक युनिट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या 'महाजेनको' या वीज उत्पादन कंपनीकडे एकूण सात औष्णिक वीज केंद्रे आहेत. चंद्रपूर, कोराडी, खापरखेड़ा, परळी, पारस, भुसावळ आणि नाशिक या केंद्रांची एकत्रित उत्पादन क्षमता १०,८४२ मेगावॅट आहे. मात्र, मागणी घटल्याने केवळ ५,१८७ मेगावॉट उत्पादन घेतले जात आहे.

महावितरण क्षेत्रात बुधवारी विजेची मागणी २१,३८४ मेगावॉट इतकी नोंदली गेली, तर राज्यात उपलब्धता ३३,२८१ मेगावॉट आहे. या पार्श्वभूमीवर 'झिरो शेड्यूल' आणि 'आर.एस.डी. या योजनेंतर्गत अनेक युनिट बंद करण्यात आली आहेत. परळी औष्णिक वीज केंद्रातील सर्व तीन युनिट बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. चंद्रपूर येथील पाच आणि भुसावळ येथील तीन युनिट बंद आहेत. कोराडी आणि नाशिक येथील प्रत्येकी एक युनिट इतर कारणांमुळे बंद ठेवण्यात आली आहे.

बंद केलेल्या सर्व युनिटची उत्पादन खर्च प्रतियुनिट ५ रुपयांहून अधिक आहे. परळी केंद्राचा उत्पादन खर्च अनुक्रमे ६.९२८ आणि ७.५१५ रुपये प्रतियुनिट इतका आहे. त्यामुळे ज्या युनिटचा उत्पादन खर्च कमी आहे, त्यांना प्राधान्य दिले जात आहे.

खासगी क्षेत्रातून ५,२३२ मेगावॉट, केंद्र सरकारच्या एन.टी.पी.सी. कंपनीकडून ४,८६३ मेगावॉट आणि जलविद्युत प्रकल्पांमधून १,५०३ मेगावॉट वीज घेतली जात आहे.

खासगी क्षेत्राची क्षमता ५,७८५ मेगावॉट, उत्पादन ५,२३२ मेगावॉट

महागडी वीज असल्याने सरकारी वीज केंद्रे बंद ठेवली जात असताना, खासगी क्षेत्रातील केंद्रे मात्र मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहेत. राज्यातील खासगी औष्णिक वीज केंद्रांची एकूण उत्पादन क्षमता ५,७८५ मेगावॉट असून बुधवारी सायंकाळपर्यंत त्यांच्याकडून ५,२३२ मेगावॉट वीज घेतली जात आहे. महावितरणच्या मते, या केंद्रांतील उत्पादन खर्च प्रतियुनिट ५ रुपयांपेक्षा कमी असल्याने त्यांच्याकडून वीज घेणे फायदेशीर ठरत आहे.

वीज मागणी का घटली?

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विजेची मागणी २,००० मेगावॉटने कमी झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे वाढलेली थंडी. तसेच अतिवृष्टी व पुरामुळे त्रस्त शेतकरी सिंचनासाठी विजेचा वापर कमी करत आहेत. दिवाळीनंतर औद्योगिक वीजवापरातही घट नोंदली गेली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra sees power surplus as cold reduces electricity demand.

Web Summary : With reduced demand due to colder weather, Maharashtra has a power surplus. Thirteen units are shut down, including the entire Parli plant, prioritizing cost-effective energy sources. Demand fell by 2,000 MW, due to cold weather, reduced irrigation, and less industrial usage.
टॅग्स :electricityवीजnagpurनागपूरmahavitaranमहावितरणMaharashtraमहाराष्ट्र