शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

कोविडच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांकडून पेट्रोलिंग बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 23:50 IST

नक्षली संघटनांकडून जारी झालेल्या या पत्रात, या भागात राहणाऱ्या आदिवासींना अर्धसैनिक बल आणि पोलीसांमध्ये पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाची भिती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे, या जवानांना पेट्रोलिंगवर न पाठवता बॅरेकमध्येच ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देआदिवासींच्या नावे पत्र कोरोना संक्रमणाची धास्ती

फहिम खानलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घनदाट जंगलात अर्धसैनिक बल आणि पोलीसांमुळे त्रस्त असलेल्या नक्षल्यांनी आदिवासींच्या नावे पत्र जाहीर करत नक्षली भागात करण्यात येत असलेल्या पेट्रोलिंगला बंद करण्याची मागणी पुढे केली आहे.कोविड संक्रमण पसरण्याचे कारण पुढे करून आदिवासींना भडकविण्याचा प्रयत्न नक्षली करत आहेत. पोलीसांची पेट्रोलिंग सुरू राहिल्यास या भागात संक्रमणामुळे आदिवासी नाहक बळी पडण्याची बतावणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे. नक्षली संघटनांकडून जारी झालेल्या या पत्रात, या भागात राहणाऱ्या आदिवासींना अर्धसैनिक बल आणि पोलीसांमध्ये पसरत असलेल्या कोरोना संक्रमणाची भिती दाखविण्यात आली आहे. त्यामुळे, या जवानांना पेट्रोलिंगवर न पाठवता बॅरेकमध्येच ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.ऑपरेशन कधीच बंद होत नाहीहे नक्षल्यांचे षडयंत्र आहे. पोलीस आणि अर्धसैनिक बलामध्ये यदा कदा कोणी कोरोना संक्रमित आढळल्यास त्यास तात्काळ उपचारासाठी पाठविण्यात येते. पेट्रोलिंगमुळे संक्रमण पसरण्याची जी भिती दाखवली जात आहे, ते साफ खोटे आहे. संक्रमण काळातही नक्षली भागात ऑपरेशन्स सुरू राहतील. ऑपरेशन्स कधीच बंद होत नाहीत.के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, पोलीस महानिरीक्षक, नागपुर रेंजनक्षल्यांची आदिवासींविषयी खोटी सहानुभूतीया पत्रात नक्षल्यांनी ९ ऑगस्टला विश्व आदिवासी, मुलनिवासी दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारत सरकारने आदिवासींचे अस्तित्त्व आणि अस्मिता संपविण्याचे प्रयत्न केले आहे. त्या विरोधात आदिवासींनी आक्रमक होण्याची सुचना त्यात करण्यात आली आहे. पत्राच्या सुरुवातीलाच संघटनेने केंद्र, छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारांना जनविरोधी असल्याची घोषणा केली आहे. आम्ही आदिवासी ग्राम सभांच्या अधिकारांचा आवाका वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, केंद्र सरकारकडून पेसा कायद्याच्या माध्यमातून ग्राम सभांचे अधिकार मर्यादित करण्याचे षडयंत्र राबविले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यातच राज्य सरकारांकडून ग्राम सभा स्थापन करून त्यांचे नेतृत्त्व जनविरोधी लोकांच्या हातात देण्याचे प्रयत्न केले जात आहे. शिवाय, वनाधिकार कायद्यातील प्रस्तावित संशोधनातून आदिवासींना त्यांच्या जंगलातील अधिकारांपासून वंचित केले जात आहे. गेल्या काही वषार्पासून आदिवासी भागातील नक्षल्यांचा प्रभाव घसरत असून, आदिवासींच्या सहकायार्ने पोलीस व अर्धसैनिक बल नक्षल्यांवर भारी पडत आहेत. त्यामुळेच, आपला प्रभाव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी नक्षल्यांचे हे प्रयत्न असल्याचे दिसून येते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस