शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

कर्जमाफी मिळाली, नुकसानभरपाईची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 03:18 IST

विधानसभा विश्लेषण; प्रश्नोत्तरे नाही, लक्षवेधीही नाही

आनंद डेकाटे 

नागपूर : आधीच संकटात सापडलेला शेतकरी आणि त्यात हाती आलेले पीकही अतिवृष्टीने गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडलेले होते. अशा परिस्थितीत सापडलेल्या शेतकºयाला मायबाप सरकारकडून मदतीची अपेक्षा होतीच. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला खरा; परंतु अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यासाठी मात्र शेतकºयांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे नेहमीच गाजत असते. यंदा अवघ्या सहा दिवसाचे अधिवेशन भरवले गेले. या सहा दिवसात काय होणार हा प्रश्नच होता. झालेही तसेच. या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास ठेवला गेला नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे सभागृहात अभिनंदन करण्यात आले. माजी सदस्य दिवंगत माणिकराव सबाने व अशोक तापकीर यांना शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली. दुसºया दिवशी विरोधकांनी शेतकºयांना २५ हजार रुपये नुकसान भरपाईचा मुद्दा उचलून धरला. यावर सभागृहात सामना वृत्तपत्राचे बॅनर फडकावल्याने भाजप-शिवसेना सदस्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली. सदस्यांना सक्त समज दिली. पहिले दोन दिवस फारसे कामकाज होऊ शकले नाही. परंतु पुढे तीन दिवस मात्र रात्री उशिरापर्यंत कामकाज चालले. यादरम्यान सात विधेयके मंजूर करण्यात आली. यात महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग पद्धतीचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच १० रुपयात शिवभोजन थाळी, प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय, पूर्व विदर्भात स्टील प्लँट, धान उत्पादकांना आणखी २०० रुपये अनुदान, यवतमाळ जिल्ह्यातील सिंचनासाठी २५३ कोटी, आदिवासी मुलामुलींना पौष्टिक अन्न देण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकगृह आदी महत्त्वाच्या घोषणासुद्धा या अधिवेशनात झाल्या.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नवीन आहेत, प्रशासनाचा अनुभव नाही, अशी टीका विरोधकांकडून झाली. परंतु ठाकरे यांनी एकूणच आपल्या कार्यशैलीतून विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. तसेच संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आपली ओळख निर्माण करण्यातही ते यशस्वी ठरले.संविधान प्रास्ताविकेचे वाचन, ऐतिहासिक सुरुवातमहाराष्ट्राच्या विधिमंडळातील मंजूर केलेली अनेक ऐतिहासिक विधेयके व घालून दिलेल्या परंपरा नंतर संपूर्ण देशाने अवलंबिल्याचा इतिहास आहे. या गौरवशाली इतिहासाच्या परंपरेत यंदा आणखी एक नवीन पायंडा घातला गेला. तो म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाने अधिवेशनाची सुरुवात. भविष्यात ही परंपरा देशातील इतर विधिमंडळांमध्येही अवलंबिली जाईल, अशी अपेक्षा आहे.सदस्य नवीन पण ‘परफॉर्मन्स बेस्ट’विधानसभेचे ९७ सदस्य पहिल्यांदाच निवडून आलेत. अध्यक्ष नाना पटोले यांनी जास्तीत जास्त नवीन सदस्यांना बोलण्याची संधी दिली. या सदस्यांनीही संधीचे सोने केले. आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, विकास ठाकरे यांच्यासारख्या नवीन सदस्यांनी मोठ्या विश्वासाने सभागृहात आपले मुद्दे मांडले. अनेक नवीन उपयुक्त सूचनाही केल्या. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यांचे कौतुक केले. 

टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरे