शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

कर्जमाफी मिळाली, नुकसानभरपाईची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 03:18 IST

विधानसभा विश्लेषण; प्रश्नोत्तरे नाही, लक्षवेधीही नाही

आनंद डेकाटे 

नागपूर : आधीच संकटात सापडलेला शेतकरी आणि त्यात हाती आलेले पीकही अतिवृष्टीने गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडलेले होते. अशा परिस्थितीत सापडलेल्या शेतकºयाला मायबाप सरकारकडून मदतीची अपेक्षा होतीच. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला खरा; परंतु अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यासाठी मात्र शेतकºयांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे नेहमीच गाजत असते. यंदा अवघ्या सहा दिवसाचे अधिवेशन भरवले गेले. या सहा दिवसात काय होणार हा प्रश्नच होता. झालेही तसेच. या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास ठेवला गेला नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे सभागृहात अभिनंदन करण्यात आले. माजी सदस्य दिवंगत माणिकराव सबाने व अशोक तापकीर यांना शोकसंवेदना व्यक्त करण्यात आली. दुसºया दिवशी विरोधकांनी शेतकºयांना २५ हजार रुपये नुकसान भरपाईचा मुद्दा उचलून धरला. यावर सभागृहात सामना वृत्तपत्राचे बॅनर फडकावल्याने भाजप-शिवसेना सदस्यांमध्ये धक्काबुक्कीही झाली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली. सदस्यांना सक्त समज दिली. पहिले दोन दिवस फारसे कामकाज होऊ शकले नाही. परंतु पुढे तीन दिवस मात्र रात्री उशिरापर्यंत कामकाज चालले. यादरम्यान सात विधेयके मंजूर करण्यात आली. यात महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग पद्धतीचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच १० रुपयात शिवभोजन थाळी, प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय, पूर्व विदर्भात स्टील प्लँट, धान उत्पादकांना आणखी २०० रुपये अनुदान, यवतमाळ जिल्ह्यातील सिंचनासाठी २५३ कोटी, आदिवासी मुलामुलींना पौष्टिक अन्न देण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकगृह आदी महत्त्वाच्या घोषणासुद्धा या अधिवेशनात झाल्या.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नवीन आहेत, प्रशासनाचा अनुभव नाही, अशी टीका विरोधकांकडून झाली. परंतु ठाकरे यांनी एकूणच आपल्या कार्यशैलीतून विरोधकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. तसेच संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आपली ओळख निर्माण करण्यातही ते यशस्वी ठरले.संविधान प्रास्ताविकेचे वाचन, ऐतिहासिक सुरुवातमहाराष्ट्राच्या विधिमंडळातील मंजूर केलेली अनेक ऐतिहासिक विधेयके व घालून दिलेल्या परंपरा नंतर संपूर्ण देशाने अवलंबिल्याचा इतिहास आहे. या गौरवशाली इतिहासाच्या परंपरेत यंदा आणखी एक नवीन पायंडा घातला गेला. तो म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाने अधिवेशनाची सुरुवात. भविष्यात ही परंपरा देशातील इतर विधिमंडळांमध्येही अवलंबिली जाईल, अशी अपेक्षा आहे.सदस्य नवीन पण ‘परफॉर्मन्स बेस्ट’विधानसभेचे ९७ सदस्य पहिल्यांदाच निवडून आलेत. अध्यक्ष नाना पटोले यांनी जास्तीत जास्त नवीन सदस्यांना बोलण्याची संधी दिली. या सदस्यांनीही संधीचे सोने केले. आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, विकास ठाकरे यांच्यासारख्या नवीन सदस्यांनी मोठ्या विश्वासाने सभागृहात आपले मुद्दे मांडले. अनेक नवीन उपयुक्त सूचनाही केल्या. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यांचे कौतुक केले. 

टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरे