शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ढग दाटले; दिवसाचे तापमान घटले, गारवा आणखी वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 11:17 IST

पुढचे तीन दिवस ढगाळ वातावरण

नागपूर : नागपुरात मंगळवारी वातावरणात परिवर्तन दिसून आले. सकाळपासून आकाशात ढगांचा राबता होता. त्यामुळे, दिवसाच्या तापमानात १.८ अंश डिग्रीची घसरण होत तापमान २६.६ अंश डिग्रीवर पोहोचले.

गेल्या दोन दिवसांपासून दिवसाच्या तापमानात सातत्याने घसरण दिसून येत आहे. त्यातच रात्री ०.४ अंशाची घसरण होत तापमान १३.२ अंश डिग्रीवर पोहोचले. दिवसाचे आणि रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा एक डिग्रीची घसरण झाल्याने गारवा आणखी वाढल्याचे दिसून येत आहे.

मोसम विभागाच्या अंदाजानुसार नागपूर जिल्ह्यात पुढचे तीन दिवस आकाशात ढग राहतील. आर्द्रतेचा स्तरही ५० टक्के राहील. त्यामुळे, किमान तापमान १३ ते १५ डिग्रीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान ३० डिग्रीच्या खाली राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

नागपुरात दिवसाची आर्द्रता ७४ टक्के, तर संध्याकाळी ६५ टक्के होती. वाऱ्याची दिशा पूर्व-उत्तर पूर्व अशी होती. ३.६ प्रतितासाने वारा वाहत होता. त्यामुळे, सूर्यास्तानंतर तापमानात गतीने घसरण झाली. विदर्भात गोंदियाचे तापमान सर्वांत कमी १२.१ अंश डिग्री सेल्सिअस इतके होते.

टॅग्स :weatherहवामानenvironmentपर्यावरणnagpurनागपूर