शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

नागपूरनजीक महालगाव येथील प्लास्टिक कंपनीला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:22 IST

निरुपयोगी प्लास्टिकपासून त्याचे दाणे तयार करणाऱ्या कंपनीला अचानक आग लागली. त्यात कंपनीच्या आवारातील कच्चा माल, आतील मशिनरी व पक्का माल जळून राख झाला. यात अंदाजे ८० लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीच्यावेळी कंपनीमध्ये कुणीही नसल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना नागपूर - मौदा - भंडारा महामार्गावरील महालगाव शिवारात असलेल्या श्रीराम प्लास्टिक कंपनीमध्ये मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. दुपारी २ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देअंदाजे ८० लाख रुपयांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (गुमथळा) : निरुपयोगी प्लास्टिकपासून त्याचे दाणे तयार करणाऱ्या कंपनीला अचानक आग लागली. त्यात कंपनीच्या आवारातील कच्चा माल, आतील मशिनरी व पक्का माल जळून राख झाला. यात अंदाजे ८० लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीच्यावेळी कंपनीमध्ये कुणीही नसल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना नागपूर - मौदा - भंडारा महामार्गावरील महालगाव शिवारात असलेल्या श्रीराम प्लास्टिक कंपनीमध्ये मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. दुपारी २ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.महालगाव (ता. कामठी) शिवारातील महामार्गालगत अनिल हेमराज गणात्रा, रा. नागपूर यांची दागोबा इंडस्ट्रीज नामक कंपनी आहे. या कंपनीशेजारील जागा रिकामी असल्याने ती अनिल गणात्रा यांनी पारवानी, रा. नागपूर यांना किरायाने दिली असून, त्या जागेवर पारवानी यांची श्रीराम प्लास्टिक नामक कंपनी आहे. या कंपनीमध्ये निरुपयोगी प्लास्टिकच्या वस्तू व पिशव्यांपासून प्लास्टिकचे दाणे तयार केले जातात. त्या दाण्यांची दुसऱ्या कंपनीला विक्री केली जात असून, त्यापासून पुन्हा प्लास्टिकच्या वस्तू तयार केल्या जातात.दरम्यान, सकाळी ७ वाजताच्या सुमारास कंपनीच्या आतील भागात ठेवलेल्या साहित्याने पेट घेतला. त्यावेळी कंपनीत कुणीही नसल्याने आग पसरत केली. आतून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच सुरक्षा रक्षकांनी पारवानी यांच्यासह नागपूर महानगर पालिका आणि कामठी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला तसेच मौदा पोलीस ठाण्याला सूचना दिली. माहिती मिळताच दोन्ही ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या एकूण १२ गाड्या टप्प्याटप्प्याने घटनास्थळी दाखल झाल्या.अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दुपारी २ वाजताच्या सुमारास या आगीवर काहिसे नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. तोपर्यंत आतील मशिनरी, कच्चा व पक्का माल तसेच कंपनीच्या आवारात ठेवण्यात आलेला कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने पूर्णपणे जळाला. या आगीत अंदाजे ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कंपनीचे मालक पारवानी यांनी दिली असून, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाजही व्यक्त केला.जीवितहानी टळलीया कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या फार मोठी नाही. कंपनीमध्ये सकाळी १० वाजतापासून कामाला सुरुवात होत असल्याने कामगार सकाळी ९ वाजतानंतर कामावर यायला सुरुवात होते. सकाळी ७ वाजताच्या सुमारास कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकांव्यतिरिक्त कुणीही नव्हते. त्यामुळे आगीत कुणालाही दुखापत झाली नाही. शिवाय, आग इतरत्र न पसरल्याने इतरांचे नुकसान झाले नाही.वाहतूक विस्कळीतही कंपनी नागपूर - भंडारा महामार्गालगत आहे. या मार्गावर २४ तास वाहनांची वर्दळ असते. कंपनीतून धुराचे लोट निघत असल्याचे लक्षात येताच चालकांनी त्यांची वाहने मध्येच थांबविली होती. त्यातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी वेळीच वाहतूक सुरळीत करून मार्ग मोकळा केला.

 

टॅग्स :fireआगnagpurनागपूर