शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

धरणे कोरडी,नागपूर जिल्ह्यावर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 22:49 IST

मे महिना सुरु झाला असून कडाक्याचे उन पडू लागले आहे. दुसरीकडे विभागातील धरणे कोरडी पडली आहेत. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणी साठामे महिन्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मे महिना सुरु झाला असून कडाक्याचे उन पडू लागले आहे. दुसरीकडे विभागातील धरणे कोरडी पडली आहेत. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला केवळ २८३ दलघमी(८ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात केवळ १५ दलघमी म्हणजे २ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३८ दलघमी (२७ टक्के) पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीमध्ये १० टक्के, लोवर नांद १ टक्के, वडगाव प्रकल्पात १९ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात २० टक्के, सिरपूर २२ टक्के, पुजारी टोला २१ टक्के, कालिसरार ५० टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये ८ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात ३२ टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १३ टक्के, धाममध्ये १० टक्के, पोथरामध्ये १ टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ६ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ मध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.गोसेखुर्द व दिना रिकामेभंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ आणि गडचिरोली जिल्ह्यातील दिना हे दोनही प्रकल्प पूर्णपणे रिकामे आहेत. गोसेखुर्द धरणातील पाणीसाठा क्षमता ७४० दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला पाणीच नाही. तर दिना प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता ६८ दलघमी इतकी असून ते सुद्धा रिकामेच आहे.मध्यम व लघु प्रकल्पांची स्थितीही बिकटनागपूर विभागातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची स्थितीही अतिशय बिकट आहे. विभागात एकूण ४० मध्यम प्रकारची धरणे आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३७.५८ दलघमी इतकी आहे. त्यात २ एप्रिल रोजीपर्यंत केवळ ८० दलघमी म्हणजेच १५ टक्के इतका साठा शिल्लक आहे. तीच परिस्थिती लघु प्रकल्पांची आहे. नागपूर विभागात एकूण ३१४ लघु प्रकल्प आहेत. त्यांची पाणीसाठा क्षमता ५०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ६१ दलघमी म्हणजेच १२ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.पाच वर्षात सर्वात कमी साठानागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांचा विचार केला असता मागील पाच वर्षात यंदा सर्वात कमी पाणीसाठा आबहे. जलसंपदा विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी २०१८ मध्ये २ मे रोजी मोठ्या धरणांमध्ये ८९४ दलघमी इतका साठा होता. २०१७ मध्ये याच तारखेला ५०५ दलघमी इतका पाणीसाठा होता. २०१६ मध्ये ८७२, २०१५ मध्ये ९३० आणि २०१४ मध्ये १६२० दलघमी इतका साठा होता. आणि यंदा केवळ २८३ दलघमी इतका साठा आहे. त्यामुळे कधी नव्हे इतकी परिस्थिती भयावह झाली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण