शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

धरणे कोरडी,नागपूर जिल्ह्यावर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 22:49 IST

मे महिना सुरु झाला असून कडाक्याचे उन पडू लागले आहे. दुसरीकडे विभागातील धरणे कोरडी पडली आहेत. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणी साठामे महिन्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मे महिना सुरु झाला असून कडाक्याचे उन पडू लागले आहे. दुसरीकडे विभागातील धरणे कोरडी पडली आहेत. नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ ८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असून विभागात पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाली आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. या धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३ दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला केवळ २८३ दलघमी(८ टक्के) इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. प्रकल्पनिहाय विचार केला असता नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची क्षमता १०१६.९ दलघमी इतकी आहे. यात केवळ १५ दलघमी म्हणजे २ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. कामठी खैरीची क्षमता १४२ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३८ दलघमी (२७ टक्के) पाणीसाठा आहे. रामटेक खिंडसीमध्ये १० टक्के, लोवर नांद १ टक्के, वडगाव प्रकल्पात १९ टक्का साठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह प्रकल्पात २० टक्के, सिरपूर २२ टक्के, पुजारी टोला २१ टक्के, कालिसरार ५० टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ मध्ये ८ टक्के साठा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्पात ३२ टक्के साठा आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्पात ० टक्के साठा वर्धा जिल्ह्यातील बोरमध्ये १३ टक्के, धाममध्ये १० टक्के, पोथरामध्ये १ टक्के तर लोअर वर्धा टप्पा १ मध्ये ६ टक्के साठा आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ मध्ये ० टक्के पाणीसाठा आहे.गोसेखुर्द व दिना रिकामेभंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द टप्पा २ आणि गडचिरोली जिल्ह्यातील दिना हे दोनही प्रकल्प पूर्णपणे रिकामे आहेत. गोसेखुर्द धरणातील पाणीसाठा क्षमता ७४० दलघमी इतकी आहे. त्यात आजच्या तारखेला पाणीच नाही. तर दिना प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता ६८ दलघमी इतकी असून ते सुद्धा रिकामेच आहे.मध्यम व लघु प्रकल्पांची स्थितीही बिकटनागपूर विभागातील मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांची स्थितीही अतिशय बिकट आहे. विभागात एकूण ४० मध्यम प्रकारची धरणे आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ५३७.५८ दलघमी इतकी आहे. त्यात २ एप्रिल रोजीपर्यंत केवळ ८० दलघमी म्हणजेच १५ टक्के इतका साठा शिल्लक आहे. तीच परिस्थिती लघु प्रकल्पांची आहे. नागपूर विभागात एकूण ३१४ लघु प्रकल्प आहेत. त्यांची पाणीसाठा क्षमता ५०३ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ६१ दलघमी म्हणजेच १२ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.पाच वर्षात सर्वात कमी साठानागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांचा विचार केला असता मागील पाच वर्षात यंदा सर्वात कमी पाणीसाठा आबहे. जलसंपदा विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी २०१८ मध्ये २ मे रोजी मोठ्या धरणांमध्ये ८९४ दलघमी इतका साठा होता. २०१७ मध्ये याच तारखेला ५०५ दलघमी इतका पाणीसाठा होता. २०१६ मध्ये ८७२, २०१५ मध्ये ९३० आणि २०१४ मध्ये १६२० दलघमी इतका साठा होता. आणि यंदा केवळ २८३ दलघमी इतका साठा आहे. त्यामुळे कधी नव्हे इतकी परिस्थिती भयावह झाली आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईDamधरण