शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

मेयोच्या डॉक्टरांवर जमावाची चाल : मृतांचे नातेवाईक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 8:00 PM

उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी एका पाठोपाठ तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने शंभरावर लोकांचा जमाव मेयो रुग्णालयातील डॉक्टरांवर चालून आला. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने अनर्थ टळला.

ठळक मुद्देडॉक्टरांना हवे पोलिसांचे संरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी एका पाठोपाठ तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने शंभरावर लोकांचा जमाव मेयो रुग्णालयातील डॉक्टरांवर चालून आला. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने अनर्थ टळला. संरक्षणासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी येथील डॉक्टरांनी केली आहे. कोरोनाची लक्षणे असताना तपासणी न करताच घरी राहून स्वत:हून औषधी घेण्याचे प्रकार वाढले आहेत. परिणामी, आजार वाढल्यानंतर रुग्ण रुग्णालयात येत असल्याने वाढून अचानक मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याने नातेवाईक आपला संताप डॉक्टरांवर काढत आहेत. लक्षणे नसताना रुग्ण पॉझिटिव्ह आलाच कसा, चालता-बोलता असताना मृत्यू झालाच कसा आदी प्रश्नांना उत्तरे देत मेयोतील डॉक्टर त्रासून गेले आहेत. तरीही त्यांच्याकडून समजविण्याचा प्रयत्न होतो. परंतु रुग्णाचे एकापेक्षा जास्त नातेवाईक प्रश्न विचारीत असल्याने प्रत्येकाला उत्तरे देणे डॉक्टरांना कठीण जात आहे. यातूनच वाद निर्माण होण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी असेच झाले, गेल्या चार दिवसांपासून उपचार घेत असलेल्या बजेरिया येथील ४९ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. याचदरम्यान आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच नातेवाईकांनी आपल्या इतर नातेवाईकांना बोलावून कोविड हॉस्पिटलसमोर गोंधळ घालण्यास सुरुवात के ली. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने प्रवेशद्वारासह परिसरात जाण्याचा मार्ग रोखून धरला.नातेवाईकांच्या मते, कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना भेटणे अशक्य असते. त्यांच्या प्रकृ तीची चौकशी कु ठे करावी, हा प्रश्न असतो आणि अचानक रुग्ण गंभीर झाल्याची किंवा मृत्यूची माहिती दिली जाते. यामुळे संतापाचा भडका उडतो. तर, डॉक्टरांनुसार कोविड हॉस्पिटलमध्ये ३०० वर रुग्ण भरती आहेत. रुग्णाचा एकच नातेवाईक नाही तर चार-पाच कधी त्यापेक्षा जास्त नातेवाईक वारंवार रुग्णाच्या प्रकृ तीची विचारपूस करतात, आधीच डॉक्टरांची संख्या कमी, त्यात प्रत्येकवेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे कठीण जाते. यातच वारंवार रुग्णालयावर लोकांचा जमाव येत असल्याने डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस बंदोबस्तही राहत नाही. यामुळे एखाद्यावेळी अप्रिय घटना घडल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू