शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
2
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
3
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
4
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
5
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
6
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
7
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
8
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
9
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
10
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
11
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
12
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
13
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
14
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
15
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
16
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
17
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
18
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
20
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड

नागपुरात कचरा संकलनावर संकटाचे सावट ! कनकचा करार १५ ला संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 12:24 AM

स्वच्छतेबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. ‘जनसंवाद’ कार्यक्रम व ‘महापौर आपल्या दारी’ कार्यक्रमांच्या माध्यमातून मोकळे भूखंड, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छतेसंदर्भात नागरिक तक्रारी करीत आहेत. दरम्यान कचरा संकलन करणाऱ्या कनक रिसोर्सेस कंपनी व महापालिका यांच्यातील करार १५ फे ब्रुवारीला संपत आहे. यामुळे घराघरातून कचरा संकलन करणारी यंत्रणा संकटात असल्याचे दिसत आहे. पर्यायी यंत्रणा उभी करण्यासाठी महापालिका वर्षभरापासून प्रयत्न करीत आहे. परंतु यात यश मिळालेले नाही. परिणामी महापालिका प्रशासनाने कनकला महिनाभर काम सुरू ठेवण्याबाबत पत्र दिले आहे.

ठळक मुद्देपर्यायी व्यवस्था करण्यात मनपाला अपयश : महिनाभर सेवा कायम ठेवण्याचे पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छतेबाबतच्या तक्रारी वाढत आहेत. ‘जनसंवाद’ कार्यक्रम व ‘महापौर आपल्या दारी’ कार्यक्रमांच्या माध्यमातून मोकळे भूखंड, सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे, अस्वच्छतेसंदर्भात नागरिक तक्रारी करीत आहेत. दरम्यान कचरा संकलन करणाऱ्या कनक रिसोर्सेस कंपनी व महापालिका यांच्यातील करार १५ फे ब्रुवारीला संपत आहे. यामुळे घराघरातून कचरा संकलन करणारी यंत्रणा संकटात असल्याचे दिसत आहे. पर्यायी यंत्रणा उभी करण्यासाठी महापालिका वर्षभरापासून प्रयत्न करीत आहे. परंतु यात यश मिळालेले नाही. परिणामी महापालिका प्रशासनाने कनकला महिनाभर काम सुरू ठेवण्याबाबत पत्र दिले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार शहाराचे क्षेत्रफळ वाढण्यासोबतच लोकसंख्या वाढली आहे. याचा विचार करता कचरा संकलनासाठी दोन कंपन्या नियुक्त करण्याचा विचार सुरू आहे. परंतु अद्याप यावर निर्णय झालेला नाही. यामुळे घराघरातून कचरा संकलन करणाऱ्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कनकचे काम समाधानकारक नाही. ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जात नाही. यामुळे स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका माघारण्याची शक्यता आहे.२००८ मध्ये कनक रिसोर्सेसला दहा वर्षासाठी घराघरातून कचरा संकलित करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. दहा वर्षांसाठी करार करण्यात आला होता. त्यानंतरही यावर अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याने कचरा संकलन संकटात येण्याची शक्यता आहे. शहरात दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. प्रति मेट्रिक टन १३०६ रुपये दराने कनकला मोबदला दिला जातो. अधिक बिल दिल्याने महापालिकेने कनकच्या बिलातून कपात केली आहे.कनकच्या सूत्रानुसार महापालिका प्रशासनाने घराघरातून कचरा संकलन करण्याला एक महिना मुदतवाढ दिली आहे. तूर्त कंपनीने आपला निर्णय दिलेला नाही. या संदर्भात आयुक्तांसोबत लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे.नवीन फॉर्म्युल्यावर निर्णय नाहीघनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ‘रिक्वेस्ट टू प्रपोजल’(आरएफपी)तयार करून ते मुंबई बेस्ट ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटकडे पाठविण्यात आले आहे. तेच आरएफपीची सक्षमता व अन्य बाजूंचा विचार करून याचे मायक्रो नियोजन करणार आहे. परंतु निर्णय होऊ शकला नाही. शहरातील लोकसंख्या वाढल्याने कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन करण्यात महापालिका कमी पडली आहे. यामुळे दोन ऑपरेटरची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आहे.कचरा संकलनाच्या खर्चात वाढलोकसंख्या वाढीसोबतच शहरातील कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दरवर्षी कचरा संकलनावरील खर्चात वाढ होत आहे. घराघरातून कचरा संकलनाच्या मोबदल्यात महापालिकेने वर्ष २०१५-१६ मध्ये ४० कोटी, वर्ष २०१६-१७ मध्ये ४४.२४ कोटी, वर्ष २०१७-१८ मध्ये ५७.९५ कोटी व वर्ष २०१८-१९मध्ये जानेवारीपर्यंत ४४.६४ कोटी खर्च केले आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न