शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ब्रिटिशकालीन अजनी रेल्वे पुलाच्या संरक्षक भिंतीला तडे; मोठ्या दुर्घटनेची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 12:28 IST

नवीन पुलाच्या बांधकामात विलंब, रस्त्याची झाली दुर्दशा

नागपूर : ब्रिटिशांनी बांधलेल्या अजनी रेल्वे स्थानकाजवळच्या पुलाची (आरओबी) सुरक्षा भिंत आता तुटून पडू लागली आहे. पुलाची आणि आजूबाजूच्या रस्त्याची स्थितीही अत्यंत वाईट झाली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून या पुलाचा वापर सुरु आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ब्रिटिश कालावधीत बांधण्यात आलेल्या या पुलाचा वापर आता धोकादायक आहे, असे अनेक वर्षांपूर्वीच संबंधित तज्ज्ञांनी सांगितले आहे. तरीसुद्धा या पुलाच्या खाली लोखंडी रॉड, अँगल लावून पुलाचा वापर सुरूच ठेवण्यात आला आहे. पुलावरून रोज हजारो वाहने धावतात तर पुलाखालून मोठ्या संख्येत रेल्वेगाड्या धावतात. अशात आता या पुलाच्या सुरक्षा भिंतीचे दगड पडू लागले आहे. या पुलावरच्या खड्डे पडलेल्या रस्त्यावरून वाहन धक्के खात जातात. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे, जुन्या पुलाजवळूनच केबल स्टेड ब्रिज बनविण्याचे ठरले आहे. मात्र, अद्याप त्याच्या कामाला गती नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन पुलाच्या निर्मितीसाठी निधीचा मुद्दा आहे. नवीन पुलाचे बांधकाम तसेच रस्ता रूंदीकरणासाठी काही दिवसांपूर्वीच येथील दुकाने तोडण्यात आली. जागाही सपाट करण्यात आली. मात्र, कामाला गती न मिळाल्याने या पुलावरची वाहतूक सुरूच आहे.

धोक्याचा मार्ग बंदच करावा

शहरात गेल्या काही वर्षांत ठिकठिकाणी अनेक पुलांचे बांधकाम झाले. विविध भागातील सिमेंटच्या रस्त्याच्या बांधकामासाठी अनेकदा मार्ग बंद करण्यात आले, काही ठिकाणचे मार्गही वळविण्यात आले. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास झाला. मात्र, अजनी पुलाचा रस्ता सुरूच असल्याने मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे हा धोक्याचा मार्ग बंदच करावा. नागरिकांना थोडा त्रास होईल मात्र ते सुरक्षित राहतील. त्यामुळे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकnagpurनागपूर