शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
3
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
4
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
5
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
6
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
7
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
8
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
9
टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान
10
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
11
रशियाच्या शत्रू जमिनीवर गरजले भारताचे सुखोई ३० जेट; भारतीय पायलटनं उडवलं F15 विमान, चीन चिंतेत
12
Latur: अश्लील व्हिडीओ आणि तिसरीतील विद्यार्थ्याने वर्गमित्रासोबतच अनैसर्गिक...; लातुरमधील शाळेतील घटना
13
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
14
IPL स्टार खेळाडूवर अत्याचाराचा आरोप; तर तरुणी ब्लॅकमेल करत असल्याची क्रिकेटरची तक्रार
15
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
16
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
17
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
18
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
19
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
20
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाने मान्य केले, सरकार कधी मानणार? गोवारी समाजाचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:57 IST

११४ गोवारी बांधवाच्या बलिदानाची दखल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली. गोवारी हेच आदिवासी आहेत, त्यांचे आदिवासीत्व कुणीही नाकारू शकत नाही, ते आदिवासीच्या सवलती घेण्यास पात्र आहेत, असा निर्णय १४ आॅगस्ट २०१८ रोजी दिला. शहीद गोवारी स्मृती दिनाला आज २४ वर्षे होत आहेत. न्यायालयाने त्यांचे अस्तित्व मान्य केले आहे. आता फक्त शासनाने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाच्या संघर्षाला विराम द्यावा, अशी भावना समाजातून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे२४ व्या वर्षी मिळणार का विराम ? 

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ११४ गोवारी बांधवाच्या बलिदानाची दखल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली. गोवारी हेच आदिवासी आहेत, त्यांचे आदिवासीत्व कुणीही नाकारू शकत नाही, ते आदिवासीच्या सवलती घेण्यास पात्र आहेत, असा निर्णय १४ आॅगस्ट २०१८ रोजी दिला. शहीद गोवारी स्मृती दिनाला आज २४ वर्षे होत आहेत. न्यायालयाने त्यांचे अस्तित्व मान्य केले आहे. आता फक्त शासनाने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाच्या संघर्षाला विराम द्यावा, अशी भावना समाजातून व्यक्त होत आहे.२४ एप्रिल १९८४ चा जी. आर. रद्द करून ‘गोंडगोवारी’ यात कॉमा द्यावा, या मागणीसाठी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी समाजाचा भव्य मोर्चा विधानभवनावर धडकला होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मोर्चाला भेट द्यावी, अशी मागणी मोर्चेक ऱ्यांची होती. मोर्चा त्यासाठी अडून बसला होता. मोर्चेकºयांचा संताप वाढत होता, अशात पोलिसांकडून लाठीमार सुरू झाला. हवेत फायरिंग झाली. या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव शहीद झाले. तेव्हापासून गोवारी समाजाच लोकशाहीच्या विविध आयुधाच्या माध्यमातून शासनाशी संघर्ष करीत आहे. २००८ मध्ये न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. तब्बल १० वर्षानी न्यायालयाने यावर निर्णय दिला. शासनाने २३ नोव्हेंबर १९९४ च्या घटनेनंतर गोवारी समाजाला एसबीसीमध्ये २ टक्के आरक्षण दिले पण त्यातही ३९ उच्च जातींचा समावेश केल्याने गोवारीला त्याला फायदा झाला नाही. शासनाने झिरो माईल चौकात गोवारी शहीद स्मारक उभारले. नागपूरच्या उड्डाणपुलाला शहीद गोवारी उड्डाणपूल असे नाव देण्यात आले. मात्र गोवारी समाजाने अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे म्हणून आपला संघर्ष सुरूच ठेवला. दरम्यान या २४ वर्षात राज्यात दोन्ही महत्त्वपूर्ण राजकीय पक्षाचे सरकार आले. प्रत्येक सरकारने गोवारींच्या प्रश्नाला बगल दिली. अखेर न्यायालयाच्या निर्णयामुळे गोवारींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.न्यायालयाने गोवारी हे आदिवासी असल्याचा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यायालयाने आमचे अस्तित्व मान्य केले आहे. आता फक्त मुख्यमंत्र्यांनी न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून तसा जी.आर. काढल्यास गोवारींच्या २४ वर्षाच्या संघर्षाला विराम मिळेल.कैलास राऊत, अध्यक्ष, आदिवासी गोवारी समाज संघटन.

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीnagpurनागपूर