शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाची धडकी, दिवसभरात १०३६ रुग्ण : २७ रुग्णांचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 23:32 IST

जिल्ह्यात दिवसभरात १०३६ नव्या रुग्णांची नोंद झाली तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

ठळक मुद्दे ग्रामीणमधील १६९ तर शहरातील ८६७ रुग्ण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात दिवसभरात १०३६ नव्या रुग्णांची नोंद झाली तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. कोरोनाच्या या वेगाने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. रुग्णांची एकूण संख्या १२७४५ तर मृतांची संख्या ४४७ वर पोहचली आहे. यात ग्रामीणमधील ३६३४ रुग्ण व ७३ मृत्यू तर शहरातील ९१११ रुग्ण व ३१६ मृत्यू आहेत. उर्वरीत रुग्ण व मृत्यू जिल्ह्याबाहेरील आहेत. कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. यात मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेत चिंतेचे वातावरण आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) आठ रुग्णांचा मृत्यू झाला. यात बेलतरोडी येथील ६२ वर्षीय पुरुष, म्हाडा कॉलनी स्मृतीनगर दत्तवाडी येथील ५९ वर्षीय पुरुष, रविनगर येथील ६१वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, रहाटे हॉस्पिटलजवळील परिसरातील ७२ वर्षीय पुरुष, देवी नगर टेका नाका येथील ४२ वर्षीय पुरुष, पुनापूर पारडी येथील २२ वर्षीय महिला, हिंगणा येथील ८५वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. यात जरीपटका येथील ९० वर्षीय पुरुष, महाभवानी नगर येथील ५२ वर्षीय पुरुष, रामटेके नगर रामेश्वरी येथील ५३ वर्षीय पुरुष, वैशालीनगर कमाल चौक येथील ५०वर्षीय पुरुष, नागसेननगर येथील चंद्रपूर येथील ६७ वर्षीय पुरुष, मध्य प्रदेश येथील ४५ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर माता मंदिर येथील ४९ वर्षीय महिला, हंसापुरी येथील ८७ वर्षीय पुरुष व बजेरिया लोधीपुरा येथील ५८ वर्षीय पुरुष आदींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील बहुसंख्य रुग्णांना श्वसनाचा विकार, निमोनिआ, उच्चरक्तदाब, टाईप टू मधुमेह आदीही आजार होते. उर्वरीत मृतांची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

 खासगी लॅबमधून ३५४ तर अ‍ॅन्टिजन चाचणीत ३९७ रुग्ण बाधित

शासकीय प्रयोगशाळेच्या तुलनेत खासगी प्रयोगशाळा (लॅब) मधून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. आज खासगीमध्ये ३५४ रुग्णांची नोंद झाली. रॅपीड अ‍ॅन्टिजन आता मनपाच्या दहाही झोनमध्ये होत असल्याने चाचण्यांची संख्या वाढली आहे. आज या चाचणीतून ३९७ रुग्णांचे निदान झाले. या शिवाय, आरटीपीसीआर चाचणी करीत असलेल्या मेयोच्या प्रयोगशाळेत १४१, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ४८, एम्सच्या प्रयोगशाळेत ५८, नीरीच्या प्रयोगशाळेत सात, माफसूच्या प्रयोगशाळेत ३१ असे एकूण १०३६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात ग्रामीणमधील १६९ तर शहरातील ८६७ रुग्णांचा समावेश आहे. १२३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५६३९ झाली आहे. सध्या २३५६ रुग्ण उपचार घेत आहेत. 

वेळेत रुग्ण रुग्णालयात पोहचत नसल्याने वाढले मृत्यू

नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या मृत्यूवर डेथ आॅडिट समितीची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत मेयो, मेडिकल, एम्ससह खासगी हॉस्पिटलचे प्रतिनिधी उपस्थित होते. ३१ जुलै ते आतापर्यंत झालेल्या मृत्यूचे डेथ समरी रिपोर्ट व केस पेपर्स संबंधित रुग्णालयांच्या प्रतिनिधींना घेऊन बोलविण्यात आले होते. ‘लोकमत’शी बोलताना डॉ. पातूरकर म्हणाले, रुग्ण रुग्णालयात पोहचण्यात उशीर होत आहे, रुग्ण लवकरात लवकर रुग्णालयात पोहचेल यावर चर्चा झाली. मृत्यूचे प्रमाण कसे कमी करता येईल यावर भर दिला जात आहे, असेही ते म्हणाले. मात्र, सूत्रानुसार, या बैठकीत रुग्ण वेळेत रुग्णालयात न पोहचण्यासाठी शासकीय यंत्रणा योग्य पद्धतीने काम करीत नसल्याचे आरोप, प्रत्यारोप झाल्याचे सांगण्यात येते.दैनिक संशयित : २१६बाधित रुग्ण : १२७४५बरे झालेले : ५६३९उपचार घेत असलेले रुग्ण : २३५६मृत्यू : ४४७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर