शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : मोठा दिलासा : ७५ दिवसानंतर रुग्णसंख्या हजाराखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 21:32 IST

Corona virus, Nagpur news कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून कोरोनाचा प्रादुर्भावही कमी होताना दिसून येत आहे. मागील २४ तासात ९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, ७५ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णांची संख्या हजाराखाली आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी ३० रुग्णांचे बळी गेले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,६४,२१४ तर मृतांची संख्या ८,५८० झाली आहे. आज ३,८९४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

ठळक मुद्दे९७१ रुग्ण, ३० मृत्यू : ग्रामीणच्या तुलनेत जिल्ह्याबाहेरील मृत्यू अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून कोरोनाचा प्रादुर्भावही कमी होताना दिसून येत आहे. मागील २४ तासात ९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, ७५ दिवसांनंतर दैनंदिन रुग्णांची संख्या हजाराखाली आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी ३० रुग्णांचे बळी गेले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,६४,२१४ तर मृतांची संख्या ८,५८० झाली आहे. आज ३,८९४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

एप्रिल महिन्यात कोरोनाचे संकट अधिक गडद झाले होते. शासकीयसह खासगी रुग्णालयांतील खाटांच्या तुलनेत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनही अडचणीत आले होते. या महिन्यात रोज ६ ते ७ हजाराच्या घरात रुग्ण आढळून येत होते. २४ एप्रिल रोजी रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. ७९९९ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. चिंतेचे वातावरण असताना २ मेपासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. मागील १७ दिवसांत वेगाने रुग्णसंख्या कमी झाली. २ मार्च रोजी ९९५ रुग्णांच्या संख्येनंतर आज पहिल्यांदाच रुग्णसंख्या हजाराखाली आली. मात्र रुग्णसंख्येसोबतच चाचण्यांच्या संख्येतही घट आली आहे. सोमवारी १३,२६१ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत नागपूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटीचा दर ७.३२ टक्के तर, मृत्यूदर १.८४ टक्के आहे. रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ९२ टक्क्यांवर गेला आहे.

शहरात ४८७ तर, ग्रामीणमध्ये ४७४ रुग्ण

शहरात आज ९,८१८ चाचण्या झाल्या. यातून ४८७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तर, ग्रामीणमध्ये ३,४४३ चाचण्यामधून ४७४ रुग्णांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. यावरून ग्रामीणमध्ये कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत शहरात ३,२६,२४४ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीणमध्ये १,३६,५२९ रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्याबाहेरील रुग्ण व मृत्यू रोखणार कोण?

शनिवारी शहरात ११, ग्रामीणमध्ये ९ तर जिल्हाबाहेर याच्या अधिक, १० रुग्णांचे बळी गेले आहेत. शहरात आतापर्यंत ५,१३७, ग्रामीणमध्ये २,१८४ तर जिल्ह्याबाहेरील १२५९ रुग्णांचे बळी गेले आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णांची वाढती संख्या व मृत्यू रोखणार कोण, हा प्रश्न आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या रुग्णांकडून प्रादुर्भाव पसरण्याचा सर्वाधिक धोका राहत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या

१५ फेब्रुवारी ४९८

२८ फेब्रुवारी ८९९

१५ मार्च २२९७

२८ मार्च ३९७०

११ एप्रिल ७२०१

२४ एप्रिल ७९९९

-अशी झाली कमी रुग्णसंख्या

२ मे ५००७

५ मे ४३९९

८ मे ३८२७

११ मे २२४३

१४ मे १९९६

१७ मे ९७१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर