शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

कादंबरी बलकवडे यांना अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:06 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी जिल्हा परिषदेमधील फर्निचर घोटाळा प्रकरणात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी जिल्हा परिषदेमधील फर्निचर घोटाळा प्रकरणात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे यांना अवमानना नोटीस बजावली. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

उच्च न्यायालयाने १३ जुलै २०१७ रोजी सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांची यासंदर्भातील जनहित याचिका निकाली काढताना बलकवडे यांना स्वत: घोटाळ्याची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. चौकशी पूर्ण करण्यासाठी त्यांना तीन महिन्याचा वेळ देण्यात आला होता. तसेच, चौकशीच्या अहवालाची प्रत याचिकाकर्ते कारेमोरे यांनाही देण्यास सांगितले होते. बलकवडे यांनी त्या आदेशाची पायमल्ली केली असा कारेमोरे यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी बलकवडे यांच्याविरुद्ध अवमानना याचिका दाखल केली आहे. बलकवडे यांनी या घोटाळ्याची स्वत: चौकशी केली नाही. घोटाळ्याचा आरोप असलेल्या कार्यकारी अभियंता निता ठाकरे यांच्यासह इतर दोन अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली. या समितीने घोटाळा झाला नसल्याचा अहवाल दिला. ही चौकशी बेकायदेशीर व न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारी आहे. करिता, बलकवडे यांच्यावर अवमानना कारवाई करण्यात यावी, असे कारेमोरे यांचे म्हणणे आहे. न्यायालयाने बलकवडे यांना या आरोपांवर स्पष्टीकरण सादर करण्यासाठी चार आठवड्याचा वेळ दिला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. मनोजकुमार मिश्रा यांनी बाजू मांडली.

--------------

असे आहे प्रकरण

रविभवनपुढे जिल्हा परिषदेची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. २०११-१२ मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह, अध्यक्ष, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्ष, लेखाधिकाऱ्याचे कार्यालय यासह विविध विभागांतील फर्निचरचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान, फर्निचर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू चढ्या दराने खरेदी करण्यात आल्या. २६ नोव्हेंबर २०१४ व १८ डिसेंबर २०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार ३ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चाची कामे करायची असल्यास ई-टेंडर प्रक्रिया राबविणे बंधनकारक आहे. परंतु, जिल्हा परिषदेने या निर्णयाचे पालन केले नाही असा कारेमोरे यांचा आरोप आहे.