शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या यात्रा निरर्थक, समर्थन मिळत नाही- चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 19:07 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपवर टीका केली आहे.

आनंद डेकाटे, नागपूर: काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आता रिकामे आहेत. राहुल गांधी यांना यात्रेची सवय आहे. काँग्रेस शेतकरी आत्मसन्मान यात्रा काढत आहे. मात्र कॉंग्रेसच्या यात्रा निरर्थक असतात. त्याला समर्थन मिळत नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते रविवारी प्रसार माध्यमांसोबत बोलत होते.

बावनकुळे म्हणाले, दिवसाला बारा तास वीज आम्हाला शेकऱ्यांना पुढच्या तीन वर्षात द्यायची आहे. शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे .शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ते बांधत आहोत. पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना १२ हजार रुपये देत आहे.असे अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. आता कॉंग्रेसकडे सांगण्यासारखे काही शिल्लक नाही. ६५ वर्षात त्यांनी काय केलं सांगता येत नाही. जनतेमध्ये संभ्रम तयार करून राजकारणाची पोळी शेकण्यासाठी यात्रा काढल्या जातात,असे बावनकुळे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना जे आश्वासन २०१४, २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये दिले ते सर्व केंद्र सरकार पूर्ण करीत आहे.काँग्रेसने त्यांच्या ६५ वर्षाच्या काळात जे करू शकले नाही ते सर्व महाराष्ट्रातील महायुतीचे डबल इंजिन सरकार मार्गी लावत आहे.

सरकार बदलले, मंत्री बदलले तरी त्यांचे ओसडी, स्वीय सहाय्यक बदलत नाही. तेव्हा त्या सरकारच्या अजेंडावर काम करणारा अधिकारी आले पाहिजे आणि अधिकारी जे अनेक वर्ष एकाच ठिकाणी आहे त्यांनी फिल्डवरही काम केले पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

भाजप जिल्हाध्यक्ष निवडीवर नाराजी नाहीभारतीय जनता पक्षाने निवडलेल्या जिल्हाध्यक्षांबाबत कुठलीही नाराजी नाही आहे. सर्व जिल्हाध्यक्षांची निवड कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन करण्यात आल्या आहेत. एका जागेसाठी चार जण इच्छुक असतात. त्यामुळे नाराजी वाटते.पण तसे नाही.ज्यांची नाराजी आहे त्यांना कुठल्या ना कुठल्या मंडळामध्ये सामावून घेणार आहे, असे बावनकुळे म्हणाले. केंद्र सरकारने नक्षलवाद मोडून काढण्याचा संकल्प केला आहे गृहमंत्री एक कणखर आहेत अशा कुठल्याही धमक्यांना सरकार भीक घालणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूर