शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

अभिजित वंजारी यांचा विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी दावा

By कमलेश वानखेडे | Updated: July 12, 2023 13:58 IST

महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांना केली पत्राद्वारे विनंती

नागपूर : काँग्रेसकडूननागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे युवा आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी दावा केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये विदर्भातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या तेली समाजाला मंत्रीपद देण्यात आले नाही. त्यामुळे आता तरी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपदी आपल्याला संधी द्यावी, अशी विनंती वंजारी यांनी अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांना पत्र पाठवून केली आहे.

आ.वंजारी यांनी पत्रात म्हटले आहे की, मी डिसेंबर २०२० मध्ये विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या उमेदवाराला ही प्रतिष्ठेची जागा जिंकता आली. २०१९ ते जून २०२२ पर्यंतच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तेली जाती समाजाला मंत्रीपद दिले गेले नाही. तेली समाज हा विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समाज आहे. दुसरीकडे भाजपने प्रदेशाध्यक्षपदी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध स्तरावर तेली समाजाला प्रतिनिधित्व दिले आहे.

अर्थखाते अजित पवारांकडे नकोच..; बच्चू कडू स्पष्टच बोलले

आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने विधानपरिषदेत काँग्रेस हा विरोधी पक्षातला सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. मी एक चांगला वक्ता असून विधानपरिषदेचा अडीच वर्षांच्या अल्प कालावधीत मी १२५ पेक्षा जास्त वेळा सभागृहातील चर्चेत भाग घेतला आहे. प्रश्न मांडले आहेत. काँग्रेसचा कट्टर समर्थक म्हणून मला विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती वंजारी यांनी पत्राद्वारे केली आहे.

शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीमुळे काँग्रेसला बळ

- विधान सभेतील आमदारांपाठोपाठ विधान परिषदेतील शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदारांमध्येही फूट पडली आहे. उपसभापती निलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, विपलव बाजोरिया यांना उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ ८ वर आले आहे. तर राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, विक्रम काळे, अमोल मिटकरी, सतीश चव्हाण अनिकेत तटकरे हे अजित पवार गटात सामील झाल्याने राष्ट्रवादीचे (शरद पवार) संखाबळ ४ वर आले आहे. काँग्रेसचे ९ सदस्य आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या मागणीला बळ मिळाले आहे. १७ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यापूर्वी या विषयावर मार्ग निघाला, अशी काँग्रेसची भूमिका आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAbhijit Wanjariअभिजीत वंजारीcongressकाँग्रेसnagpurनागपूर