शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

राष्ट्रपती राजवटीबद्दल काँग्रेस राज्यपालांना निवेदन देणार - नाना पटोले

By कमलेश वानखेडे | Updated: July 13, 2023 18:18 IST

भाजपने महाराष्ट्राला कलंक लावल्याची टीका

नागपूर : महायुती सरकारमध्ये मंत्र्यांची नियुक्ती झाली मात्र खाते वाटपामध्ये कोणाला कोणते खाते मिळणार यावर चर्चा सुरू आहे. जनता उपाशी आणि सरकार तुपाशी, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही. राष्ट्रपती व राज्यपाल यांनी यात तातडीने हस्तक्षेप केला पाहिजे. भीती दाखवून विरोधकांना दाबण्याची भीती सरकार दाखवत आहे. यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. एकूणच परिस्थीती पाहता भाजपने महाराष्ट्राला कलंक लावला असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काँग्रेसतर्फे राज्यपालांना निवेदन देऊन केली जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, जनतेला कुणाकडे कोणते खाते आहे याचे काही देणेघेणे नाही. हे जनतेला लुटणारे सरकार झाले आहे. अनेक भागात पेरणे झाले नाही. अवकाळी पावसाची मदत मिळाली नाही. शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांना लुटायला निघाले आहेत. नकली टीम करून कृषी केंद्रावर आपलाच अधिकारी पाठवायचे व लुटायचे, असे सुरू आहे. वर्षभर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. एक मंत्री सहा सहा जिल्ह्यांचा पालकमंत्री राहत असेल तर शेतकऱ्यांना कसा न्याय मिळेल, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.

काँग्रेस विरोधीपक्ष नेत्याबाबत अध्यक्षांना पत्र देईल

- ज्याचे संख्याबळ जास्त त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो. ही एक पद्धत आहे. दोन्ही सभागृहात ते संख्याबळ काँग्रेसजवळ आहे. यात मतदान होत नाही. विधानसभा अध्यक्षांना घोषणा करावी लागते. आता काँग्रेस पक्षाला निर्णय घ्यायचा आहे. १७ जुलैला अधिवेशन सुरू होत आहे. त्या दिवशी काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेते पदाचे पत्र अध्यक्ष व सभापतींना दिले जाईल. हायकमांडकडून निश्चित होणाऱ्या आमदाराचे नाव दिले जाईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

लोकसभेच्या ३० जागांवर फोकस

- राज्यातील लोकसभेच्या ३० जागांवर फोकस केला आहे. त्यांची ए, बी अशी कॅटेगरी केली आहे. दिल्लीत वरिष्ठ नेत्यांनी राज्यातील सगळ्या प्रमुख नेत्यांना बोलवून त्यांच्याकडून लोकसभेच्या तयारीची माहिती घेतली. कोर कमिटीच्या चार-पाच मीटिंग झाल्या. नवीन लोकांची नेमणूक करून लोकसभेची तयारी सुरू केली आहे, असेही पटोले यांनी सांगितले.

मुंडे भगिनी अनुपस्थित, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न

- भाजपच्या मुंबईतील बैठकीला मुंडे भगिनी अनुपस्थित असल्याकडे लक्ष वेधले असता हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचे पटोले म्हणाले. याबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारा म्हणजे त्यांच्या काय भावना आहेत हे समजून येईल. भाजपचे नेते उद्या काँग्रेसमध्ये गेले, असे खडसे बोलले होते. हा त्यांचा इशारा सूचक होता. मी दावा करणार नाही, पण वेळेवर सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील, असे सूचक वक्तव्यही पटोले यांनी केले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेBJPभाजपाPresident Ruleराष्ट्रपती राजवट