शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणते पराभवाच्या भीतीनेच प्रभाग रचना केली रद्द; भाजपचा वेगळा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2022 12:29 IST

तीन ऐवजी चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार निवडणूक

नागपूर : महाविकास आघाडीने केलेली तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द करून पुन्हा जुन्याच चार सदस्यीय पद्धतीने रचना करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाचा काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला आहे. गेल्या १५ वर्षांत नागपूर महापालिकेत सत्ता असतानाही भाजपने जनहिताची कामे केली नाही. आता पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे प्रभाग रचनेची खेळी करून निवडणुका जिंकण्याचा डाव भाजपने आखला असल्याची टीका केली आहे. तर भाजपने यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने लोकसंख्येचे निकष डावलून चुकीची प्रभाग रचना केली होती. या सरकाने त्यात दुरुस्ती केली, असा युक्तिवाद भाजपने केला आहे.

प्रभाग बदलले तरी जनता सोडणार नाही 

- चार सदस्यीय प्रभागात नगरसेवकांवर जबाबदारी निश्चित होत नव्हती. राज्यकर्त्यांनी जनहित विचारात घेऊन निर्णय घ्यायला हवा होता. गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेत सत्तेत असलेली भाजप सपशेल अपयशी ठरली. पिण्याचे पाणी, कचरा संकलन खासगीकरण झाले. फसव्या योजना दिल्या. उन्हाळ्यात पिण्याचे पाणी नाही तर पावसाळ्यात घरात पाणी असे चित्र होते. आता पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जनतेने मनात ठाणले आहे. कितीही प्रभाग बदलले तरी जनता भाजपला माफ करणार नाही.

- आ. विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस

पराभव दिसत असल्याने निर्णय 

-सर्वोच्च न्यायालयाला न मानणारी सरकार आहे. तातडीने निवडणूक घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला होता. त्यानुसार प्रक्रिया झाली. आता जनतेत आपली पकड सैल झाली आहे हे लक्षात आल्यामुळे पक्षाच्या ताकदीवर निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने प्रभाग रचना बदलण्याची खेळी केली आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. भाजपने हा निर्णय जनहितासाठी नव्हे तर पक्ष बळकटीसाठी घेतलेला आहे. चार सदस्यीय प्रभागात पुन्हा जनतेचा फूटबॉल होईल.

- दुनेश्वर पेठे, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

१२० जागा जिंकूच 

- २०११ पासून जनगणना झाली नसतानाही जागा वाढविल्या. जनगणनेचे ब्लॉक तोडल्याचा सरकारकडे तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेत सरकारने निर्णय घेतला. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. बूथपासून प्रभागापर्यंत सक्रिय कार्यकर्त्यांचा संच आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते सतत शहराच्या विकासासाठी राबत आहेत. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षांत नागपूरसाठी विकास निधी दिला नाही. जनता विकासकामांच्या पाठीशी राहील. यावेळी १२० पेक्षा जास्त जागा जिंकू.

- आ. प्रवीण दटके, शहर अध्यक्ष, भाजप

भाजप म्हणते..

महानगरपालिकेच्या निवडणुका २०१७ प्रमाणे चारसदस्यीय प्रभाग पद्धतीने करण्याच्या निर्णयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयामुळे आगामी निवडणूक सोपी झाल्याचा पदाधिकाऱ्यांचा सूर आहे. विशेष म्हणजे ज्यांना उमेदवारीबाबत साशंकता होती त्यांच्या आशादेखील परत पल्लवित झाल्या आहेत.

तीनसदस्यीय पद्धतीची घोषणा झाल्यानंतर भाजपमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच होणार असल्याचे चित्र स्पष्ट होते. शिवाय अनेक प्रभागांच्या रचनेतच बदल झाल्यामुळे भाजपला काही ठिकाणी फटका बसण्याचीदेखील चिन्हे होती. यामुळे भाजपने नव्याने नियोजन करण्यावर भर दिला होता; परंतु आता ही प्रभाग रचना रद्द झाल्यामुळे भाजपसाठी महापालिकेची लढाई बऱ्याच अंशी सोपी झाल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मागील पाच वर्षांपासून सातत्याने बूथपातळीवर भाजपचा संपर्क आहे. प्रभाग तसेच कायम राहणार असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी फारशी अडचण जाणार नाही. कॉंग्रेस व शिवसेनेत अंतर्गत वाद सुरू असताना आम्ही संपूर्ण लक्ष बूथ मजबुतीवरच दिले होते. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणुका झाल्या तर निश्चितच आमचा फायदा होईल. चारसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे ओबीसींनादेखील न्याय मिळेल, असे प्रतिपादन आ. कृष्णा खोपडे यांनी केले.

तीनसदस्यीय प्रभाग पद्धती जाचकच

तीन सदस्यीय प्रभागरचनेमध्ये कुठे दोन महिला, तर कुठे दोन पुरुष असल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना निवडणुकीपासून वंचित राहण्याची वेळ आलेली होती. संबंधित रचनेत मोठ्या प्रमाणात तफावत होती. मात्र चारसदस्यीय प्रभाग पद्धतीचा सर्वांनाच फायदा होईल, असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसnagpurनागपूर