शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

खासदार नाना पटोलेंचा राजीनामा काँग्रेसच्या इशाऱ्यावर; भाजपा नेत्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 9:58 AM

भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले हे गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. काँग्रेसच्या इशाऱ्यावरच नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे, असा आरोप करीत भाजपाने पटोले यांच्या राजीनाम्याचे खापर काँग्रेसवर फोडले आहे.

ठळक मुद्देपक्षाला फरक पडणार नसल्याचा दावास्वागतासाठी पोहचले काँग्रेसजन

आॅनलाईन लोकमतनागपूर : भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी भाजपा आणि पक्षाच्या शीर्ष नेतृत्वावर केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत. पटोले हे गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. गुजरात निवडणुकीत याचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसने त्यांना जाळ्त ओढण्याचे डावपेच आखले आहेत. काँग्रेसच्या इशाऱ्यावरच नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे, असा आरोप करीत भाजपाने पटोले यांच्या राजीनाम्याचे खापर काँग्रेसवर फोडले आहे.पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व राज्यमंत्री सुधाकर देशमुख यांच्यासह भाजपाचे नागपूर शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, चंदन गोस्वामी, देवेंद्र दस्तुरे आदींनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत नाना पटोले यांच्या भूमिकेवर टीका केली. राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट असून राज्यातील फडणवीस सरकारच्या कामगिरीवर नाना पटोले यांनी टीका केली होती. यावर देशमुख म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारची मदत न घेता राज्यात ३४ हजार कोटींची तरतूद करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली आहे. यापैकी ४१ लाख शेतकºयांना १९ हजार कोटींचे वितरण झाले असून उर्वरित रक्कम आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उलट २००८ ला केंद्रातील काँग्रेस सरकारने केलेल्या ७० हजार कोटींच्या कर्जमाफीचा विदर्भातील शेतकऱ्यांना लाभ झाला नसल्याचा दावा त्यांनी केला.नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी हे खासदारांचे ऐकत नाही व त्यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न ऐकून घेतला नाही असाही आरोप केला होता. यावर देशमुख म्हणाले, भाजपामध्ये अंतर्गत लोकशाही असून नेत्यांना विचार मांडण्यासाठी व्यासपीठ आहे. तेथे पटोले यांनी भूमिका मांडायला हवी होती. उलट या काळात त्यांनी राहुल गांधी, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांचे आरोप आणि राजीनामा म्हणजे काँग्रेसच्या इशाऱ्यावर चाललेले राजकीय डावपेच असल्याचे सिद्ध होते, असेही त्यांनी सांगितले.

पटोलेंना स्थानिक पातळीवर विरोधगेल्या काही महिन्यांपासून पटोले हे पक्षविरोधी भूमिका घेत असल्याने भंडारा, गोंदियाचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत. त्यांना कुणाचेही समर्थन नाही. या काळात देशात आणि राज्यात झालेल्या प्रत्येक निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळाले असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या कामगिरीवर जनता खूश आहे. त्यामुळे पटोले यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला काहीही फरक पडणार नाही.नागपुरात रात्री ९ वाजता आगमनभाजपावर नाराज असलेले नाना पटोले हे खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी रात्री विमानाने नागपुरात दाखल झाले. पटोले यांनी भाजपाला रामराम ठोकल्याने सुखावलेल्या काँग्रेसच्या काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी विमानतळावर पोहचून पटोले यांचे स्वागत केले. तर, पक्षाकडून अद्याप कुठलेच दिशानिर्देश न आल्यामुळे काहींनी दूर राहणेच पसंत केले.पटोले यांचे रात्री ९ वाजता विमानतळावर आगमन होताच त्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. भंडारा,गोंदियासह नागपुरातहूनही त्यांचे समर्थक पोहचले होते. विशेष म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके, नितीन कुंभलकर यांच्यासह राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठेही पोहचले. त्यांनी पटोले यांचे स्वागत केले. शेळके यांनी वाराणसीहून आणलेले गंगाजल पटोले यांना देत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची विनंती केली. पटोले यांनी ११ डिसेंबर रोजी गुजरात येथे राहुल गांधी यांच्यासोबत प्रचार सभेत सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र काँग्रेसमध्ये प्रवेश घेतील का, हे अद्यापही स्पष्ट केलेले नाही. पटोले यांचा काँग्रेसप्रवेश अधिकृतपणे व्हायचा असल्यामुळे काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी जाणे टाळले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कुठलाही संदेश आलेला नाही. अशापरिस्थितीत स्वागतासाठी जाणे योग्य राहील का, असा प्रश्न काही नेत्यांना पडला. पुढे गुंता वाढू नये म्हणून या नेत्यांनी पटोलेंच्या भेटीसाठी जाणे टाळले.विमानतळावर किसान विकास आघाडीचे प्रशांत पवार, मिलिंद महादेवकर, गणेश साबणे, शेखर शिरभाते, उमेश डांगे, विनोद पडोळे, रवींद इटकेलवार आदींनी पटोलेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत स्वागत केले. पटोले आज, शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. याकडे भाजपासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोले