शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात काँग्रेसचे शहर व जिल्हाध्यक्ष बदलणार; इच्छुकांना करावे लागतील अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 16:13 IST

Nagpur : अखिल भारतीय काँग्रेसने देशभरातील अर्ध्याहून जास्त राज्यांतील शहर व जिल्ह्यात संघटनात्मक फेरबदल केल्यानंतर आता महाराष्ट्रातही संघटन सृजन अभियान राबविण्यात येणार आहे.

कमलेश वानखेडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय काँग्रेसने देशभरातील अर्ध्याहून जास्त राज्यांतील शहर व जिल्ह्यात संघटनात्मक फेरबदल केल्यानंतर आता महाराष्ट्रातही संघटन सृजन अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यातील सर्वच शहर व जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची नव्याने नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी अ. भा. काँग्रेसने ३७निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. संबंधित निरीक्षक काँग्रेसचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांपासून ते काँग्रेस विचारांच्या लोकांची मते घेऊन शहर व जिल्हाध्यक्ष पदासाठी पॅनल तयार करून अ.भा. काँग्रेसकडे पाठविणार आहे.

अ. भा. काँग्रेसने छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, हिमाचल, हरयाणा, जम्मू काशीमर, मणीपूर, मिझोराम, नागालॅण्ड, तेलंगना, आध्र प्रदेश, तामीळनाडू, ओरिसा, झारखंडा, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये संघटन सृजन अभियान राबवीत अनेक शहर व जिल्ह्यातील अध्यक्षांच्या नियुक्तीत धक्कातंत्र वापरले आहे. बऱ्याच ठिकाणी नेत्यांच्या मर्जीतील व्यक्तिपेक्षा काँग्रेस विचारांच्या लोकांना अपेक्षित असलेल्या कार्यकर्त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. याशिवाय राज्यातील बऱ्याच नेत्यांनी दुसऱ्या राज्यात निरीक्षक म्हणून काम केले आहे. याची जाणीव असल्यामुळे राज्यातील नेत्यांनीही हे अभियान गांभीर्याने घेतले आहे.

निरीक्षक नेमके काय करतील

  • अ. भा. काँग्रेसने नेमलेले निरीक्षक संबंधित जिल्ह्यातील काँग्रेस नेते, विधानसभा, ब्लॉक स्तरावरील पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, एनजीओ, सिव्हिल सोसायटी, व्यावयासिक संघटना, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, काँग्रेस हितेशी यांच्या भेटी घेऊन त्यांची मते जाणून घेतील.
  • निरीक्षकांना किमान सात दिवस मुक्कामी असणे बंधनकारक आहे. दररोजच्या भेटीचा अहवाल अ.भा. काँग्रेककडे सादर करावा लागेल.
  • या चर्चेतून येणाऱ्या इनपूटच्या आधारे शहर व जिल्हाध्यक्ष पदासाठी जास्तीत जास्त सहाजणांचे पॅनल तयार करून अ. भा. काँग्रेसकडे पाठविले जाईल.
  • निरीक्षक नावे पाठविताना प्राधान्यक्रम देऊ शकतात. नेत्यांचा कल, लिंग, जात, विभागीय समतोल, सामाजिक समीकरण आदी बाबी विचारात घेऊन हा क्रम ठरविला जाईल.
  • निरीक्षकाने पाठविलेले पॅनल व अहवालाच्या आधारावर अ. भा. काँग्रेसकडून शहर व जिल्हाध्यक्षांची घोषणा केली जाईल.

 

इच्छुकांना करावे लागतील अर्ज

राज्यासाठी नेमलेल्या ३७ निरीक्षकांना लवकरच जिल्हानिहाय जबाबदारी सोपविली जाईल. अभियानासाठी पुढील १५ दिवसात वेळापत्रक जाहीर होईल. या कालावधीत शहर व जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांना निरीक्षकांकडे अर्ज सादर करावा लागेल. आलेल्या अर्जातील सहाजणांचे पॅनल निरीक्षक तयार करेल. एखाद्याने अर्ज भरला नाही, पण काँग्रेसजनांचा कल त्याच्या बाजूने असेल तर त्याचेही नाव निरीक्षक पॅनलमध्ये पाठवू शकतात.

निरीक्षकांवरही दिल्लीतून 'वॉच'

जिल्हास्तरावर नेत्यांच्या प्रभावात येऊन निरीक्षक 'सेट' होऊ नये म्हणून त्यांच्यावरही दिल्लीतून 'वॉच' ठेवला जाईल. यासाठी एका गुप्त व्यक्तीची नेमणूक केली जाईल. त्यांची नावे जाहीर केले जाणार नाही. तेदेखील माहिती घेतात, निरीक्षक व गुप्त व्यक्तीचा अहवाल मॅच होतो का हे देखील पाहिले जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Congress to Replace City, District Chiefs; Applicants Must Apply

Web Summary : Maharashtra Congress will revamp city and district leadership. Applicants must apply. Observers will gather opinions, create panels for appointments. Delhi monitors observers.
टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूर