शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

थकबाकी संपविण्यासाठीच सवलत

By admin | Updated: June 20, 2016 02:57 IST

२००१ सालापासून ७५ हजार उपभोक्त्यांकडे पाणीपट्टीची थकबाकी आहे. यात झोपडपट्टीधारकांसह अपार्टमेंटमधील रहिवाशांचाही समावेश आहे.

राजकारण नाही : नियमित बिल भरणाऱ्यांनाही सवलतनागपूर : २००१ सालापासून ७५ हजार उपभोक्त्यांकडे पाणीपट्टीची थकबाकी आहे. यात झोपडपट्टीधारकांसह अपार्टमेंटमधील रहिवाशांचाही समावेश आहे. यामागे अनेक कारणे आहेत. परंतु यात कोणत्याही स्वरूपाचे राजकारण न करता थकबाकीला कायमचा पूर्णविराम देण्यासाठी पाणीपट्टीच्या थकबाकीवर ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी यांनी रविवारी मांडली.सभापतिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या सर्व १० झोनमध्ये प्रत्येकी दोन दिवस उपभोक्त्यांचा आढावा घेतला. यात २ लाख ७५ हजार उपभोक्ते पाणीपट्टीची रक्कम नियमित भरत असल्याचे निदर्शनास आले. परंतु ७५ हजार उपभोक्त्यांकडे अनेक वर्षांपासून पाणीपट्टीची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले. यातील काही जणांकडे २००१ सालापासूनची थकबाकी आहे. यामागील कारणांचा शोध घेतला असता दूषित पाण्याचा पुरवठा, अपुरा पाणीपुरवठा, जादा बिल, सरासरी अधिक बिल, अशी अनेक कारणे असल्याचे निदर्शनास आले. थकबाकी वसुलीसाठी ७,५०० उपभोक्त्यांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या, तसेच २१ हजार उपभोक्त्यांनी थकीत बिल भरले. परंतु त्यानंतरही ५४ हजार उपभोक्त्यांकडे अनेक वर्षांपासूनची थकबाकी कायम आहे. यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या चार दिवसात ३,५०० उपभोक्त्यांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. याचा महापालिका व उपभोक्ते या दोघांनाही लाभ होणार आहे. यात राजकारणाचा प्रश्नच निर्माण होत नाही. ज्या लोकांना पाणी मिळत नव्हते त्यांना पाणी मिळेल व महापालिकेला पाणीपट्टीतून महसूल प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नियमित बिल भरणाऱ्यांनही १० टक्के सूटथकबाकीदारांना एकमुस्त ५० टक्के रक्कम भरल्यास बिलाची पाटी कोरी होणार आहे. यासोबतच नियमित बिल भरणाऱ्यांवर अन्याय नको म्हणून त्यांनाही १० टक्के सवलत दिली जाणार आहे. यासंदर्भात २१ जूनला जलप्रदाय समितीची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत सूट देण्याच्या प्रस्तावावर चर्चा होईल. चार दिवसात बिल भरणाऱ्यांना १० टक्के तर ८ दिवसात बिल भरणाऱ्यांना ५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जोशी यांनी दिली. अत्यंत चांगली योजना गतकाळात अनेक लोकांनी घरे विकत घेतली. परंतु जुन्या घरमालकांची अनेक वर्षांपासूनची थकबाकी आहे. त्यामुळे जुनी थकबाकी असल्याने नवीन घरमालकांना नळजोडणी मिळत नव्हती. त्यामुळे अशा ५४ हजाराहून अधिक लोकांचा दोष नसतानाही त्यांना पाणी मिळत नव्हते. त्यांना दिलासा मिळाला आहे. मी स्वत: हनुमाननगर झोनमध्ये भेट दिली असता, या लोकांनी या योजनेवर समाधान व्यक्त केले. यामुळे उपभोक्त्यांसोबतच महापालिकेलाही नियमित पाणीपट्टी मिळणार आहे. ही अत्यंत चांगली योजना आहे.-सुधाकर कोहळे, भाजप शहर अध्यक्ष व आमदार