शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार
3
आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
4
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
5
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
6
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
7
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
8
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
9
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
10
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
11
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
12
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
13
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
14
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
15
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
16
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
17
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
18
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
19
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
20
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकी संपविण्यासाठीच सवलत

By admin | Updated: June 20, 2016 02:57 IST

२००१ सालापासून ७५ हजार उपभोक्त्यांकडे पाणीपट्टीची थकबाकी आहे. यात झोपडपट्टीधारकांसह अपार्टमेंटमधील रहिवाशांचाही समावेश आहे.

राजकारण नाही : नियमित बिल भरणाऱ्यांनाही सवलतनागपूर : २००१ सालापासून ७५ हजार उपभोक्त्यांकडे पाणीपट्टीची थकबाकी आहे. यात झोपडपट्टीधारकांसह अपार्टमेंटमधील रहिवाशांचाही समावेश आहे. यामागे अनेक कारणे आहेत. परंतु यात कोणत्याही स्वरूपाचे राजकारण न करता थकबाकीला कायमचा पूर्णविराम देण्यासाठी पाणीपट्टीच्या थकबाकीवर ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी यांनी रविवारी मांडली.सभापतिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महापालिकेच्या सर्व १० झोनमध्ये प्रत्येकी दोन दिवस उपभोक्त्यांचा आढावा घेतला. यात २ लाख ७५ हजार उपभोक्ते पाणीपट्टीची रक्कम नियमित भरत असल्याचे निदर्शनास आले. परंतु ७५ हजार उपभोक्त्यांकडे अनेक वर्षांपासून पाणीपट्टीची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले. यातील काही जणांकडे २००१ सालापासूनची थकबाकी आहे. यामागील कारणांचा शोध घेतला असता दूषित पाण्याचा पुरवठा, अपुरा पाणीपुरवठा, जादा बिल, सरासरी अधिक बिल, अशी अनेक कारणे असल्याचे निदर्शनास आले. थकबाकी वसुलीसाठी ७,५०० उपभोक्त्यांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या, तसेच २१ हजार उपभोक्त्यांनी थकीत बिल भरले. परंतु त्यानंतरही ५४ हजार उपभोक्त्यांकडे अनेक वर्षांपासूनची थकबाकी कायम आहे. यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या चार दिवसात ३,५०० उपभोक्त्यांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे. याचा महापालिका व उपभोक्ते या दोघांनाही लाभ होणार आहे. यात राजकारणाचा प्रश्नच निर्माण होत नाही. ज्या लोकांना पाणी मिळत नव्हते त्यांना पाणी मिळेल व महापालिकेला पाणीपट्टीतून महसूल प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)नियमित बिल भरणाऱ्यांनही १० टक्के सूटथकबाकीदारांना एकमुस्त ५० टक्के रक्कम भरल्यास बिलाची पाटी कोरी होणार आहे. यासोबतच नियमित बिल भरणाऱ्यांवर अन्याय नको म्हणून त्यांनाही १० टक्के सवलत दिली जाणार आहे. यासंदर्भात २१ जूनला जलप्रदाय समितीची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत सूट देण्याच्या प्रस्तावावर चर्चा होईल. चार दिवसात बिल भरणाऱ्यांना १० टक्के तर ८ दिवसात बिल भरणाऱ्यांना ५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जोशी यांनी दिली. अत्यंत चांगली योजना गतकाळात अनेक लोकांनी घरे विकत घेतली. परंतु जुन्या घरमालकांची अनेक वर्षांपासूनची थकबाकी आहे. त्यामुळे जुनी थकबाकी असल्याने नवीन घरमालकांना नळजोडणी मिळत नव्हती. त्यामुळे अशा ५४ हजाराहून अधिक लोकांचा दोष नसतानाही त्यांना पाणी मिळत नव्हते. त्यांना दिलासा मिळाला आहे. मी स्वत: हनुमाननगर झोनमध्ये भेट दिली असता, या लोकांनी या योजनेवर समाधान व्यक्त केले. यामुळे उपभोक्त्यांसोबतच महापालिकेलाही नियमित पाणीपट्टी मिळणार आहे. ही अत्यंत चांगली योजना आहे.-सुधाकर कोहळे, भाजप शहर अध्यक्ष व आमदार