शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

मृताकडे तिकीट न सापडल्यासही भरपाई देणे बंधनकारक : हायकोर्टाचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 8:59 PM

रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीजवळ अधिकृत तिकीट आढळून आले नाही तरी वारसदारांना भरपाई अदा करणे आवश्यक आहे. कारण, अपघातामुळे मयत प्रवाशाजवळचे तिकीट हरवले जाऊ शकते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देरेल्वे अपघाताचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेअपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीजवळ अधिकृत तिकीट आढळून आले नाही तरी वारसदारांना भरपाई अदा करणे आवश्यक आहे. कारण, अपघातामुळे मयत प्रवाशाजवळचे तिकीट हरवले जाऊ शकते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी एका प्रकरणात दिला.वरुड, जि. वर्धा येथील संतोष देवतळे यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. पंचनाम्यात त्यांच्याजवळ रेल्वे प्रवासाचे अधिकृत तिकीट आढळून आले नाही. त्यामुळे रेल्वे दावा न्यायाधिकरणने वारसदार पत्नी रंजना, मुले रोहित, आदित्य व आई अनसूया यांना भरपाई नाकारली होती. त्यामुळे या वारसदारांनी उच्च न्यायालयात प्रथम अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील मंजूर करून रेल्वे न्यायाधिकरणचा वादग्रस्त आदेश रद्द केला. तसेच, वरीलप्रमाणे सुधारित निर्वाळा देऊन वारसदारांना तीन महिन्यात आठ लाख रुपये भरपाई अदा करण्याचा आदेश मध्य रेल्वेला दिला. १५ ऑगस्ट २०१६ रोजी संतोष हा रेल्वेने नागपूर येथून सेवाग्रामला परत जात होता. त्याने या प्रवासाचे अधिकृत तिकीट खरेदी केले होते. रेल्वे सेवाग्रामला पोहचल्यानंतर संतोष खाली पडला. या दुर्दैवी घटनेमुळे त्याचा मृत्यू झाला. रेल्वे न्यायाधिकरणने वारसदारांचा भरपाईचा अर्ज ३१ डिसेंबर २०१८ रोजी फेटाळला होता.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयrailwayरेल्वेAccidentअपघात