शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

दिलासादायक! ६४ टक्के रुग्णांची कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 11:00 AM

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक चित्र समोर आले आहे. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण बरे होत असलेल्यांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे.

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक चित्र समोर आले आहे. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण बरे होत असलेल्यांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ११७ म्हणजे १९.२४ टक्के होती. पंधरा दिवसांत म्हणजे १५ मे रोजी टक्केवारीत वाढ होऊन ती ५५.१२ टक्क्यांवर आली, तर २० मे रोजी आणखी सुधारणा होत बरे झालेल्या रुग्णांच्या टक्केवारीचा आकडा ६४.७२ टक्के इतका झाला आहे.देशभरात हाहाकार माजविणाºया कोरोना विषाणूची साथ नेमकी संपणार तरी कधी, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गाशी झुंजतच जगावे लागणार असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. या पार्श्वभूमीवर ‘कोविड-१९’चे बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण हे या आजाराची भीती काहीशी कमी करण्यास मदत करणारी ठरणार आहे. विदर्भात सर्वाधिक रुग्णांची नोंद आतापर्यंत नागपुरात झाली आहे. अकोल्यातही झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. विशेष म्हणजे आता सर्वच जिल्ह्यात रुग्ण दिसून येत असलेतरी त्या तुलनेत कोरोनामुक्त होणाºया रुग्णांची संख्याही वाढत आहे. ८ मे रोजी विदर्भात ६०८ रुग्णसंख्या होती. यातील ११७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यांची टक्केवारी १९.२४ टक्के होती. ९ मे रोजी १३७ रुग्ण बरे झाले, टक्केवारी २१.६७ टक्के होती. १० मे रोजी १८५ रुग्ण बरे झाले, यांची टक्केवारी २८.२४ टक्के होती. ११ मे रोजी २०१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. टक्केवारी ३०.१८ टक्के होती. १२ मे रोजी २४७ रुग्ण बरे झाले. टक्केवारी ३५.९५ टक्के होती. १३ मेपासून अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुधारित डिस्चार्ज धोरण लागू करण्यात आले. यामुळे १३ मे रोजी ३१० रुग्ण बरे झाले. यांची टक्केवारी ४२.९९ टक्के होती. १४ मे रोजी १४ मे ३४९ रुग्ण बरे झाले. यांची टक्केवारी ४६.७२ टक्के होती. १५ मेपासून नागपुरातही सुधारित डिस्चार्ज धोरण राबविणे सुरू झाले. यामुळे एकट्या मेयो रुग्णालयातून ५१ रुग्ण बरे झाले. तर विदर्भात ४३० म्हणजे ५५.१२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले. १६ मे रोजी ही टक्केवारी वाढून ६०.३२ टक्क्यांवर पोहचली. १७ मे रोजी यात किंचित घट आली. बरे होणाºया रुग्णांची टक्केवारी ५८.८५ टक्के असताना १८ मे रोजी पुन्हा यात वाढ होऊन ती ६३.९२ टक्क्यांवर पोहचली. १९ मे रोजी बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६१९ वर गेली. टक्केवारीतही वाढ होऊन ६६.३४ पोहचली तर २० मे पर्यंत १,०१२ रुग्णांची नोंद झाली असताना ६५५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यांची टक्केवारी ६४.७२ टक्के होती, हे दिलासादायक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस