शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

परत येरे माझ्या मागल्या

By admin | Updated: September 21, 2014 01:14 IST

‘नॅक’ समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ‘कॅम्पस’चा परिसर चकाचक झाला होता. याशिवाय पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचीदेखील

नागपूर विद्यापीठ : ‘नॅक’ जाताच वसतिगृहात अस्वच्छतानागपूर : ‘नॅक’ समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ‘कॅम्पस’चा परिसर चकाचक झाला होता. याशिवाय पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचीदेखील ऐन वेळेवर स्वच्छता करण्यात आली होती. परंतु ‘नॅक’ची पाठ वळल्यावर परत अस्वच्छता दिसून येत असून प्रशासनाच्या या दुर्लक्षाबाबत विद्यार्थ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. एकूणच सर्वकाही ‘आॅल इज वेल’चा हा ‘ड्रामा’ केवळ आठवड्याकरिताच होता अशी विद्यार्थ्यांमध्ये भावना आहे.‘नॅक’ समितीच्या पाहणीदरम्यान विद्यापीठाची चांगली प्रतिमा समोर यावी याकरिता प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. एरवी जिकडे अधिकारी ढुंकूनदेखील पाहत नाहीत अशा पदव्युत्तर वसतीगृहाला चकाचक करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनीदेखील विद्यापीठाची बाजू राखण्यासाठी ‘नॅक’ समितीच्या सदस्यांसमोर त्यांच्या समस्या बोलून दाखविल्या नाहीत. परंतु ‘नॅक’ समिती जाऊन आठवडादेखील उलटत नाही तो वसतीगृहाची अवस्था परत खराब व्हायला लागली आहे. येथील स्वच्छतागृहांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली असून पाईपलादेखील गळती लागली आहे. सोबतच परिसरातदेखील अस्वच्छता वाढीस लागली आहे अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.सोबतच वसतीगृहात नवीन वॉटर कूलर लावण्यात आला होता. परंतु त्यात तांत्रिक बिघाड झाल्याने तो बंद पडला असून यामुळे विद्यार्थ्यांना अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाकडून याची दखलदेखील घेण्यात आलेली नाही. वसतीगृहात काही महिन्यांअगोदर नवा कोरा टीव्ही मागविण्यात आला. अनेक दिवस बंदच असलेला टीव्ही ‘नॅक’ समितीला दाखविण्यासाठी ठेवण्यात तर आला, परंतु ‘सेट टॉप बॉक्स’च नसल्याने विद्यार्थ्यांना टीव्ही पाहण्याची सोयच उरलेली नाही.‘कॅम्पस’मधील अनेक विभागांची चमकदेखील उतरायला लागली आहे. अनेक विभागांमध्ये ‘नॅक’ समिती गेल्यापासून स्वच्छताच झालेली नाही. काही विभागांत परत पाण्याची समस्या असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. ‘नॅक’चा उत्कृष्ट दर्जा जरी मिळाला तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना त्याचा फायदाच काय असा संतप्त सवाल व्यक्त करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)