शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

मुंबईचे मुख्यमंत्री आणि पुण्याचे उपमुख्यमंत्री हाच अडथळा; फडणवीस यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 08:51 IST

विकास मंडळांच्या पुनरुज्जीवनावरून फडणवीस यांचा घणाघात

नागपूर : मुंबईचे मुख्यमंत्री व पुण्याचे उपमुख्यमंत्री हाच विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास मंडळांच्या पुनरुज्जीवनातील अडथळा आहे, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भारतीय राज्यघटनेतील ३७१ (२) कलमान्वये गठित झालेली प्रादेशिक विकास मंडळे सव्वा वर्षाहून अधिक काळ अस्तित्वात नसल्याबद्दल ‘लोकमत’शी बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारलाच दोषी ठरविले. ते म्हणाले, या मंडळासंदर्भात राष्ट्रपतींनी राज्यपालांना अधिकार प्रदान केलेले आहेत. राज्यपालांनी दोन वेळा राज्य सरकारला यासंदर्भात सूचना दिल्या.

तथापि, मुंबईचे असलेले मुख्यमंत्री आणि पुण्याचे असलेले उपमुख्यमंत्री यांनी विदर्भ-मराठवाड्याच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. या भागांच्या विकासाची त्यांना पर्वा नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक वैधानिक विकास मंडळांचा प्रस्ताव दडवून ठेवला. दुर्दैवाने विदर्भ आणि मराठवाड्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी राज्य सरकारला जाब विचारण्याची हिंमत करीत नाहीत. ते सत्तेपुढे नतमस्तक झाले आहेत.

अर्थतज्ज्ञ विजय केळकर समितीने प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा लक्षात न घेता विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र प्रदेशांऐवजी तालुका हा घटक मानल्यामुळे तो अहवाल नाकारण्याचा निर्णय घेतला, असा उजाळा या निमित्ताने फडणवीस यांनी दिला.

विदर्भ-मराठवाड्याचा विकास अजेंड्यावरच नाही

राज्य सरकारची भूमिकाच मागास भागांच्या विरोधी असल्याचा आरोप करून फडणवीस म्हणाले, विदर्भ-मराठवाड्याचा विकास सरकारच्या अजेंड्यावरच नाही. आमच्या सरकारच्या काळात सिंचनासाठी सर्वाधिक निधी या प्रदेशांना देण्यात आला. आता हा निधी बंद करण्यात आला आहे. मराठवाड्याला सर्वाधिक वीज सवलत मिळायची. तीदेखील बंद करण्यात आली. वॉटरग्रीड प्रकल्पाचा मुडदा पाडण्यात आला आणि विदर्भातील वैनगंगा ते नळगंगा हा महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प आता थंडबस्त्यात आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार