शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मुंबईचे मुख्यमंत्री आणि पुण्याचे उपमुख्यमंत्री हाच अडथळा; फडणवीस यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 08:51 IST

विकास मंडळांच्या पुनरुज्जीवनावरून फडणवीस यांचा घणाघात

नागपूर : मुंबईचे मुख्यमंत्री व पुण्याचे उपमुख्यमंत्री हाच विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास मंडळांच्या पुनरुज्जीवनातील अडथळा आहे, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भारतीय राज्यघटनेतील ३७१ (२) कलमान्वये गठित झालेली प्रादेशिक विकास मंडळे सव्वा वर्षाहून अधिक काळ अस्तित्वात नसल्याबद्दल ‘लोकमत’शी बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारलाच दोषी ठरविले. ते म्हणाले, या मंडळासंदर्भात राष्ट्रपतींनी राज्यपालांना अधिकार प्रदान केलेले आहेत. राज्यपालांनी दोन वेळा राज्य सरकारला यासंदर्भात सूचना दिल्या.

तथापि, मुंबईचे असलेले मुख्यमंत्री आणि पुण्याचे असलेले उपमुख्यमंत्री यांनी विदर्भ-मराठवाड्याच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. या भागांच्या विकासाची त्यांना पर्वा नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक वैधानिक विकास मंडळांचा प्रस्ताव दडवून ठेवला. दुर्दैवाने विदर्भ आणि मराठवाड्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी राज्य सरकारला जाब विचारण्याची हिंमत करीत नाहीत. ते सत्तेपुढे नतमस्तक झाले आहेत.

अर्थतज्ज्ञ विजय केळकर समितीने प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा लक्षात न घेता विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र प्रदेशांऐवजी तालुका हा घटक मानल्यामुळे तो अहवाल नाकारण्याचा निर्णय घेतला, असा उजाळा या निमित्ताने फडणवीस यांनी दिला.

विदर्भ-मराठवाड्याचा विकास अजेंड्यावरच नाही

राज्य सरकारची भूमिकाच मागास भागांच्या विरोधी असल्याचा आरोप करून फडणवीस म्हणाले, विदर्भ-मराठवाड्याचा विकास सरकारच्या अजेंड्यावरच नाही. आमच्या सरकारच्या काळात सिंचनासाठी सर्वाधिक निधी या प्रदेशांना देण्यात आला. आता हा निधी बंद करण्यात आला आहे. मराठवाड्याला सर्वाधिक वीज सवलत मिळायची. तीदेखील बंद करण्यात आली. वॉटरग्रीड प्रकल्पाचा मुडदा पाडण्यात आला आणि विदर्भातील वैनगंगा ते नळगंगा हा महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प आता थंडबस्त्यात आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार