शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मुंबईचे मुख्यमंत्री आणि पुण्याचे उपमुख्यमंत्री हाच अडथळा; फडणवीस यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 08:51 IST

विकास मंडळांच्या पुनरुज्जीवनावरून फडणवीस यांचा घणाघात

नागपूर : मुंबईचे मुख्यमंत्री व पुण्याचे उपमुख्यमंत्री हाच विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास मंडळांच्या पुनरुज्जीवनातील अडथळा आहे, अशी घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

भारतीय राज्यघटनेतील ३७१ (२) कलमान्वये गठित झालेली प्रादेशिक विकास मंडळे सव्वा वर्षाहून अधिक काळ अस्तित्वात नसल्याबद्दल ‘लोकमत’शी बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारलाच दोषी ठरविले. ते म्हणाले, या मंडळासंदर्भात राष्ट्रपतींनी राज्यपालांना अधिकार प्रदान केलेले आहेत. राज्यपालांनी दोन वेळा राज्य सरकारला यासंदर्भात सूचना दिल्या.

तथापि, मुंबईचे असलेले मुख्यमंत्री आणि पुण्याचे असलेले उपमुख्यमंत्री यांनी विदर्भ-मराठवाड्याच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे पूर्ण दुर्लक्ष केले. या भागांच्या विकासाची त्यांना पर्वा नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक वैधानिक विकास मंडळांचा प्रस्ताव दडवून ठेवला. दुर्दैवाने विदर्भ आणि मराठवाड्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी राज्य सरकारला जाब विचारण्याची हिंमत करीत नाहीत. ते सत्तेपुढे नतमस्तक झाले आहेत.

अर्थतज्ज्ञ विजय केळकर समितीने प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा लक्षात न घेता विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र प्रदेशांऐवजी तालुका हा घटक मानल्यामुळे तो अहवाल नाकारण्याचा निर्णय घेतला, असा उजाळा या निमित्ताने फडणवीस यांनी दिला.

विदर्भ-मराठवाड्याचा विकास अजेंड्यावरच नाही

राज्य सरकारची भूमिकाच मागास भागांच्या विरोधी असल्याचा आरोप करून फडणवीस म्हणाले, विदर्भ-मराठवाड्याचा विकास सरकारच्या अजेंड्यावरच नाही. आमच्या सरकारच्या काळात सिंचनासाठी सर्वाधिक निधी या प्रदेशांना देण्यात आला. आता हा निधी बंद करण्यात आला आहे. मराठवाड्याला सर्वाधिक वीज सवलत मिळायची. तीदेखील बंद करण्यात आली. वॉटरग्रीड प्रकल्पाचा मुडदा पाडण्यात आला आणि विदर्भातील वैनगंगा ते नळगंगा हा महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प आता थंडबस्त्यात आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार