शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

दहेगाव-गोवरी भूमिगत कोळसा खाणीला दहा गावातील नागरिकांचा तीव्र विरोध ! मंजुरी दिली तर सरकार जबाबदार राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 17:01 IST

Nagpur : नागपूर जिल्ह्यातील प्रस्तावित दहेगाव-गोवरी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पासाठी बुधवारी वलनी (ता. नागपूर ग्रामीण) येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमेश्वर : नागपूर जिल्ह्यातील प्रस्तावित दहेगाव-गोवरी भूमिगत कोळसा खाण प्रकल्पासाठी बुधवारी वलनी (ता. नागपूर ग्रामीण) येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. या प्रकल्पास दहा गावांतील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला. रोष लक्षात घेता नागरिकांना एकमुखी विरोध असल्याचा लेखी ठराव घेत प्रशासनाने जनसुनावणी संपविली, अशी माहिती आंदोलक गावकऱ्यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार मे. अंबुजा सिमेंट लिमिटेड या कंपनीच्या प्रस्तावित स्थळावर या जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. नागपूरचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अनुप खांडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे, उपप्रादेशिक अधिकारी धनश्री पाटील यांच्या उपस्थितीत या सुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या खाणीला स्थानिकांच्या असलेल्या विरोधाची नोंद घेत ही सुनावणी संपविण्यात येत असल्याचे अनुप खांडे यांनी जाहीर केले. 

या सुनावणीला हजारो नागरिकांसह हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे, भाजप नेते डॉ. राजीव पोतदार, माजी मंत्री सुनील केदार, भाजप जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कुंदा राऊत, दहा गावांतील सरपंच, उपसंरपंच यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

एकूण १,५६२ हेक्टर क्षेत्रामध्ये विकसित होणाऱ्या या खाण परिसरात नागपूर ग्रामीण तालुक्यातील वलनी, खंडाळा आणि पारडी तर कळमेश्वर तालुक्यातील तोंडाखैरी, बेलोरी, बोरगाव, गोवरी, खैरी, झुणकी-सिंधी आणि दहेगावचा समावेश आहे. या प्रस्तावित कोळसा खाणीला विरोध करण्यासाठी परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी सुनावणीच्या स्थळी हजेरी लावली होती. उपस्थितीत ग्रामस्थांनी ही सुनावणी घेण्याची मागणी करीत तोंडी आणि लेखी बाजू ऐकून घेण्याची मागणी उपस्थित अधिकाऱ्यांना केली होती. मात्र ग्रामस्थांचा प्रकल्पाला होणारा विरोध लक्षात घेता अधिकाऱ्यांनी ही सुनावणी गुंडाळली, अशी माहिती वलनीचे सरपंच स्वप्नील गावंडे यांनी लोकमतला दिली. नागरिकांचा या प्रकल्पाला एकमुखी विरोध असल्याचे नमूद करीत तसे पत्रही खांडे यांनी दिल्याची माहिती गावंडे यांच्यासह वलनीचे उपसरपंच दिनेश येसनकर, सदस्य गौरव ठाकरे, माजी सैनिक मंगेश बेंडे यांनी दिली. 

"दहेगाव-गोवरी भूमिगत कोळसा खाणीला दहा गावांच्या ग्रामस्थांचा आणि सरपंचांचा विरोध आहे. या प्रकल्पाला सरकारने मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू केल्यास बाधित दहाही गावच्या ग्रामस्थांच्या वतीने आणखी तीव्र विरोध केला जाईल. यामुळे कुठलीही परस्थिती निर्माण झाल्यास सरकार जबाबदार राहील."- स्वप्निल गावंडे, सरपंच, वलनी ग्रामपंचायत

टॅग्स :nagpurनागपूर