शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

चीनकडून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न : हेमंत महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:09 IST

चीनला भारताची प्रगती नको आहे. त्यामुळेच विविध माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) हेमंत महाजन यांनी केले आहे.

ठळक मुद्देपाकव्याप्त काश्मीर सहज मिळवण्याची भारतीय लष्कराची क्षमता

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इतर देशांच्या तुलनेत भारताच्या विकासाचा वेग जास्त आहे. मात्र देशासमोर सीमेवरील व अंतर्गत दहशतवादाची मोठी समस्या आहे. जर दहशतवाद व नक्षलवाद संपले तर भारताचा वेगाने विकास होईल. नेमकी हीच बाब चीनला माहीत आहे. त्यामुळेच पाकिस्तानला दहशतवादी कृत्यांमध्ये सातत्याने चीनचे पाठबळ राहिले आहे. चीनला भारताची प्रगती नको आहे. त्यामुळेच विविध माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) हेमंत महाजन यांनी केले आहे.विश्व संवाद केंद्रात त्यांनी देशातील अंतर्गत व बाह्य सुरक्षेच्या स्थितीबाबत माहिती दिली. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० संपुष्टात आल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर काश्मीर भारताचा हिस्सा नसल्याचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला. जर पाकिस्तानचा नकाशा पाहिला तर त्या देशाचे किती तुकडे पडू शकतात याची जाणीव होते. सिंध प्रांत, बलुचिस्तानमध्ये तर खदखद आहेच. गिलगिट-बाल्टीस्तानमधील लोक भारतासोबत आहेत. एकेकाळी पाकिस्तानचे ९० टक्के सैन्य सीमेवर असायचे. आता ही संख्या ५० टक्क्यांवर आली आहे. पाकिस्तानच्या अंतर्गत भागात दहशतवाद वाढला असून वरील राज्यांमध्येदेखील सशस्त्र विरोध सुरू आहे. अशा स्थितीत पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेणे भारतासाठी सहज शक्य आहे, असे हेमंत महाजन म्हणाले. बांगलादेशमधून होणारी घुसखोरी हा देशासमोरील मोठा प्रश्न आहे. यासंदर्भात कडक पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील काही वर्षांत ईशान्येकडील काही राज्यात बांगलादेशी मूळ असलेला मुख्यमंत्री पहावा लागू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भारताने ‘एलओसी’सोबत सागरी सीमांवरदेखील गस्त वाढविण्याची गरज आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.भारताने मागील काही काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर सामरिक तसेच कूटनीती शक्ती दाखविली आहे. मात्र आता सौम्यशक्तीचादेखील वापर करायला हवा. संस्कृती, कला, संगीत इत्यादींच्या माध्यमातून जगात एक वेगळा संदेश नेण्यावर भर दिला पाहिजे, असेदेखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतTerrorismदहशतवाद