शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चीनकडून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न : हेमंत महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:09 IST

चीनला भारताची प्रगती नको आहे. त्यामुळेच विविध माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) हेमंत महाजन यांनी केले आहे.

ठळक मुद्देपाकव्याप्त काश्मीर सहज मिळवण्याची भारतीय लष्कराची क्षमता

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इतर देशांच्या तुलनेत भारताच्या विकासाचा वेग जास्त आहे. मात्र देशासमोर सीमेवरील व अंतर्गत दहशतवादाची मोठी समस्या आहे. जर दहशतवाद व नक्षलवाद संपले तर भारताचा वेगाने विकास होईल. नेमकी हीच बाब चीनला माहीत आहे. त्यामुळेच पाकिस्तानला दहशतवादी कृत्यांमध्ये सातत्याने चीनचे पाठबळ राहिले आहे. चीनला भारताची प्रगती नको आहे. त्यामुळेच विविध माध्यमातून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन ब्रिगेडियर (सेवानिवृत्त) हेमंत महाजन यांनी केले आहे.विश्व संवाद केंद्रात त्यांनी देशातील अंतर्गत व बाह्य सुरक्षेच्या स्थितीबाबत माहिती दिली. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० संपुष्टात आल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर काश्मीर भारताचा हिस्सा नसल्याचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला. जर पाकिस्तानचा नकाशा पाहिला तर त्या देशाचे किती तुकडे पडू शकतात याची जाणीव होते. सिंध प्रांत, बलुचिस्तानमध्ये तर खदखद आहेच. गिलगिट-बाल्टीस्तानमधील लोक भारतासोबत आहेत. एकेकाळी पाकिस्तानचे ९० टक्के सैन्य सीमेवर असायचे. आता ही संख्या ५० टक्क्यांवर आली आहे. पाकिस्तानच्या अंतर्गत भागात दहशतवाद वाढला असून वरील राज्यांमध्येदेखील सशस्त्र विरोध सुरू आहे. अशा स्थितीत पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेणे भारतासाठी सहज शक्य आहे, असे हेमंत महाजन म्हणाले. बांगलादेशमधून होणारी घुसखोरी हा देशासमोरील मोठा प्रश्न आहे. यासंदर्भात कडक पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील काही वर्षांत ईशान्येकडील काही राज्यात बांगलादेशी मूळ असलेला मुख्यमंत्री पहावा लागू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. भारताने ‘एलओसी’सोबत सागरी सीमांवरदेखील गस्त वाढविण्याची गरज आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.भारताने मागील काही काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर सामरिक तसेच कूटनीती शक्ती दाखविली आहे. मात्र आता सौम्यशक्तीचादेखील वापर करायला हवा. संस्कृती, कला, संगीत इत्यादींच्या माध्यमातून जगात एक वेगळा संदेश नेण्यावर भर दिला पाहिजे, असेदेखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :chinaचीनIndiaभारतTerrorismदहशतवाद